शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांपर्यंत पोहोचलीच नाही हेल्पलाईन

By admin | Updated: November 25, 2015 00:41 IST

अत्याचारग्रस्त आणि पोलीस मदत हवी असणाऱ्या महिलांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाची सेवा आहे.

१२ पोलीस ठाण्यांचाही खो : नियंत्रण कक्षात विशेष पथक; पाच टक्क्यांपेक्षाही कमी महिला जागरुकस्टिंग आॅपरेशनअमरावती : अत्याचारग्रस्त आणि पोलीस मदत हवी असणाऱ्या महिलांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांकाची सेवा आहे. मात्र, हा क्रमांक महिलांपर्यंत पोहचविण्यात जिल्हा व शहर पोलीस दल अपयशी ठरले. जिल्हाभरातील २९ पैकी १२ पोलीस ठाण्यांमध्ये आजही हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित झालेला नाही. जागतिक महिला अत्याचार विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘महिला हेल्पलाईन’ची सतर्कता तपासण्यासाठी स्टिंग आॅपरेशन केले. त्या दरम्यान उघड झालेली वस्तुस्थिती धक्कादायक आहे. महिलांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्ह्यात विशेष हेल्पलाईन कार्यान्वित असून ग्रामीण व शहर पोलीस हद्दींसाठी १०९१ हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर कुठलीही महिला २४ बाय ७ तक्रार नोंदवू शकते. शहर व ग्रामीण नियंत्रण कक्षांशी हे क्रमांक जोडले गेले आहेत. शहर हद्दीतून आलेल्या तक्रारीनुसार संबंधित पोलीस ठाण्याला लागलीच सतर्क केले जाते. शहरातील सर्व १० पोलीस ठाणे या सेवेशी जोडली आहे. ग्रामीण पोलिसांचीही कार्यपद्धती अशीच आहे. तथापि, एकूण २९ पैकी केवळ १७ पोलीस ठाणेच या हेल्पलाईनची जोडली गेली आहेत.१०९१ या क्रमांकावर पलिकडून महिलेची तक्रार आल्यास सबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही तक्रार नोंदवहीत नोंदविली जाते. त्यानंतर ती तक्रार संबधीत पोलीस ठाणे आणि महिला सेलकडे हस्तांतरीत करण्यात येते. अवघ्या १० ते १५ मिनीटांमध्ये या प्रक्रियेला गती दिली जाते. पोलीस पथकही घटनास्थळी पाठविले जाते. याबाबत पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. हेल्पलाईनची विश्वासार्हता धोक्यात१०९१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्यासाठी महिलाही समोर येत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. बहुतांश महिलांना हेल्पलाईनबाबत माहिती नाही किंवा त्यांना पोलीस ठाणेच जवळचे वाटत असावे, अशी शक्यता नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. दिल्लीमधील निर्भया हत्याकांडानंतर महाविद्यालयीनस्तरावर तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार पेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, आज त्या तक्रार पेट्यांमध्ये तक्रारी नाहीत. अनेक महिने त्याचे कुलूपही उघडत नाही. एकूणच अनास्था बघता हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारीचे निवारण होईलच, अशी शाश्वती अनेक महिलांना नाही. तक्रारीसाठी थेट पोलीस ठाण्यांनाच पहिली पसंती दिली जाते. वर्षभरात जिल्ह्यातून १०९ तक्रारीशहर पोलीस आयुक्तालयाशी १० पोलीस ठाणे संलग्न आहेत. या १० ठाण्यांतर्गत असलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर १ जानेवारी ते २० नोव्हेंबरपर्यंत ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच कालावधीत १७ ग्रामीण पोलीस ठाण्यांना एकूण ९२ तक्रारी प्राप्त झाल्यात. संबंधित पोलीस ठाण्याच्या स्तरावर त्या तक्रारीवरून कारवाई आरंभण्यात आली. जनजागृतीचा अभाव १०० आणि १०१ हे हेल्पलाईन क्रमांक गाव खेड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. १०० म्हणजे पोलीस व १०१ म्हणजे अग्निशमन हे नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. तथापि १०९१ या क्रमांकावर महिलांच्या तक्रारी नोंदविल्या जातात, तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते, हेच मुळी जिल्ह्यातील नागरिकांना ठाऊक नाही. याबाबत जागरुकता असलेल्या नागरिकांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ठोस जनजागृतीची गरज असल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’च्या अभ्यासात पुढे आला. हेल्पलाईन क्रमांकाबाबत जनजागृती मोहिम यापूर्वीच राबविली आहे. अभाव असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा क्रमांक पोहचण्यासाठी माध्यमांची मदत घेवू.-सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त.बिएसएनएलच्या तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी हेल्पलाईन कार्यान्वित नाही. बहुतांश नागरिक १०० क्रमांकाचा वापर करतात. महिलांविषयीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतो. -लखमी गौतम, पोलीस अधीक्षक.