शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

उच्चशिक्षितांचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 01:19 IST

विद्यमान दशकात ‘एज्युकेशन हब’ अशी ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यात किंबहुना अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकीय आखाड्यात उच्चशिक्षितांचा टक्का २९ वरच आहे. ३४ टक्के उमेदवार दहावीच्या आतील आहे.

ठळक मुद्देराजकीय आखाड्यात शिक्षण : कोणत्या मेरिटवर होते मतदान? ७१ टक्के अंडरग्रॅज्युएट

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यमान दशकात ‘एज्युकेशन हब’ अशी ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यात किंबहुना अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकीय आखाड्यात उच्चशिक्षितांचा टक्का २९ वरच आहे. ३४ टक्के उमेदवार दहावीच्या आतील आहे. त्यामुळे राजकारणात, निवडणुकीत शिक्षणाला दुय्यम स्थान आहे काय, यामध्ये कोणत्या मेरिटवर मतदान होते आदी विषय प्रकर्षाने समोर आले आहेत.राजकारणात उच्चशिक्षितांनी समोर यावे व शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा, अशी हाक राजकीय पक्षांकडून नेहमीच दिली जाते. मात्र, त्याच राजकीय पक्षांकडून उच्चशिक्षितांना राजकारणाच्या आखाड्यात उमेदवारी दिली जाते काय, हा प्रश्नदेखील यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आला आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून पुरेशा प्रमाणात उच्चशिक्षितांना उमेदवारी तर नाहीच; मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी या निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवारी दाखल करणाऱ्या अपक्षांमध्येदेखील उच्चशिक्षितांचे प्रमाण नगण्य आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी २४ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये पाच उमेदवार पदवीधर, दोन पदव्युत्तर व अन्य उमेदवार पाचवी ते अंडरगॅ्रज्युएट आहेत. विशेष म्हणजे, आयोगाकडे दाखल शपथपत्रात बहुतांश उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही एका ओळीत किंवा एका शब्दात संपली. त्यामुळे शिक्षणाच्या पंढरीत राजकीय आखाड्यात शिक्षण हा मुद्दा दुर्लक्षित असल्याचे वास्तव आहे. उमेदवारांची कागदपत्रे व शपथपत्र निवडणूक कार्यालयाच्या प्रसिद्धी फलकावर व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आले.उच्चशिक्षितांचा पुढाकारच नाहीअमरावतीत २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसुळ यांची बी.कॉम., महाआघाडी समर्थित नवनीत राणा दहावी, बसपाचे अरुण वानखडे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका व पत्रकारिता पदविका तसेच वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांची कृषी पदविका अशी शैक्षणिक पात्रता आहे. नीलिमा भटकर (बीई संगणक), प्रमोद मेश्राम (एमए बीपीएड), राजू जामनेकर (एमए समाजशास्त्र), श्रीकांत रायबोले (बीए बीपीएड), पंचशीला मोहोड (बी.एस्सी.), पंकज मेश्राम (बीए), विजय विल्हेकर (प्री बायोलॉजी), संजय आठवले बीए (अंत्य), राजू सोनोने (बीए अंत्य), प्रवीण सरोदे बीकॉम (द्वितीय), नीलेश पाटील (बारावी), अनिल जामनेकर (बारावी), नरेंद्र कठाणे (बारावी), विलास थोरात (बारावी), ज्ञानेश्वर मानकर (दहावी), मीनाक्षी कुरवाडे (दहावी), राहुल मोहोड (दहावी), अंबादास वानखडे (आठवी), राजू मानकर (पाचवी) अशी उमेदवारांची अर्हता आहे.मतदार देतात का राजकीय नेत्यांच्या शिक्षणावर भर?नेत्यांच्या कर्तृत्वाने होतो विकास सिद्धउच्चशिक्षित असल्यासच तो विकास करू शकतो, ही बाब भारतीय राजकारणात गौण आहे. अनेक अंडरग्रॅज्युएट नेत्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केले आहे, असे प्रदीप गौरखडे यांनी सांगितले.शिक्षणाचा टक्का कमी ही चिंतेची बाबराजकारणात शिक्षितांचा टक्का कमी होत आहे. ही चिंतेची बाब आहे. लोकशाही सुदृढ करण्यास उच्चशिक्षितांनी हिरीरीने समोर यायला पाहिजे, तरच लोकशाही टिकेल, असे रवींद्र देशमुख म्हणाले.मतदारांनी शिकवावा मतदानाद्वारे धडामुळात राजकीय पक्षांना शिक्षणामध्ये रस नाही. अलीकडे जात,धर्म, समाज हा मुद्दा वरचढ ठरत आहे. मतदारांनीच यासाठी धडा शिकवावा, अशी प्रतिक्रिया दीपक गोफने यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक