शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST

अमरावती : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने १४ पथके तालुकास्तरावर तयार केली ...

अमरावती : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने १४ पथके तालुकास्तरावर तयार केली आहेत. संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवणे आणि या काळात अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ही पथके कार्यरत राहणार आहेत.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, अस्वस्थ वाटणे, थकवा वाढणे, डेंग्यू, मलेरिया आणि साथरोगांचा फैलाव होतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये आरोग्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याबाबाबत नियोजन सुरू आहे. यासाठी जिल्हाभरात विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय एक पथक, तालुकास्तरीय १४ पथके व जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथक २४ तास कार्यरत असून, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यरत राहणार आहे. दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात काही प्रमाणात साथीचे रोग पसरतात. त्यामुळे यंदा एक जूनपासून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिण्यात येते. त्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार पसरतात. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे पथके स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णांना सेवा देण्यासाठी सर्व यंत्रणांना सूचना करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

बॉक्स

अशी घ्या काळजी

पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे नमुने तपासण्यात यावेत, नळ गळती असल्यास त्याची तात्काळ दुरुस्ती करावी.

पाणी शुद्धीकरण करावे, याशिवाय खाजगी नळ कनेक्शन गटाराखालून जात असेल, तर त्याची गळती होत नसल्याची पाहणी करावी, तसेच घनकचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

कोट

पावसाळ्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामस्थांनी पावसाळ्यामध्ये आठवड्यातून दोन दिवस कोरडा दिवस पाळावा. नेहमी घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी, तसेच पाणी गाळून शुद्धीकरण करून किंवा शक्य झाल्यास गरम करून प्यावे, यामुळे नागरिकांना साथीच्या रोगांपासून बचाव करतात येऊ शकतो.

मनीषा सूर्यवंशी

साथरोग वैद्यकीय अधिकारी, अमरावती