शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाचे उच्चांकी ८२ टक्के कर्जवाटप, आता रबीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST

अमरावती : यंदाच्या खरिपात जिल्ह्यात दशकात सर्वाधिक ८२ टक्के कर्जवाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यामध्ये ...

अमरावती : यंदाच्या खरिपात जिल्ह्यात दशकात सर्वाधिक ८२ टक्के कर्जवाटप आतापर्यंत करण्यात आलेले आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ९८ टक्के वाटप केलेले असताना राष्ट्रीयीकृत बँका ७४ टक्क्यांवरच स्थिरावल्या आहेत. यंदाचे खरिपाचे कर्जवाटप संपल्याने आता बँकामध्ये रबीच्या कर्जवाटपाची लगबग होणार आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माहितीनुसार, यंदाचे खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकाना १२०१.११ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना बँकांनी आतापर्यंत १,०२,९२१ खातेदारांना ९८८.२६ कोटींचे पीक कर्जवाटप केले आहे. ही ८२ टक्केवारी आहे. यापूर्वी २०१५-१६ चे हंगामात ६५ टक्क्यांपर्यत कर्जवाटप केले होते. त्यानंतर यंदा विक्रमी उच्चांकी कर्जवाटप असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेने दिली.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला कर्जवाटपाचा टक्का माघारला होता. मात्र, कर्जमाफीनंतर दीड लाखांपर्यत कर्ज झाल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला. या सर्व शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

बॉक्स

असे आहे बँकानिहाय कर्जवाटप

राष्ट्रीयकृत बँकाना ६८१.१० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना प्रत्यक्षात ५२,८१८ शेतकऱ्यांना ५८०.३० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ही ७४ टक्केवारी आहे. बँकद्वारा १५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना १२.२२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ८१ टक्केवारी आहे. याशिवाय जिल्हा बँकेने ४०५ कोटींचे लक्ष्य असताना ४९,०८२ शेतकऱ्यांना ३९५.७४ कोटींचे वाटप केले. ही ९८ टक्केवारी आहे.