शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

मेळघाटचे अच्छे दिन येणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 00:11 IST

मेळघाटातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे. येथे नोकरीकरिता आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापल्या ....

अधिकारी-कर्मचारी मुख्यालयातून बेपत्ता : आदिवासी नागरिकांची ससेहोलपटश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे. येथे नोकरीकरिता आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापल्या मुख्यालयी हजर राहून काम करण्याचे वेतन शासन अदा करते. याकरिता आदिवासी क्षेत्रात काम करीत असल्याने विशेष प्रोत्साहन भत्तासुद्धा दिला जातो. परंतु येथील मोठे अधिकारी वर्ग अमरावतीत बसून तर लहान गावपातळीवरील कर्मचारी तालुका ठिकाणी आपले बस्तान मांडून मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे महत्कार्य करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकारामुळे मात्र येथील भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवांची चांगलीच पंचायत होत आहे. पूर्वी मेळघाटात बदली म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना काळ्यापाण्याची शिक्षा समजली जात असे. आता मात्र मेळघाटचे चित्र बदलले असून प्रत्येक गावात रस्त्यांचेजाळे विणण्यात आले आहेत. सर्व प्राथमिक सोयी जवळजवळ सर्वच गावापर्यंत शासनाने पोहोचून दिले आहे. त्यामुळे नवनियुक्त कर्मचाऱ्यांना दुर्गम गावातही काम करणे आता फारसे कठीण राहिलेले नाही. मात्र असे असतानाही अनेक गावांत कर्मचारी मुख्यालयी न राहता धारणी मुख्यालयात राहून आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी देतील का समस्येकडे लक्ष ?गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, वायरमॅन आणि शिक्षक हे ग्राम विकासाचा पाठीचा कणा आहेत. गावातील सर्वसामान्यांशी निगडित प्रत्येक समस्यांशी त्यांना तोंड द्यावे लागतात. परंतु हेच महाभाग मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहून आपला कारभार चालवित असल्याने गावातील विकासात्मक कामे व महत्त्वाच्या दाखल्यापासून सर्वसामान्य आदिवासी बांधव वंचित राहत आहे किंवा त्यांना गावापासून धारणीपर्यंत विनाकारण आर्थिक खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून याकडे विशेष लक्ष देण्याची आशा आदिवासी बांधव करीत आहे.