शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई उपायांची अंमलबजावणी वेळेत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST

अमरावती : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर ...

अमरावती : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले.

भातकुली तालुक्यातील टंचाई आराखड्याबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भातकुली पंचायत समिती कार्यालयात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. सभापती कल्पना चक्रे, उपसभापती अरविंद आकोलकर, जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख, गणेश सोळंके, मयूरी कावरे, प्रदीप थोरात, जया तेलखेडे, उषा बोंडे, करुणा कोलटके, तहसीलदार नीता लबडे व गटविकास अधिकारी सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

पाण्याची टंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आवश्यक तजवीज करावी. यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. यासोबतच धामोरी, वायगाव, वाठोडा शुकलेश्वर, खारतळेगाव, पूर्णनगर, साऊर, रामा, सोनारखेड, आष्टी, अंचलवाडी, वातोंडा, निरूळ, वाकी या गावांमध्ये आवश्यकतेनुसार हातपंप उभारण्यासाठी प्रस्ताव द्यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बॉक्स

या विषयावर चर्चा

भातकुली तालुक्यातील बोरखडीपर्यंत शहानूर नळ योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी. मार्की व वातोंडा हिंमतपूर येथील शिकस्त झालेल्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती तातडीने करावी. उन्हाळ्याच्या दिवसांत कुठेही पाणीटंचाई भासू नये, यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत पूरक पाणीव्यवस्थेसाठी टाकीचे बांधकाम करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, अशा पालकमंत्र्यानी दिल्या आहेत.