शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

रुग्णालयात खाटा १४३, रुग्ण २५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:02 IST

जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व जिल्हा स्त्री रुग्णालयात सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात आवक आहे. आकस्मिक रुग्णदेखील रोज १० ते १२ असतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांसह मनुष्यबळ मात्र फारच अल्प आहे.

ठळक मुद्दे‘इर्विन’ मध्ये आरोग्य सेवा कोलमडली : प्रशासनाची उदासीनता कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात मेडिसीनच्या रुग्णांकरिता १४३ खाटांची व्यवस्था असताना, दाखल असलेल्या अडीचशे रुग्णांवर उपचार करावे लागले. त्यामुळे एका खाटावर दोन रुग्णांना, तर काहींना जमिनीवर झोपावे लागत आहे. ही स्थिती अनेक वर्षांपासूनची आहे. याला प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व जिल्हा स्त्री रुग्णालयात सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात आवक आहे. आकस्मिक रुग्णदेखील रोज १० ते १२ असतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत खाटांसह मनुष्यबळ मात्र फारच अल्प आहे. अनेक वर्षांपासून रिक्त जागा भरण्यात न आल्याने एका वॉर्डात एकच सिस्टर, एका परिचारकेला ४० ते ६० रुग्णांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. येथील व्यवस्थेत सुधारणा करणे अत्यंत गरजेचे असून, लोकप्रतिनिधींकडून यासंदर्भात पाठपुरावा गरजेचा झाला आहे. वैद्यकीय उपचार उत्तम असले तरी कर्मचाºयावर ताण वाढू लागला आहे. रजादेखील विचार करूनच घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे.वॉर्ड सहाचा श्वास गुदमरला - वॉर्ड क्रमांक ६ मध्ये सोमवारी दाखल रुग्णांची संख्या ६५ पर्यंत होती. त्यामुळे जेमतेम २२ खाटांवर दोन-दोन रुग्ण असतानाही काही रुग्णांना जमिनीवर उपचार द्यावे लागले. १९ ते २५ आॅगस्ट दरम्यान ९ हजार ८६७ बाह्यरुग्ण तपासणी झाली आहे.२१७ रुग्णांवर उपचार४ मेडिसीन वॉर्ड १ मध्ये २२ खाटा असून, ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. वॉर्ड २ मध्ये ३० खाटांवर २१ रुग्ण, वॉर्ड ६ मध्ये २३ खाटांवर ४८ रुग्ण, वॉर्ड ८ मध्ये ३० खाटांवर २२ रुग्ण, वॉर्ड १० मध्ये २० खाटांवर ३८ रुग्ण, वॉर्ड ११ मध्ये १८ खाटांवर ४० रुग्ण बुधवारी उपचार घेत होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल