शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसमोर तो राँगसाइड आला, युवतीला धडक देऊन पुन्हा राँगसाइड गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST

छायाचित्रे आहेत. फोटोओळ - १. वाहतूक पोलिसांसमोर राँगसाइड आलेल्या युवकाने युवतीच्या वाहनाला धडक दिल्यानंतरची स्थिती २. पोलिसांनी त्या युवतीला ...

छायाचित्रे आहेत.

फोटोओळ - १. वाहतूक पोलिसांसमोर राँगसाइड आलेल्या युवकाने युवतीच्या वाहनाला धडक दिल्यानंतरची स्थिती

२. पोलिसांनी त्या युवतीला रवाना केल्यावर अपघात घडवून आणणारा तो युवक पोलिसांसमोर पुन्हा असा राँगसाइड गेला.

अमरावती : असुरक्षित वाहतुकीचा शहरात झालेला सुळसुळाट आणि त्याकडे कॅज्युअलपणे बघण्याची वाहतूक पोलिसांची दृष्टी याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आला.

मोर्शी मार्गालगत कार सजावटीच्या दुकानदारांचा व्यवसाय थेट रस्त्यावर चालतो. व्यवसायानुकूल रस्ते बघूनच व्यावसायिकांनी मोर्शी मार्गावर दुकाने थाटली आहेत. शिवाय सदर हद्द ज्या वाहतूक पोलिसांच्या आणि ठाण्याच्या अखत्यारित येते ते पोलीसही व्यावसायिकांना रस्त्यांचा वापर करू देण्यास अनुकूल असल्यामुळे त्या व्यवसायाला बळ मिळाले. मोर्शी मार्गावरील वाहतूक त्यामुळे जीवघेणी झाली आहे. रोजच अपघात घडत असतात. ‘लोकमत’ने हा मुद्दा लोकदरबारात उचलून धरल्यावर मंगळवारी वाहतूक पोलीस जिल्हा स्टेडियमसमोर पोहोचले. त्यांच्या उपस्थितीतच विरुद्ध दिशेने (राँगसाइड) वेगात आलेल्या दुचाकीचालकाने योग्य दिशेने जाणाऱ्या स्कूटीचालक मुलीला जोरदार धडक दिली. मोठ्ठा आवाज झाला. मुलगी रस्त्यावर धाडदिशी फेकली गेली. तिला उभे राहता येत नव्हते. पोलीस आणि काहींनी हात धरून तिला उचलले. एका वाहनाचा आधार घेऊन ती कशीबशी उभी राहिली खरी; परंतु तिला प्रचंड वेदना होत होत्या. पायाला गंभीर दुखापत झाली होती. चप्पलही घालता येत नव्हती. घाबरलेली होती. तक्रार करावी, न्याय मागावा, अशी त्या मुलीची मन:स्थिती नव्हती. तिच्या अधिकारांची तिला जाणीवही नसावी. काही वेळाने पोलिसांनी तिच्या पायात चप्पल घालून दिली, तिची स्कूटी तिच्या हाती दिली. एका पायाच्या भरवशावर कशीबशी ती स्कूटी चालवत निघून गेली.

या क्षणापर्यंत धडक देणारा मुलगा त्याच्या वाहनाची चाचपणी करीत थांबलेला होता. मुलगी गेल्यावर तेथे तैनात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी काहीतरी बोलून तो तरुण पुन्हा राँगसाइड वाहनावर स्वार होऊन निघून गेला. पाेलिसांसमोर विरुद्ध दिशेने येऊन, अपघात घडवून, पोलिसांसमोरच पुन्हा विरुद्ध दिशेने वाहन नेले जात असेल तर अमरावती शहरात वाहतूक पोलिसांची नेमणूक कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय करायला हवे होते?

पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात घेणे. वाहन विरुद्ध दिशेने चालविण्यासाठी चालान देणे. अपघात घडवून आणण्यासाठी

गुन्हे नोंदविणे, अपघात घडविणारे वाहन ताब्यात घेणे. तक्रार द्यावयाची असल्यास अपघातग्रस्त मुलीला मदत करणे. उपचारासाठी जखमीला वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे. किमान कुटुंबियांना घडलेल्या अपघाताबाबत माहिती देणे.

पाेलिसांवर कारवाई का नाही?

वाहतूक नियंत्रणासाठी शहरभरात तैनात केलेले पोलीस खरेच वाहतूक नियंत्रित करतात की कसे, हे तपासणारी यंत्रणा निष्प्रभ आणि निष्क्रिय आहे. वाहतूक पोलिसांची अडचण उद्‌भवणार नाही, याची खात्री असल्यामुळेच थेट वर्दळीच्या रस्त्यांवर व्यवसाय थाटले गेले आहेत. थाटले जात आहेत. चार-दोन दुकानदारांच्या लाभासाठी हजारो, लाखो लोकांच्या जीविताशी जीवन-मृत्यूचा खेळ खेळला जातो. माेर्शी मार्गावरील उदाहरण येथे नमूद केले आहे. शहरभरात हेच चित्र आहे. वाहतूक नियंत्रण हे जर वाहूतक पाेलिसांचे कर्तव्य असेल तर ते पार न पाडणाऱ्या पोलिसांवर कारवाई का केली जाऊ नये.