शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

निर्णय बदलाची हॅट्ट्रिक मका उत्पादकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST

शेतकऱ्यांची थट्टा, सरासरी उत्पादनाच्या मर्यादा ठरेना : कृषी विभाग, महामंडळ तळ्यात-मळ्यात श्यामकांत पाण्डेय धारणी : आदिवासी विकास महामंडळातर्फे ...

शेतकऱ्यांची थट्टा, सरासरी उत्पादनाच्या मर्यादा ठरेना : कृषी विभाग, महामंडळ तळ्यात-मळ्यात

श्यामकांत पाण्डेय

धारणी : आदिवासी विकास महामंडळातर्फे ७ नोव्हेंबरपासून मक्याची खरेदी सुरू झाली आहे. मात्र, वेळोवेळी प्रतिहेक्टर सरासरी उत्पादनाच्या नावाखाली शासनाकडून नवनवे दिशानिर्देश येत असल्याने सरकारने आमची थट्टा चालविली आहे का, असा प्रश्न मका उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तब्बल तीनदा याबाबतचे निर्णय फिरविण्यात आले. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा झालेला मका खासगी बाजारात कवडीमोल दराने विकावा का? याचे उत्तर आदिवासी विकास महामंडळाने द्यावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा मेळघाटच्या शेतकऱ्यांना मक्याचे बंपर उत्पादन झाले. त्यांची खासगी बाजारात लूट होऊ नये, यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली. मात्र, हमीभावाने शेतकऱ्यांकडून किती मका खरेदी केला जाईल, याबाबत मर्यादा ठरवून देण्यात आली. सुरुवातीला प्रतिहेक्टर ३९ क्विंटलप्रमाणे मका खरेदी करण्यात आला. १५ दिवसांनंतर शासनाकडून प्रतीहेक्टर ३० क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांकडून मका खरेदी करावा, असे नवीन निर्देश प्राप्त झाले आहे. त्यामुळे नऊ क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांना मका परत करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांची चांगलीच फरफट झाली. परंतु आता पुन्हा शासनाने प्रती हेक्टरी २८ क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याचे पत्र पाठवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. आता पुन्हा दोन क्विंटल अतिरिक्त खरेदी केलेला मका शेतकऱ्यांनी परत घेऊन जावा, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाने केला आहे.

सातबारावर असलेली मक्याची नोंद व प्रत्यक्षात झालेल्या उत्पादनातील तफावत पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळघाट विधानसभा अध्यक्ष हुकुमचंद मालवीय यांनी शेतकऱ्यांच्यावतीने आदिवासी विकास महामंडळ आणि सहायक जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही. उलट रोज नवनवे परिपत्रक काढून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. एक महिन्यापासून मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाही. यावर सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या संचालक मिताली सेठी यांनी सन्मानजनक तोडगा काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

माल परत न्यायचा कसा?

अतिरिक्त खरेदी करण्यात आलेला मका शेतकऱ्यांनी घेऊन जावा, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाने केले आहे. त्यामुळे तो धान्यमाल आता घरी कसा आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. धारणी तालुक्यातील अनेक गावे अतिशय दुर्गम क्षेत्रात आहेत. वाहतुकीची साधने अत्यल्प आहेत. अशा परिस्थितीत दोन चार शेतकरी एकत्र येऊन भाड्याची वाहने सांगून आपला धान्यमाल शहरात विकण्यास आणतात. आता तो पुन्हा घरी परत आणायचा असेल तर पुन्हा वाहनभाडे द्यावे लागेल, त्यापेक्षा तो धान्यमाल धारणीतच खासगी बाजारात कवडीमोल दरात विकण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय नाही.