शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास रस्त्यावर उतरू

By admin | Updated: December 3, 2015 00:18 IST

अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून ....

इशारा : युवक काँग्रेसचा सरकारला अल्टिमेटम नांदगाव पेठ : अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून आता सहनशीलतेचा अंत न पाहता शासनाने अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा युवक काँग्रेसने तिवसा विधानसभा अध्यक्ष हरीष मोरे यांनी दिला आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती खालावत चालली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाणही कमी होते. स्वत:च्या मेहनतीने तोंडापर्यंत आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कर्जाचे ओझे वाढत चालले असून शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा व लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोनवेळचे जेवणही यावर्षी शेतीतून मिळणे कठीण झाले असताना सरकारने चुकीच्या पध्दतीने आणेवारी मांडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा फास घट्ट करण्यासारखे आहे. शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आत्महत्येचा पर्याय शिल्लक ठेवला असून बळीराजाला जीवनदान देणे कर्तव्य असल्याचे हरीश मोरे यानी सांगितले. युवक काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आता संघर्ष करण्यासाठी वेळ आली आहे. आता शेतकऱ्यांचा संयम संपला असून शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने जर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हरीश मोरे यांनी दिला आहे. (वार्ताहर)