शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तरुणाईच्या हाती स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा लढा

By admin | Updated: August 7, 2014 23:41 IST

वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी फार पूर्वीची आहे; मात्र त्याकडे राज्यकर्त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने आंदोलकर्त्यांमध्ये काहीशी अनास्था आहे. परंतु केंद्रातील सरकार लहान

अमरावती : वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी फार पूर्वीची आहे; मात्र त्याकडे राज्यकर्त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने आंदोलकर्त्यांमध्ये काहीशी अनास्था आहे. परंतु केंद्रातील सरकार लहान राज्यांचे पुरस्कर्ते आहे. म्हणून भाजपच्या अजेंड्यावर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ९ आॅगस्टला क्रांतिदिनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी ‘रेल देखो- बस देखो’ हे अभिनव आंदोलन केले जाणार आहे. याच दिवशी विदर्भ बंधन बांधले जाईल. या आंदोलनाची धुरा तरुणाईच्या हाती राहणार असल्याची माहिती ‘जन मंच विदर्भाचा’ संघटनेचे अतुल गायगोले यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वेग घेते. पण, कालांतराने ती थंड होते. या कारणाचा शोध घेतला असता राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी हा लढा सुरु करताना आता चारित्र्यवान युवक आणि अराजकीय कार्यक र्त्यांची फळी निर्माण करण्याचे ठरविले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे फायदे, शिक्षण, रोजगार आदी विषय गावखेड्यात पोहोचविण्यासाठी तरुणांची फळी निर्माण करण्यात आल्याचे गायगोले यांनी सांगितले. केंद्रातील मोदी शासन लहान राज्य निर्मितीचे पुरस्कर्ते असून हे शासन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करेल यात दुमत नाही. मात्र, ही मागणी गतिशील व्हावी, याकरिता शेतकरी, कलावंत, विचारवंत, विद्यार्थी, महिला आदींचा सहभाग गरजेचा आहे. त्यामुळे हा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे संघटनेचे संयोजक बबन बेलसरे म्हणाले. ही चळवळ ग्रामीण भागात पोहोचविणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. ‘गाव चलो अभियान’ यानुसार प्रत्येक गाव पिंजून काढले जाईल, असे अतुल यादगिरे यांनी सांगितले. ९ आॅगस्ट रोजी शहरातील प्रमुख चौकातून बुलेट रॅली काढण्यात येईल. ही रॅली प्रमुख आकर्षण राहणार आहे. तरुणाईचे पथनाट्य, नृत्याव्दारे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी बंधन बांधले जाणार असल्याची माहिती सुशील पडोळे यांनी दिली. हे आंदोलन शांततेच्या मार्गांने चालणार असून ‘रेल देखो- बस देखो’ आंदोलनाप्रसंगी भजन- कीर्तन करुन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीकडे जनतेचे लक्ष वेधले जाणार असल्याचे विजय विल्हेकर यांनी सांगितले. या अभिनव आंदोलनात तरुणाईने मोठ्या संख्येने सामील होऊन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा लढा उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन अतुल गायगोले यांनी केले. पत्रपरिषदेला बबन बेलसरे, विजय विल्हेकर, अतुल यादगिरे, सुशील पडोळे, अतुल खोंड, जयदीप सराफ, सुशील बडनेरकर, प्रदीप पाटील, वसुसेन देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)