शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास रस्त्यावर उतरू

By admin | Updated: December 3, 2015 00:18 IST

अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून ....

इशारा : युवक काँग्रेसचा सरकारला अल्टिमेटम नांदगाव पेठ : अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून आता सहनशीलतेचा अंत न पाहता शासनाने अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा युवक काँग्रेसने तिवसा विधानसभा अध्यक्ष हरीष मोरे यांनी दिला आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती खालावत चालली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाणही कमी होते. स्वत:च्या मेहनतीने तोंडापर्यंत आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कर्जाचे ओझे वाढत चालले असून शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा व लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोनवेळचे जेवणही यावर्षी शेतीतून मिळणे कठीण झाले असताना सरकारने चुकीच्या पध्दतीने आणेवारी मांडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा फास घट्ट करण्यासारखे आहे. शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आत्महत्येचा पर्याय शिल्लक ठेवला असून बळीराजाला जीवनदान देणे कर्तव्य असल्याचे हरीश मोरे यानी सांगितले. युवक काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आता संघर्ष करण्यासाठी वेळ आली आहे. आता शेतकऱ्यांचा संयम संपला असून शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने जर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हरीश मोरे यांनी दिला आहे. (वार्ताहर)