शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट

By admin | Updated: May 12, 2015 00:15 IST

विदर्भातील वातावरण बदलामुळे काही ठिकाणी मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारपीट व ११ ते १५ मे दरम्यान तुरळक ...

हवामान तज्ज्ञांचा अंदाज ११ ते १५ मे दरम्यान वातावरणात बदल अमरावती : विदर्भातील वातावरण बदलामुळे काही ठिकाणी मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारपीट व ११ ते १५ मे दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. भर उन्हाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे जनतेची चिंताही वाढली आहे. अफगाणिस्थानच्या आसपासच्या भागावर चक्राकार वारे वाहात असून मध्य प्रदेश, तामिळनाडू ते विदर्भावर कमी दाबाची द्रोणिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हरियाणा, गांगेय, पश्चिम बंगाल, मलय बेटाच्या १५०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पावसासाठी अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मध्यभारतात कमाल तापमान २ ते ३ डिग्री सेल्सीअसने कमी होणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचा जोर वाढला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह शहरवासियांनाही हैराण केले होते. त्यातच पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)सद्यस्थितीत वातावरण पावसासाठी अनुकूल आहे. त्यामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. ११ ते १५ मे दरम्यान काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळू शकतो. काही ठिकाणी गारपीटही संभवते. यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. - अनिल बंड, हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.