शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

६ हजार हेक्टर बाधित क्षेत्राला मिळणार मदत

By admin | Updated: April 17, 2015 00:23 IST

जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जीवितहानी, वित्तहानी व शेतीपिकांच्या

अवकाळीचे नुकसान : विशेष बाब म्हणून हेक्टरी १० हजार रुपयेअमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जीवितहानी, वित्तहानी व शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिलला घेतला. याविषयी ९ एप्रिलला मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. जिल्ह्यात २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी ४४६ गावे बाधित झाली होती. यामध्ये २ जण दगावले. १२ जण जखमी झालेत. ४२ हजार ७६६ हेक्टर शेतीपिकांचे ५० टक्क्यांच्या आत व ६ हजार १२१ हेक्टर शेतीपिकांचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले. शासन निर्णयानुसार धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यातील ६ हजार १२१ हेक्टर शेतीपिकाला ही मदत मिळणार आहे. शेतीपिके, फळपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २० हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत ही मदत राहणार आहे. कोरडवाहू व ओलिताखालील शेतीसाठी मदतीची किमान मर्यादा ७५० रूपये व बहुवार्षिक फळपिकांकरिता मदतीची किमान मर्यादा १५०० रूपये राहणार आहे. शासन निर्णयानुसार कोरडवाहू पिकाकरिता १० हजार प्रतिहेक्टर, सिंचनाखालील पिकांकरिता १५ हजार रूपये प्रतिहेक्टर, बहुवार्षिक पिकांकरिता २५ हजार रूपये प्रति हेक्टर खरडून गेलेल्या जमिनीकरिता २० हजार रूपये प्रतिहेक्टर व वाहून गेलेल्या जमिनीकरिता २५ हजार रूपये प्रति हेक्टर व २ हेक्टर मर्यादेपर्यंत विशेष बाब म्हणून मदत देण्यात येणार आहे. मृत व्यक्तींच्या वारसांना प्रति व्यक्ती दीड लाख रूपये व मुख्यमंत्री निधीतून एक लाख असे २ लाख ५० हजार देण्यात येणार आहे. मृत जनावरांच्या मालकांना जनावर मोठे असल्यास २५ हजार, मध्यम असल्यास १० हजार, लहान असल्यास ५ हजार रूपये मर्यादेमध्ये देण्यात येणार आहे. पूर्ण उद्धवस्त झालेल्या घरांना ७० हजार रूपये निधी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)अवकाळीने चार तालुके बाधितजिल्ह्यात अवकाळी पावसाने अमरावती, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यातील ४८ हजार ८८७ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यापैकी ५० टक्क्यावर नुकसान झालेल्या ६ हजार १२१ हेक्टर ६९ आर क्षेत्राला विशेष बाब म्हणून मदत मिळणार आहे.कर्जाचे पुनर्गठन, तीन महिन्यांचे व्याज, वीजबिल माफशासनाने जाहिर केलेल्या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. सहकार कर्जाचे पुनर्गठन करण्यात येऊन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्यात येणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जावरील व्याज माफ करण्यात येऊन तिमाही वीज बिलात माफी देण्यात येणार आहे. १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी व फी माफी राहणार आहे. यांना मिळणार मदतफेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे ४ तालुक्यांतील ४९६ गावे बाधित झाले. यामध्ये वीज पडून भातकुली तालुक्यातील २ व्यक्ती मृत झाल्या. दर्यापूर व चांदूररेल्वे तालुक्यामधील १२ व्यक्ती जखमी झाल्या व ६ हजार १२१ हेक्टरमधील शेती पिके व फळ पिकांचे नुकसान झाले. यासाठी विशेष बाब म्हणून शासन मदत देणार आहे.