शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

बर्फगोळ्यात घातक ईसेंस

By admin | Updated: March 17, 2017 00:11 IST

उन्हाळा सुरू झालाय. आता थंडगार बर्फगोळ्यांकडे विद्यार्थी धाव घेणार. मोठ्यांनाही त्याचा मोह होणार.

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात : अनेक आजार बळावण्याची शक्यता अमरावती : उन्हाळा सुरू झालाय. आता थंडगार बर्फगोळ्यांकडे विद्यार्थी धाव घेणार. मोठ्यांनाही त्याचा मोह होणार. पण, सावधान! बर्फगोळ्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ दूषित पाण्यापासून तयार केला जातोय. बर्फगोळ्याला आकर्षक व चवदार बनविण्यासाठी वापरले जाणारे इसेंसही आरोग्यासाठी घातक आहे. यातून विविध आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्यात शाळा-महाविद्यालयांसमोर रंगीबेरंगी, थंडगार बर्फगोळा विक्रीला येतो. विद्यार्थ्यांचा ओढा याबर्फगोळ्यांकडे असतोच. परंतु बर्फगोळ्यांचे अंधाधूंद सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. बर्फगोळा तयार करताना वापरला जाणारा खाद्यरंग (ईसेंस) अतिशय घातक आहे. त्याचा बर्फगोळ्यांच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शिवाय आरोग्यासाठी अत्यंत घातक अशा सॅकरिनचा साखरेला पर्याय म्हणून वापर होतो. सॅकरिनचा पाक करून त्याचा वापरही केला जातो. जीभेचे चोचले पुरविण्यासाठी व उन्हाची दाहकता शमविण्यासाठी शाळकरी विद्यार्थी बर्फगोळ्यांच्या हातगाड्यांवर धाव घेतात.

‘सॅकरिन’ घातकच अमरावती : अवघ्या ५ ते १० रूपयांमध्ये हा रंगबीरंगी बर्फ गोळा मिळत असल्याने त्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. बर्फगोळा विक्रेत्यांनी अन्न व प्रशासन विभागाकडे कोणतीच नोंदणी केली नसून किंवा कोणताही परवाना घेतला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एफडीएचे अधिकारी अनाधिकृत बर्फगोळा विक्रेत्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बर्फगोळ्यांसाठी वापरले जाणारे खाद्यरंग कमी दर्जाचे तर नाहीत ना, हे तपासण्यासाठी त्या रंगांचे नमुने घेऊन जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या बर्फगोळ्याच्या साहित्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली जात आहे. बर्फगोळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आकर्षक खाद्यरंगांच्या पाकामध्ये साखरेऐवजी सॅकरिनचा वापर करण्यात येतो. बाजारपेठेत सॅकरिन साखरेच्या तुलनेत स्वस्त दरात मिळत असल्याने त्याचा वापर विक्रेत्यांना परवडतो. मात्र, यातून खाणाऱ्यांना घातक आजार जडू शकतात. बर्फगोळ्याच्या ग्राहकांमध्ये विद्यार्थ्यांचीच संख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला थेट बाधा पोहोचत आहे. त्यामुळे सॅकरिनचा वापर थांबविण्याकरिता कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बर्फाच्या लादीलाही संक्रमण सातुर्णा परिसरात सर्वाधिक बर्फ कारखाने आहेत. येथून शहरात रोज बर्फाच्या लाद्या विक्रीकरिता आणण्यात येतात.परंतु हा बर्फ तयार करण्यासाठी दूषित पाण्याचा वापर केला जातो. लाद्या आणताना त्यांची काळजीही घेण्यात येत नाही. केरकचरा या लादीला चिकटतो. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाता-पायांची घाणही या लादीला बरबटते. तसेच विक्री करताना सुद्धा त्यांची योग्य काळजी घेण्यात येत नाही. त्यामुळे संक्रमण होते. याचाच वापर बर्फगोळा तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आजारांचे संक्रमण होते. त्यामुळे बर्फ कारखान्यांची सुद्धा एफडीएने तपासणी करावी. शिवाय नागरिकांनीही बर्फजन्य पदार्थ खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. हे आजार बळावण्याची शक्यता बर्फ जर दूषित पाण्याने तयार केला जात असेल तर तो खाण्यात आल्यास अनेक आजार बळावू शकतात. यामध्ये डायरिया, कावीळ, टायफाईड व पाणीजन्य आजार होण्याची शक्यता असते. तसेच सॅकरिन व बर्फाचे दूषित पदार्थ खाल्ल्याने पोटाचे आजार होतात. पचनक्रिया कमी होणे, भूक मंदावणे ही लक्षणे दिसून येऊ लागतात. हे आरोग्यासाठी घातक आहे. दुषित बर्फाचे गोळे खाण्यात आल्याने पोटाच्या आतडीवर सूज येणे, पचनक्रि या कमी होणे, भूक मंदावणे, डायरिया आदी आजार होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळयात बर्फगोळा किंवा बर्फजन्य पदार्थ खाताना दक्षता घेणे गरजेचे आहे. - मनोज निचत हृदय व मधुमेहतज्ज्ञ अमरावती.