शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

झाडांचा पालापाचोळा जाळणे बेकायदेशीर

By admin | Updated: April 3, 2017 00:21 IST

दरवर्षी उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा जाळला जातो. मात्र आता झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई करण्यात आली असून हा पालापाचोळा खत तयार करण्यासाठी वापर व्हावा, ....

हरित लवादाचा निर्णय : वनविभागाकडून नियमांना छेदअमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात झाडांचा पालापाचोळा जाळला जातो. मात्र आता झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई करण्यात आली असून हा पालापाचोळा खत तयार करण्यासाठी वापर व्हावा, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. परंतु वनविभागाने अद्यापही हरित लवादाच्या निर्णयाचे पालन केले नसल्याचे वास्तव आहे.वर्धमान कौशिक आणि संजय कुलक्षेत्र यांनी युनियन आॅफ इंडिया व इतर यांच्याविरुद्ध दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केलेल्या याचिका क्र. २४ /२०१४ नुसार मे २०१५ मध्ये दिलेल्या निकालानुसार झाडांचा पालापाचोळा जाळण्यास सक्त मनाई आहे. तसेच जंगल शेजारी असलेल्या विटभट्टी, शेतातील काडीकचरा, फॅक्टरी आदींवर आगीसंदर्भात निर्बंध लादण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील २९ महापालिका, ३५३ नगरपरिषद, नगरपालिकांना तसेच ४४ हजार गावांमध्ये लागू करण्यात आला आहे. झाडांचा पालापाचोळा जाळल्यानंतर होणारे नुकसान हे गंभीर असल्याचे राष्ट्रीत हरित लवादाने निकालात म्हटले आहे. जंगलशेजारील शेतात आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक होते. हे गवत जळताना त्यासोबत किटक नाशक, तृणभक्षी पक्षी नामशेष होतात. परिणामी किटक नाशक, तृणभक्षी पक्षांवर अवलंबून असलेले वनप्राण्यांची संख्या आगीमुळे रोडावते. जंगलशेजारील शेतात पालापाचोळा जाळताना आगीच्या चिंगारीने हजारो हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे उदाहरण यापूर्वी घडले आहे. तर काही भागात जंगलाना काठेवाडी आणि धनगरांनी गुरांच्या चाऱ्यासाठी आग लावण्याचे प्रकार देखील घडवून आणले आहेत. त्यामुळे दरवर्षी वनविभाग आगीपासून जंगलाचा बचाव करण्यासाठी जाळरेषा तयार करते. यात महसूल विभाग ६ मीटर, तालुकास्तरावर १२ मीटर तर घनदाट जंगलात ४० मिटरची जाळरेषा तयार करुन जंगलांना आगीपासून वाचविले जाते. जंगलांना आगीपासून बचाव करण्यासाठी १९८२ पासून नियम अस्तित्वात आले आहे. मात्र जंगलांना आग लागण्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असताना वनविभागाने कारवाई केली नाही, अशी माहिती आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल याचिकेवर निर्णय देताना झाडांचा पालापाचोळा जाळण्याबाबत निर्बंध लादण्यात आले आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार, न्या. यू. डी. साल्वी, डी. के. अग्रवाल, ए.के. युसूफ, बी.एस. सजवन या सदस्यांनी झाडांचा पालापाचोळा जाळण्यास मनाई केली आहे. (प्रतिनिधी)डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळणे धोकादायकमहानगरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे डपिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळून टेकडी कमी करण्याची शक्कल लढविली जाते. मात्र कचरा जाळताना निघणारा हा धूर अनेक आजार नागरिकांना देऊन जातो, असे राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले आहे. त्यामुळे महापालिकांनी डपिंग ग्राऊंडमध्ये कचरा जाळू नये. तसे आढळल्यास वनविभागाने कारवाई करावी, असे निर्देशित करण्यात आले आहे.वनांचे क्षेत्र घटण्याचे कारणवनजमिनींचे वाटप, वनसंवर्धन कायद्यातंर्गत वनजमिनीचे वाटप, महसूल विभागाकडे वनजमिन ताब्यात, वनहक्क कायद्यातंर्गत वनजमिनीचे वाटच, सामुहिक दाव्याप्रमाणे वनजमिनीचे वाटप, वनजमिनीवर अतिक्रमण.