शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

झाडांचा पालापाचोळा जाळणे बेकायदेशीर

By admin | Updated: April 3, 2017 00:21 IST

दरवर्षी उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा जाळला जातो. मात्र आता झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई करण्यात आली असून हा पालापाचोळा खत तयार करण्यासाठी वापर व्हावा, ....

हरित लवादाचा निर्णय : वनविभागाकडून नियमांना छेदअमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा जाळला जातो. मात्र आता झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई करण्यात आली असून हा पालापाचोळा खत तयार करण्यासाठी वापर व्हावा, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. परंतु वनविभागाने अद्यापही हरित लवादाच्या निर्णयाचे पालन केले नसल्याचे वास्तव आहे.वर्धमान कौशिक आणि संजय कुलक्षेत्र यांनी युनियन आॅफ इंडिया व इतर यांच्याविरुद्ध दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केलेल्या याचिका क्र. २४ /२०१४ नुसार मे २०१५ मध्ये दिलेल्या निकालानुसार झाडांचा पालापाचोळा जाळण्यास सक्त मनाई आहे. तसेच जंगल शेजारी असलेल्या विटभट्टी, शेतातील काडीकचरा, फॅक्टरी आदींवर आगीसंदर्भात निर्बंध लादण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील २९ महापालिका, ३५३ नगरपरिषद, नगरपालिकांना तसेच ४४ हजार गावांमध्ये लागू करण्यात आला आहे. झाडांचा पालापाचोळा जाळल्यानंतर होणारे नुकसान हे गंभीर असल्याचे राष्ट्रीत हरित लवादाने निकालात म्हटले आहे. जंगलशेजारील शेतात आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक होते. हे गवत जळताना त्यासोबत किटक नाशक, तृणभक्षी पक्षी नामशेष होतात. परिणामी किटक नाशक, तृणभक्षी पक्षांवर अवलंबून असलेले वनप्राण्यांची संख्या आगीमुळे रोडावते. जंगलशेजारील शेतात पालापाचोळा जाळताना आगीच्या चिंगारीने हजारो हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे उदाहरण यापूर्वी घडले आहे. तर काही भागात जंगलाना काठेवाडी आणि धनगरांनी गुरांच्या चाऱ्यासाठी आग लावण्याचे प्रकार देखील घडवून आणले आहेत. त्यामुळे दरवर्षी वनविभाग आगीपासून जंगलाचा बचाव करण्यासाठी जाळरेषा तयार करते. यात महसूल विभाग ६ मीटर, तालुकास्तरावर १२ मीटर तर घनदाट जंगलात ४० मिटरची जाळरेषा तयार करुन जंगलांना आगीपासून वाचविले जाते. जंगलांना आगीपासून बचाव करण्यासाठी १९८२ पासून नियम अस्तित्वात आले आहे. मात्र जंगलांना आग लागण्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असताना वनविभागाने कारवाई केली नाही, अशी माहिती आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल याचिकेवर निर्णय देताना झाडांचा पालापाचोळा जाळण्याबाबत निर्बंध लादण्यात आले आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार, न्या. यू. डी. साल्वी, डी. के. अग्रवाल, ए.के. युसूफ, बी.एस. सजवन या सदस्यांनी झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई केली आहे. (प्रतिनिधी)डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळणे धोकादायकमहानगरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे डपिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळून टेकडी कमी करण्याची शक्कल लढविली जाते. मात्र कचरा जाळताना निघणारा हा धूर अनेक आजार नागरिकांना देऊन जातो, असे राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे. त्यामुळे महापालिकांनी डपिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळू नये. तसे आढळल्यास वनविभागाने कारवाई करावी, असे निर्देशित करण्यात आले आहे.वनांचे क्षेत्र घटण्याचे कारणवनजमिनींचे वाटप, वनसंवर्धन कायद्यातंर्गत वनजमिनीचे वाटप, महसूल विभागाकडे वनजमिन ताब्यात, वनहक्क कायद्यातंर्गत वनजमिनीचे वाटच, सामुहिक दाव्याप्रमाणे वनजमिनीचे वाटप, वनजमिनीवर अतिक्रमण.