शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

पतीच्या अनैतिक संबंधाने आठवडाभरात तोडला संसार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 21:28 IST

Amravati News पतीच्या लग्नापूर्वीच्या अनैतिक संबंधाने एक संसार आठवडाभरात मोडकळीस आला. येथील विलासनगर भागात घडलेल्या या घटनेबाबत गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘दुसरी’नेही पाठविला ‘तसला’ मॅसेज महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा

अमरावती: पतीच्या लग्नापूर्वीच्या अनैतिक संबंधाने एक संसार आठवडाभरात मोडकळीस आला. येथील विलासनगर भागात घडलेल्या या घटनेबाबत गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी समुपदेशानाचा पर्यायही चोखाळला. मात्र, समेट घडून न आल्याने महिलेच्या पती, भासरा व एका महिलेविरुद्ध भादंविचे कलम ४९८ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

             विलासनगर येथील एका तरुणीचे जयेश नामक तरुणाशी १४ जून २०२० रोजी लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या सात-आठ दिवसांनी पतीने तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. आई-वडिलांकडून एक लाख रुपये आण, असे म्हणून तिला घराबाहेर हाकलून दिले. मात्र, नेमके कारण वेगळेच निघाले.

             पतीचे पूर्वीपासून एका मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पीडिताला कळले, नव्हे तर त्या मुलीने पिडिताच्या मोबाईलवर मॅसेज टाकून तसे कळविले. हा सर्व प्रकार पतीच्या आईवडिलांसह भासऱ्यालादेखील माहीत असताना त्यांनी लग्नानंतर लगेचच पैशाची मागणी करून विवाहितेचा अनन्वित छळ केला. याबाबत पीडिताने २ सप्टेंबर रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ती तक्रार समुपदेशनासाठी महिला सेलला पाठविण्यात आली. त्या अर्जाच्या चौकशीदरम्यान पती, भासरा, सासू यांनी आपसी समझोता करून लग्नात केलेला १.५० लाख रुपये परत करण्यास होकार भरला. मात्र, त्यानंतर पैसे देत नाही, तुला वागवत नाही, त्या मुलीसोबत मी लग्न केले, तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, अशी गर्भित धमकी पती जयेशने पीडिताला दिली. तसा अहवाल महिला समुपदेशन कक्षाने गाडगेनगर पोलीस ठाण्याला दिला. त्यावरून गाडगेनगर पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी दुपारी पती, भासरा व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

 

संबंधित महिलेची तक्रार व महिला तक्रार निवारण कक्षाच्या अहवालाच्या आधारे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीला वेग देण्यात आला आहे.

- सूरज कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक, गाडगेनगर

टॅग्स :Courtन्यायालय