शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

ग्रामपंचायतींना मिळणार ५० कोटी

By admin | Updated: January 6, 2016 00:08 IST

चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत २०१५-१६ या वर्षासाठी दोन हप्त्यांपोटी ५० कोटींचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला.

जितेंद्र दखने अमरावतीचौदाव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत २०१५-१६ या वर्षासाठी दोन हप्त्यांपोटी ५० कोटींचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला. काही दिवसांपूर्वीच शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्यामुळे ग्रामपंचायतींना हा निधी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात लोकसंख्येची फेरतपासणी केली जात आहे. १४ व्या वित्त आयोगामुळे ग्रामीण विकासासाठी ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध होणार आहे. ‘आमचं गाव - आमचा विकास’ अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार केल्या जाणार आहे. जिल्हा परिषदेला यासाठी पहिल्या हप्त्यापोटी २५ कोटी २१ लाख ४७ हजार तर दुसऱ्या हप्त्यापोटी २५ कोटी २१ लाख ४७ हजारांचा निधी उपलब्ध झाला. एकूण ५०.४२ कोटी रुपये उपलब्ध झालेत. या संदर्भात शासनाने निधी विनियोगाबाबत मागदर्शक सूचना दिल्याने निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला. या निधीतून ग्रामपंचायत क्षेत्रात पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांचा विकास, वीज देयकात बचत करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी बांधकाम, सौर पथदिव्यांचा वापर करणे आदी कामे करण्याचा प्राधान्यक्रम २१ डिसेंबरला ठरवून दिला आहे. प्राधान्यक्रमानुसार ग्रामपंचायत स्थानिक गरजांच्या आवश्यकतेनुसार कामांचा ठराव करणार आहे. त्यानंतर या कामांची तालुकास्तरीय समितीकडे छाननी केली जाईल. यानिधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा हिशेब व माहिती संगणकीय प्रणालीत संकलीत करणे अनिवार्य आहे. आर्थिक विषयक माहिती ‘एसआयएमएनआयसी’ या प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर आहे. तर गटविकास अधिकाऱ्यांवर कामांच्या संनियंत्रणाची जबाबदारी टाकण्या आली आहे. परंतु प्रत्यक्ष निधी वाटप होण्यासाठी अर्थ विभागाकडून प्रस्तावाची तपासणी केली जाणार आहे. त्यातील त्रुटी दूर झाल्यानंतरच ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष निधीचे वितरण होवू शकेल.