शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास रस्त्यावर उतरू

By admin | Updated: December 3, 2015 00:18 IST

अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून ....

इशारा : युवक काँग्रेसचा सरकारला अल्टिमेटम नांदगाव पेठ : अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून आता सहनशीलतेचा अंत न पाहता शासनाने अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा युवक काँग्रेसने तिवसा विधानसभा अध्यक्ष हरीष मोरे यांनी दिला आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती खालावत चालली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाणही कमी होते. स्वत:च्या मेहनतीने तोंडापर्यंत आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कर्जाचे ओझे वाढत चालले असून शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा व लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोनवेळचे जेवणही यावर्षी शेतीतून मिळणे कठीण झाले असताना सरकारने चुकीच्या पध्दतीने आणेवारी मांडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा फास घट्ट करण्यासारखे आहे. शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आत्महत्येचा पर्याय शिल्लक ठेवला असून बळीराजाला जीवनदान देणे कर्तव्य असल्याचे हरीश मोरे यानी सांगितले. युवक काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आता संघर्ष करण्यासाठी वेळ आली आहे. आता शेतकऱ्यांचा संयम संपला असून शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने जर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हरीश मोरे यांनी दिला आहे. (वार्ताहर)