शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जुलैअखेरपर्यंत दमदार पाऊस

By admin | Updated: July 21, 2015 00:06 IST

मध्यप्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा थोडा महाराष्ट्राकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.

हवामान तज्ज्ञांचा अंदाज नष्ट होणाऱ्या पिकांना जीवनदान   उकाड्या-पासून दिलासाअमरावती : मध्यप्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा थोडा महाराष्ट्राकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने धोक्यात आलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पुढेही हीच स्थिती राहण्याची शक्यता असून अमरावती जिल्ह्यात २० ते २६ जुलैपर्यंत हलका-मध्यम व जुलैच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. यंदा भर पावसाळ्यात उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागले. त्यातच २५ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. मात्र, १९ जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हीच परिस्थिती कायम राहण्याचे संकेत असून जुलैच्या शेवटपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशावर ६ ते ७ किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पंजाब, हरियाणा, आसाम मेघालयावरसुध्दा चक्राकार वाऱ्यांचे सावट आहे. त्यातच लवकरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटक ते केरळ द्रोणीय स्थिती असून ती आणखी मजबूत झाल्यास महाराष्ट्रात पाऊस पडण्याकरिता फायदेशीर ठरणार आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय) गंगानगर, ग्वालियर ते बंगालच्या उपसागरापर्यंत झुकत असल्यामुळे पावसाची दाट शक्यता असल्याचे मत हवामानतज्ज्ञांचे आहे. या परिस्थिीतीमुळेच अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी केली नसेल तर त्यांनी तत्काळ पेरणी करावी. शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. सोयाबीनमध्ये आवश्यक असल्यास तणनाशक वापरू शकता. सर्व पिकांवर बुरशीनाशकाची फवारणी करुन घेणे आवश्यक आहे. मोड आलेल्या शेतात तूर, तीळ, मका, सूर्यफूल हे कमी कालावधीचे सोयाबीणचे वाण पेरता येईल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. आपत्कालीन पीक नियोजनपाऊस वेळेवर न येणे, पेरणीनंतर पावसात खंड पडणे, पाऊस लवकर संपणे या हवामानाच्या अनिश्चितपणामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय उपयायोजना कराव्यात, याकरिता अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने उपाययोजना सुचविल्या आहेत. नियमित पावसाळा पाच आठवड्यापेक्षा अधिक उशिरा सुरु झाल्यास (२३ ते २९ जुलै) वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. ंजी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर होती त्यांना पावसाने जीवनदान दिले आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. नागरिकांनी पाणी साठवून पाण्याचा योग्य वापर करावा. - एस.आर. सरदार,विभागीय कृषी सहसंचालक.