शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

विद्यार्थ्यांची प्रकरणे जलदगतीने हाताळा

By admin | Updated: June 5, 2014 23:42 IST

जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर व तत्सम प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी दाखल प्रकरणे तीन ते चार दिवसांत निकाली काढा, असे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी तालुक्यातील सेतू केंद्रांना दिले.

अंजनगाव सुर्जी : जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर व तत्सम प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी दाखल प्रकरणे तीन ते चार दिवसांत निकाली काढा, असे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी तालुक्यातील सेतू केंद्रांना दिले. बारावीचा निकाल लागला असून दहावीचाही निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकाल लागताच पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात झुंबड सुरू होते. प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी उसळणार आहे. त्यामुळे अशी प्रकरणे सेतू केंद्र धारकांनी व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने हाताळावीत, अशी सूचना उपविभागीय अधिकारी सोहम वाचाळ यांनी सेतू केंद्रधारकांना दिली. यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सेतू केंद्र धारकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी वाचाळ पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रकरणे हाताळण्यात दिरंगाई झाल्यास पुन्हा नव्याने प्रकरणे सादर करावी. परंतु कोणत्याही प्रकरणास चार दिवसांपेक्षा अधिक उशीर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सेतू केंद्रांच्या कार्यप्रणालीत पादर्शकता बाळगण्यात  यावी. सर्व सेतू केंद्रांनी आपल्या कामाच्या स्वरूपाचे भावफलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावेत. कागदपत्रांची मांडणी व्यवस्थित ठेवावी. जात प्रमाणपत्रासाठी आधी मुलाचे, नंतर वडिलाचे, शेवटी आजोबांचे व त्यानंतर महसुली पुरावे जोडण्यात यावेत. सर्व प्रकरणांत नियमानुसारच शुल्क आकारणी करावी. केंद्रात आलेल्या ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचनाही उपविभागीय अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.यावेळी सेतू केंद्र धारकांच्यावतीनेही अडचणी मांडण्यात आल्या. केंद्रावर वाढलेल्या गर्दीमुळे ओळखपत्र आदी कागदपत्रांची शहानिशा करणे, हे कठीण काम ठरते. अनेक ग्राहक स्वत:चे ओळखपत्र न आणता प्रतिज्ञापत्र देण्याचा हट्ट करतात. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तिंना असे प्रमाणपत्र द्यावे लागते. वेगवेगळ्या सेतू केंद्रात वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत असल्याचा आरोप  यावेळी सेतू केंद्र संचालकांकडून नाकारण्यात आला. यावर्षीपासून विद्यार्थ्यांंना वेळेत प्रमाणपत्र मिळतील