शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

विकतच्या महागड्या बियाण्यांपेक्षा घरचे सोयाबीन बियाणे ठरणार पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:12 IST

अमरावती : मागील हंगामात काढणीच्या वेळी व कापणीच्या वेळी आलेल्या पावसाने झालेले नुकसान लक्षात घेता मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन कार्यक्रम ...

अमरावती : मागील हंगामात काढणीच्या वेळी व कापणीच्या वेळी आलेल्या पावसाने झालेले नुकसान लक्षात घेता मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन कार्यक्रम बाधित झाला आहे. आता सोयाबीनचे भावही वाढलेले असल्याने पुढे चांगल्या बियाण्यांचे दरसुद्धा पर्यायाने वाढीव राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्वत:कडील चांगले सोयाबीन विकण्याऐवजी त्याची घरच्या घरी उगवणशक्ती तपासून ते पुढील हंगामात पेरणीसाठी वापरावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे यांनी केले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचे सोयाबीन उपलब्ध आहे, त्यांनी त्यातून स्वत:ची व आपल्या परिचितांची सोयाबीन बियाण्यांची गरज भागविल्यास खर्चात बचत होण्याबरोबरच पुढे कमी प्रतीच्या बियाण्यांमुळे उद्भवणाऱ्या तक्रारींचा मनस्तापसुद्धा टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१ नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच कृषी विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा नियोजन, मागणी अपेक्षित उपलब्धता व संभाव्य अडचणी यांबाबत यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यांचे खरिपाखालील प्रस्तावित क्षेत्र ७ लाख २८ हजार ११२ लक्ष हेक्टर असून सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिके असून सोयाबीन २ लाख ७० हजार हेक्टर, कापूस २ लाख ६१ हजार हेक्टर व तूर १ लाख ३० हजार हेक्टर आणि मूग, उडीद, ज्वारी व इतर पिकांचे ६७ हजार ११२ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.

बॉक्स

सोयाबीन स्वपराग सिंचित पीक

सोयाबीन हे स्वपराग सिंचित पीक असून त्यामध्ये कोणतेही संकरित वाण विकसित झालेले नसल्याने या पिकांचे बियाणे दरवर्षी बाजारातून विकत घेऊन वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही. बाजारातून खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून तयार झालेले उत्पादन पुढे दोन वर्षांपर्यंत बियाणे म्हणून वापरता येते. त्यामुळे जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या सोयाबीनचा साठा आहे, त्यांनी उगवणशक्ती तपासणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

अशी तपासा उगवणशक्ती

प्रत्येक पोत्यातून मूठभर धान्य घेऊन त्यातून सरसकट १०० दाणे वेगळे करून गोणपाटाच्या तुकड्यावर १०-१० च्या रांगेत लावून, त्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून, चांगले पाणी मारून गुंडाळी करून सावलीत ठेवावा. दररोज पाणी मारून तो ओला ठेवावा.सात-आठ दिवसांत दाण्यांना चांगले कोंब येतील. गुंडाळी उघडून १०० दाण्यांपैकी चांगले, निरोगी कोंब आलेल्या दाण्यांची संख्या मोजावी. ती ७० किंवा त्यापेक्षा जास्त आल्यास आपल्या सोयाबीनची उगवण शक्ती प्रमाणित बियाण्यांप्रमाणे आहे हे समजावे.

बॉक्स

सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक चांगले

पेरणी करताना चार ओळींनंतर एक ओळ रिकामी सोडून या ओळीत डवऱ्याच्याला दोरी गुंडाळून सरी पाडावी. बीबीएफ यंत्राद्वारे गादी वाफ्यावर पेरणी करणे, सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने पेरणी करणे, पटा पद्धतीने पेरणी करणे याद्वारेही एकरी सोयाबीनचे १० ते१२ किलो बियाणे कमी करता येऊ शकते. तसेच सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेताना ४-५ ओळींनंतर तुरीची ओळ पेरल्यास सोयाबीन व तुरीचे उत्पन्नही चांगले घेता येऊ शकते.

बॉक्स

१.३० लाख क्विंटल बियाण्यांची नोंदविली मागणी

मागील हंगामात माहे सप्टेंबरपासून सोयाबीन या पिकाचे स्वत:चे बियाणे स्वत: जतन करण्याबाबत जिल्ह्यात विस्तार यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून, त्यामध्ये शेतकऱ्यांनी ९२,६२० क्विंटल सोयाबीन बियाणे जतन करून ठेवलेले आहे. एकूण २.७० लक्ष हेक्टरसाठी ७५ किलो प्रतिहेक्टरप्रमाणे २ लाख १५ हजार क्विंटल बियाणे पेरणीसाठी लागणार असून बियाणे बदलाचे प्रचलित प्रमाणानुसार १ लाख ३० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे.