शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

आरोग्यदायिनी आजाराच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:15 IST

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : गावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजावणाऱ्या आरोग्यदायिनींवर कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात कामाचा बोजा ...

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : गावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजावणाऱ्या आरोग्यदायिनींवर कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात कामाचा बोजा वाढल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनाच रक्तदाब, मधुमेह तसेच अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़

जिल्ह्यात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर ३३६ उपकेंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये चारशेच्या अधिक आरोग्य सेविका बजावतात. दोन वर्षे कोरोना, तर सध्या संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले असल्यामुळे या आरोग्य सेविका अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यांच्या दैनंदिन कामकाजांचा आढावा घेतला असता, वाढत्या धावपळीत स्वत:चे आरोग्य सांभाळणे कठीण झाले असल्याची बाब समोर आली आहे. मागील दोन वर्षांमध्ये जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम केले. अनेकींना व त्यांच्या कुटुंबीयांना आजाराने गाठले.

जबाबदारीत वाढ

गावात एखाद्या व्यक्तीला रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, असे आजार असल्यास रुग्णांना औषोधपचार करण्यासाठी शहराच्या दवाखान्यात नेण्याचे काम आरोग्य सेविकांना देण्यात आले. गावात दिवसभर राबराब रुग्णांची सेवा व सर्वेक्षण करताना व्हिलेज बॅरिस्टरचाही त्रास सहन करावा लागतो. उपकेंद्र बंद दिसले की, थेट जिल्हा पातळीवर करण्यात येते.

असामाजिक घटकांना आळा घाला

राष्ट्रीय ग्रामीण अभियान सन २००५ पासून सुरू झाले. उपकेंद्र बळकटीसाठी १० हजार व अबंधित निधी १० हजार असे २० हजार रुपये वर्षाकाठी मिळतात. सरपंच व आरोग्य सेविकेच्या नावाने हे खाते असले तरी आरोग्य उपकेंद्राऐवजी लोकप्रतिनिधी स्वमर्जीने या निधीचा विल्हेवाट लावतात व त्यानंतर बनावट बिल सादर करण्यासाठी आरोग्य सेविकांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याची अनेक उदाहरणे तालुक्यात आहेत. एकीकडे ग्रामपातळीवर आरोग्य सेविकांना काही असामाजिक घटक त्रास देण्याचे काम करतात. दुसरीकडे प्रशासनही सहकार्य करीत नसल्याची कैफियत काही आरोग्य सेविकांनी मांडली आहे़

स्वत:चे आरोग्य सांभाळावे कसे?

पावसाळ्यात आरोग्य सेविकांना अधिक सर्तक राहावे लागते. यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातले. दररोज रक्त तपासणी करणे, प्रत्येक गावाचा दौरा करणे, ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेताना स्वत: चे आरोग्य सांभाळावे कसे, असा सवाल या आरोग्य सेविकांपुढे निर्माण झाला आहे.