शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महिलांपर्यंत पोहोचलीच नाही हेल्पलाईन

By admin | Updated: November 25, 2015 00:41 IST

अत्याचारग्रस्त आणि पोलीस मदत हवी असणाऱ्या महिलांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाची सेवा आहे.

१२ पोलीस ठाण्यांचाही खो : नियंत्रण कक्षात विशेष पथक; पाच टक्क्यांपेक्षाही कमी महिला जागरुकस्टिंग आॅपरेशनअमरावती : अत्याचारग्रस्त आणि पोलीस मदत हवी असणाऱ्या महिलांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाची सेवा आहे. मात्र, हा क्रमांक महिलांपर्यंत पोहचविण्यात जिल्हा व शहर पोलीस दल अपयशी ठरले. जिल्हाभरातील २९ पैकी १२ पोलीस ठाण्यांमध्ये आजही हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित झालेला नाही. जागतिक महिला अत्याचार विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘महिला हेल्पलाईन’ची सतर्कता तपासण्यासाठी स्टिंग आॅपरेशन केले. त्या दरम्यान उघड झालेली वस्तुस्थिती धक्कादायक आहे. महिलांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्ह्यात विशेष हेल्पलाईन कार्यान्वित असून ग्रामीण व शहर पोलीस हद्दींसाठी १०९१ हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर कुठलीही महिला २४ बाय ७ तक्रार नोंदवू शकते. शहर व ग्रामीण नियंत्रण कक्षांशी हे क्रमांक जोडले गेले आहेत. शहर हद्दीतून आलेल्या तक्रारीनुसार संबंधित पोलीस ठाण्याला लागलीच सतर्क केले जाते. शहरातील सर्व १० पोलीस ठाणे या सेवेशी जोडली आहे. ग्रामीण पोलिसांचीही कार्यपद्धती अशीच आहे. तथापि, एकूण २९ पैकी केवळ १७ पोलीस ठाणेच या हेल्पलाईनची जोडली गेली आहेत.१०९१ या क्रमांकावर पलिकडून महिलेची तक्रार आल्यास सबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही तक्रार नोंदवहीत नोंदविली जाते. त्यानंतर ती तक्रार संबधीत पोलीस ठाणे आणि महिला सेलकडे हस्तांतरीत करण्यात येते. अवघ्या १० ते १५ मिनीटांमध्ये या प्रक्रियेला गती दिली जाते. पोलीस पथकही घटनास्थळी पाठविले जाते. याबाबत पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. हेल्पलाईनची विश्वासार्हता धोक्यात१०९१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्यासाठी महिलाही समोर येत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. बहुतांश महिलांना हेल्पलाईनबाबत माहिती नाही किंवा त्यांना पोलीस ठाणेच जवळचे वाटत असावे, अशी शक्यता नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. दिल्लीमधील निर्भया हत्याकांडानंतर महाविद्यालयीनस्तरावर तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार पेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, आज त्या तक्रार पेट्यांमध्ये तक्रारी नाहीत. अनेक महिने त्याचे कुलूपही उघडत नाही. एकूणच अनास्था बघता हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारीचे निवारण होईलच, अशी शाश्वती अनेक महिलांना नाही. तक्रारीसाठी थेट पोलीस ठाण्यांनाच पहिली पसंती दिली जाते. वर्षभरात जिल्ह्यातून १०९ तक्रारीशहर पोलीस आयुक्तालयाशी १० पोलीस ठाणे संलग्न आहेत. या १० ठाण्यांतर्गत असलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर १ जानेवारी ते २० नोव्हेंबरपर्यंत ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच कालावधीत १७ ग्रामीण पोलीस ठाण्यांना एकूण ९२ तक्रारी प्राप्त झाल्यात. संबंधित पोलीस ठाण्याच्या स्तरावर त्या तक्रारीवरून कारवाई आरंभण्यात आली. जनजागृतीचा अभाव १०० आणि १०१ हे हेल्पलाईन क्रमांक गाव खेड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. १०० म्हणजे पोलीस व १०१ म्हणजे अग्निशमन हे नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. तथापि १०९१ या क्रमांकावर महिलांच्या तक्रारी नोंदविल्या जातात, तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते, हेच मुळी जिल्ह्यातील नागरिकांना ठाऊक नाही. याबाबत जागरुकता असलेल्या नागरिकांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ठोस जनजागृतीची गरज असल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’च्या अभ्यासात पुढे आला. हेल्पलाईन क्रमांकाबाबत जनजागृती मोहिम यापूर्वीच राबविली आहे. अभाव असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा क्रमांक पोहचण्यासाठी माध्यमांची मदत घेवू.-सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त.बिएसएनएलच्या तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी हेल्पलाईन कार्यान्वित नाही. बहुतांश नागरिक १०० क्रमांकाचा वापर करतात. महिलांविषयीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतो. -लखमी गौतम, पोलीस अधीक्षक.