शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

महिलांपर्यंत पोहोचलीच नाही हेल्पलाईन

By admin | Updated: November 25, 2015 00:41 IST

अत्याचारग्रस्त आणि पोलीस मदत हवी असणाऱ्या महिलांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाची सेवा आहे.

१२ पोलीस ठाण्यांचाही खो : नियंत्रण कक्षात विशेष पथक; पाच टक्क्यांपेक्षाही कमी महिला जागरुकस्टिंग आॅपरेशनअमरावती : अत्याचारग्रस्त आणि पोलीस मदत हवी असणाऱ्या महिलांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाची सेवा आहे. मात्र, हा क्रमांक महिलांपर्यंत पोहचविण्यात जिल्हा व शहर पोलीस दल अपयशी ठरले. जिल्हाभरातील २९ पैकी १२ पोलीस ठाण्यांमध्ये आजही हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित झालेला नाही. जागतिक महिला अत्याचार विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘महिला हेल्पलाईन’ची सतर्कता तपासण्यासाठी स्टिंग आॅपरेशन केले. त्या दरम्यान उघड झालेली वस्तुस्थिती धक्कादायक आहे. महिलांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्ह्यात विशेष हेल्पलाईन कार्यान्वित असून ग्रामीण व शहर पोलीस हद्दींसाठी १०९१ हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर कुठलीही महिला २४ बाय ७ तक्रार नोंदवू शकते. शहर व ग्रामीण नियंत्रण कक्षांशी हे क्रमांक जोडले गेले आहेत. शहर हद्दीतून आलेल्या तक्रारीनुसार संबंधित पोलीस ठाण्याला लागलीच सतर्क केले जाते. शहरातील सर्व १० पोलीस ठाणे या सेवेशी जोडली आहे. ग्रामीण पोलिसांचीही कार्यपद्धती अशीच आहे. तथापि, एकूण २९ पैकी केवळ १७ पोलीस ठाणेच या हेल्पलाईनची जोडली गेली आहेत.१०९१ या क्रमांकावर पलिकडून महिलेची तक्रार आल्यास सबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही तक्रार नोंदवहीत नोंदविली जाते. त्यानंतर ती तक्रार संबधीत पोलीस ठाणे आणि महिला सेलकडे हस्तांतरीत करण्यात येते. अवघ्या १० ते १५ मिनीटांमध्ये या प्रक्रियेला गती दिली जाते. पोलीस पथकही घटनास्थळी पाठविले जाते. याबाबत पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. हेल्पलाईनची विश्वासार्हता धोक्यात१०९१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्यासाठी महिलाही समोर येत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. बहुतांश महिलांना हेल्पलाईनबाबत माहिती नाही किंवा त्यांना पोलीस ठाणेच जवळचे वाटत असावे, अशी शक्यता नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. दिल्लीमधील निर्भया हत्याकांडानंतर महाविद्यालयीनस्तरावर तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार पेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, आज त्या तक्रार पेट्यांमध्ये तक्रारी नाहीत. अनेक महिने त्याचे कुलूपही उघडत नाही. एकूणच अनास्था बघता हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारीचे निवारण होईलच, अशी शाश्वती अनेक महिलांना नाही. तक्रारीसाठी थेट पोलीस ठाण्यांनाच पहिली पसंती दिली जाते. वर्षभरात जिल्ह्यातून १०९ तक्रारीशहर पोलीस आयुक्तालयाशी १० पोलीस ठाणे संलग्न आहेत. या १० ठाण्यांतर्गत असलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर १ जानेवारी ते २० नोव्हेंबरपर्यंत ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच कालावधीत १७ ग्रामीण पोलीस ठाण्यांना एकूण ९२ तक्रारी प्राप्त झाल्यात. संबंधित पोलीस ठाण्याच्या स्तरावर त्या तक्रारीवरून कारवाई आरंभण्यात आली. जनजागृतीचा अभाव १०० आणि १०१ हे हेल्पलाईन क्रमांक गाव खेड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. १०० म्हणजे पोलीस व १०१ म्हणजे अग्निशमन हे नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. तथापि १०९१ या क्रमांकावर महिलांच्या तक्रारी नोंदविल्या जातात, तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते, हेच मुळी जिल्ह्यातील नागरिकांना ठाऊक नाही. याबाबत जागरुकता असलेल्या नागरिकांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ठोस जनजागृतीची गरज असल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’च्या अभ्यासात पुढे आला. हेल्पलाईन क्रमांकाबाबत जनजागृती मोहिम यापूर्वीच राबविली आहे. अभाव असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा क्रमांक पोहचण्यासाठी माध्यमांची मदत घेवू.-सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त.बिएसएनएलच्या तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी हेल्पलाईन कार्यान्वित नाही. बहुतांश नागरिक १०० क्रमांकाचा वापर करतात. महिलांविषयीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतो. -लखमी गौतम, पोलीस अधीक्षक.