शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

पाणीटंचाई उपायांची अंमलबजावणी वेळेत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST

अमरावती : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर ...

अमरावती : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले.

भातकुली तालुक्यातील टंचाई आराखड्याबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भातकुली पंचायत समिती कार्यालयात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. सभापती कल्पना चक्रे, उपसभापती अरविंद आकोलकर, जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख, गणेश सोळंके, मयूरी कावरे, प्रदीप थोरात, जया तेलखेडे, उषा बोंडे, करुणा कोलटके, तहसीलदार नीता लबडे व गटविकास अधिकारी सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

पाण्याची टंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आवश्यक तजवीज करावी. यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. यासोबतच धामोरी, वायगाव, वाठोडा शुकलेश्वर, खारतळेगाव, पूर्णनगर, साऊर, रामा, सोनारखेड, आष्टी, अंचलवाडी, वातोंडा, निरूळ, वाकी या गावांमध्ये आवश्यकतेनुसार हातपंप उभारण्यासाठी प्रस्ताव द्यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बॉक्स

या विषयावर चर्चा

भातकुली तालुक्यातील बोरखडीपर्यंत शहानूर नळ योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी. मार्की व वातोंडा हिंमतपूर येथील शिकस्त झालेल्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती तातडीने करावी. उन्हाळ्याच्या दिवसांत कुठेही पाणीटंचाई भासू नये, यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत पूरक पाणीव्यवस्थेसाठी टाकीचे बांधकाम करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, अशा पालकमंत्र्यानी दिल्या आहेत.