शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मेळघाटचे अच्छे दिन येणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 00:11 IST

मेळघाटातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे. येथे नोकरीकरिता आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापल्या ....

अधिकारी-कर्मचारी मुख्यालयातून बेपत्ता : आदिवासी नागरिकांची ससेहोलपटश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे. येथे नोकरीकरिता आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापल्या मुख्यालयी हजर राहून काम करण्याचे वेतन शासन अदा करते. याकरिता आदिवासी क्षेत्रात काम करीत असल्याने विशेष प्रोत्साहन भत्तासुद्धा दिला जातो. परंतु येथील मोठे अधिकारी वर्ग अमरावतीत बसून तर लहान गावपातळीवरील कर्मचारी तालुका ठिकाणी आपले बस्तान मांडून मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे महत्कार्य करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रकारामुळे मात्र येथील भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवांची चांगलीच पंचायत होत आहे. पूर्वी मेळघाटात बदली म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना काळ्यापाण्याची शिक्षा समजली जात असे. आता मात्र मेळघाटचे चित्र बदलले असून प्रत्येक गावात रस्त्यांचेजाळे विणण्यात आले आहेत. सर्व प्राथमिक सोयी जवळजवळ सर्वच गावापर्यंत शासनाने पोहोचून दिले आहे. त्यामुळे नवनियुक्त कर्मचाऱ्यांना दुर्गम गावातही काम करणे आता फारसे कठीण राहिलेले नाही. मात्र असे असतानाही अनेक गावांत कर्मचारी मुख्यालयी न राहता धारणी मुख्यालयात राहून आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी देतील का समस्येकडे लक्ष ?गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, वायरमॅन आणि शिक्षक हे ग्राम विकासाचा पाठीचा कणा आहेत. गावातील सर्वसामान्यांशी निगडित प्रत्येक समस्यांशी त्यांना तोंड द्यावे लागतात. परंतु हेच महाभाग मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहून आपला कारभार चालवित असल्याने गावातील विकासात्मक कामे व महत्त्वाच्या दाखल्यापासून सर्वसामान्य आदिवासी बांधव वंचित राहत आहे किंवा त्यांना गावापासून धारणीपर्यंत विनाकारण आर्थिक खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून याकडे विशेष लक्ष देण्याची आशा आदिवासी बांधव करीत आहे.