निवेदन : पशुधन बचाओ समितीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा व शहरात गोवंश हत्याबंदी कायद्याची खुलेआम पायमल्ली होत आहे. त्यामुळे अवैधरित्या गोवंशाची वाहतूक केली जात आहे.त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबाजावणी करावी व अवैध प्रकारांना आळा घालावा अशी मागणी मंग़ळवारी पालकमंत्र्याकडे पशुधन बचाओ समितीने केली आहे.राज्यात गोवंश कायदा लागू होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटून गेला आहे. तरी देखील जिल्ह्यात व शहरात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक निर्दयीपणे सुरू आहे.अशातच पशुधनाची तस्करीसुध्दा होत आहे. या अवैध प्रकार करणाऱ्यांना कायद्याचा जराही धाक नाही. त्यामुळे अवैध धंदे फोफावले असल्याचे अनेक उदारणे दिसून येत आहे.ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी व अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलीच्या ठिकाणी धाडी टाकृू न कठोर कारवाई करावी अशी मागणी पशुधन बचाओ समितीने जिल्हाधिकारी अभिजित बांग़र व पालकमंत्री प्रवीण पोटे यांचेकडे केली आहे. निवेदन देतेवेळी विह्पिंचे विजय शर्मा, अकील जैन,सुनील सुर्यवंशी व पदाधिकारी उपस्थित होते.
गोवंशहत्या बंदीची अंमलबजावणी करा
By admin | Updated: May 24, 2017 00:10 IST