शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

जुलैअखेरपर्यंत दमदार पाऊस

By admin | Updated: July 21, 2015 00:06 IST

मध्यप्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा थोडा महाराष्ट्राकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.

हवामान तज्ज्ञांचा अंदाज नष्ट होणाऱ्या पिकांना जीवनदान   उकाड्या-पासून दिलासाअमरावती : मध्यप्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा थोडा महाराष्ट्राकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने धोक्यात आलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पुढेही हीच स्थिती राहण्याची शक्यता असून अमरावती जिल्ह्यात २० ते २६ जुलैपर्यंत हलका-मध्यम व जुलैच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. यंदा भर पावसाळ्यात उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागले. त्यातच २५ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. मात्र, १९ जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हीच परिस्थिती कायम राहण्याचे संकेत असून जुलैच्या शेवटपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशावर ६ ते ७ किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पंजाब, हरियाणा, आसाम मेघालयावरसुध्दा चक्राकार वाऱ्यांचे सावट आहे. त्यातच लवकरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटक ते केरळ द्रोणीय स्थिती असून ती आणखी मजबूत झाल्यास महाराष्ट्रात पाऊस पडण्याकरिता फायदेशीर ठरणार आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय) गंगानगर, ग्वालियर ते बंगालच्या उपसागरापर्यंत झुकत असल्यामुळे पावसाची दाट शक्यता असल्याचे मत हवामानतज्ज्ञांचे आहे. या परिस्थिीतीमुळेच अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी केली नसेल तर त्यांनी तत्काळ पेरणी करावी. शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. सोयाबीनमध्ये आवश्यक असल्यास तणनाशक वापरू शकता. सर्व पिकांवर बुरशीनाशकाची फवारणी करुन घेणे आवश्यक आहे. मोड आलेल्या शेतात तूर, तीळ, मका, सूर्यफूल हे कमी कालावधीचे सोयाबीणचे वाण पेरता येईल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. आपत्कालीन पीक नियोजनपाऊस वेळेवर न येणे, पेरणीनंतर पावसात खंड पडणे, पाऊस लवकर संपणे या हवामानाच्या अनिश्चितपणामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय उपयायोजना कराव्यात, याकरिता अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने उपाययोजना सुचविल्या आहेत. नियमित पावसाळा पाच आठवड्यापेक्षा अधिक उशिरा सुरु झाल्यास (२३ ते २९ जुलै) वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. ंजी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर होती त्यांना पावसाने जीवनदान दिले आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. नागरिकांनी पाणी साठवून पाण्याचा योग्य वापर करावा. - एस.आर. सरदार,विभागीय कृषी सहसंचालक.