शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पाणीटंचाई उपायांची अंमलबजावणी वेळेत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST

अमरावती : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर ...

अमरावती : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले.

भातकुली तालुक्यातील टंचाई आराखड्याबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भातकुली पंचायत समिती कार्यालयात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. सभापती कल्पना चक्रे, उपसभापती अरविंद आकोलकर, जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख, गणेश सोळंके, मयूरी कावरे, प्रदीप थोरात, जया तेलखेडे, उषा बोंडे, करुणा कोलटके, तहसीलदार नीता लबडे व गटविकास अधिकारी सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

पाण्याची टंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आवश्यक तजवीज करावी. यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. यासोबतच धामोरी, वायगाव, वाठोडा शुकलेश्वर, खारतळेगाव, पूर्णनगर, साऊर, रामा, सोनारखेड, आष्टी, अंचलवाडी, वातोंडा, निरूळ, वाकी या गावांमध्ये आवश्यकतेनुसार हातपंप उभारण्यासाठी प्रस्ताव द्यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बॉक्स

या विषयावर चर्चा

भातकुली तालुक्यातील बोरखडीपर्यंत शहानूर नळ योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी. मार्की व वातोंडा हिंमतपूर येथील शिकस्त झालेल्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती तातडीने करावी. उन्हाळ्याच्या दिवसांत कुठेही पाणीटंचाई भासू नये, यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत पूरक पाणीव्यवस्थेसाठी टाकीचे बांधकाम करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, अशा पालकमंत्र्यानी दिल्या आहेत.