शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दहिगाव परिसरात गारपिटीने कोट्यवधींची हानी

By admin | Updated: October 11, 2014 01:04 IST

तालुक्यातील दहीगाव पूर्णा येथे सोमवारी झालेल्या गारपीट मुळे कपाशी, संत्रा, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे.

चांदूरबाजार : तालुक्यातील दहीगाव पूर्णा येथे सोमवारी झालेल्या गारपीट मुळे कपाशी, संत्रा, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे.सोमवारी सायंकाळी परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावली. दहीगाव पूर्णा, लसनापूर, कृष्णापूर भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली यामध्ये दहीगाव पूर्णा येथील संत्रा पिकाचे नुकसान झाले. या भागात संत्रा, कपाशी, सोयाबीन या पिकांच्या पेरा अधिक असून या शेतकऱ्यांचा शेती व्यतिरिक्त कोणताच जोडधंदा नसल्याने परिसरातील शेतकरी हा पूर्णत: शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सुलतानी संकटासह आस्मानी संकटाला सुध्दा सामोरे जावे लागते. दहीगाव, कृष्णापूर भागात झालेल्या गारपिटीने परिसरातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर जमीनीवरील पिकाचे नुकसान झाले आहे. शेतात गारांचा सळा शिंपल्यागत यामुळे संत्राची सर्वाधिक गळती झाली तर सुसाट वाऱ्याने सोयाबीन, कपाशी ही पिके झोपून गेली आहे. या भागात कोट्यवधींचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना शासनाने मदत करावी, या अनुषंगाने शेकडो शेतकरी तहसील कार्यालयात पोहचले होते.दहीगाव येथील रवीन्द्र वैद्य यांचा संत्रा बगीचा ३ लाख रुपयाला व्यापाऱ्यांनी मागितला होता. मात्र अवघ्या २४ तासांतच काळाने घात केला व गारपिटीमुळे संपूर्ण संत्रा गळून पडला. पूर्वीच कर्जाचे डोंगर, त्यावर आता वर्षभर स्वत:ची उपजीविका कशी चालवावी, असा गंभीर प्रश्न वैद्य यांचा पुढे उभा ठाकला आहे. पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी सुरेश पाटील, आशीष वैद्य, गौरव वैद्य, शंतनू पुसतकर, महेश वैद्य, विनायक चौधरी, प्रतीक काळे, नारायण वैद्य, अतुल वैद्य, पवन निंघोट, प्रभाकर वैद्य, प्रल्हाद वैद्य यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.