शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत देणार जन्म-मृत्यू, विवाहप्रसंगी रोपट्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 21:53 IST

वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेंट प्रूफव्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देनोंदी घेणार : वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना

आॅनलाईन लोकमतअमरावती : वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेंट प्रूफव्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत बालकांचा जन्म, विवाह, गुणवंत विद्यार्थी, जन्म-मृत्यू व विवाहप्रसंगी रोपटे भेट देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी संबंधितांवर राहील.‘वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत या वर्षात राबण्यिात येणार आहे. याकरिता रोपे उपलब्ध करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. यावर्षी तापमानात मोठी वाढ होणार आहे. त्यांचा परिणाम पर्जन्यमान, उष्णता व आर्द्रतेवर होणार आहे. पृथ्वीतलावरील जीवसृष्टीने त्या वातावरणात तग धरावी, यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याचे आव्हान शासनापुढे आहे. त्या वातावरणीय बदलास पूरक ठरणाºया गावांच्या निर्मितीचा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्यामध्ये गावपातळीवरील लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबविणे, जलसंधारण, डोंगर दत्तक घेणे, नदी दत्तक घेणे, गावतळे, गावाची वनराई, योजनांचा विकास करणे, गावनिहाय सौर ऊर्जा, पवन उर्जा आधारित स्वतंत्र ग्रिड तयार करून ऊर्जा निर्भर गावांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी महत्वाची असलेल्या वृक्षलागवडीची जबाबदारी ग्रामपंचायतींवर देण्यात आली. त्यासाठी येत्या वर्षभरात गावात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक कुटुंबाकडून रोपांची लागवड व्हावी, त्यांचे संगोपन व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीकडून रोपे देण्याची तयारी सुरू आहे.माहेरची झाडे, स्मृती वृक्षही लावणारग्रामपंचायतीला ठरवून दिल्याप्रमाणे गावात नव्याने जन्माला आलेल्या बालकांचे स्वागत फळझाडाच्या रूपात शुभेच्छा देऊन केले जाईल. कुटुंबीयांना बाळाप्रमाणे संवर्धन करण्याची गळ घातली जाईल. गावातील तरुणांच्या विवाहप्रसंगी शुभमंगल वृक्ष, तसेच मुलीच्या विवाहप्रसंगी माहेरची झाडे म्हणून रोपटे दिले जातील. गुणवंत विद्यार्थी, नोकरी मिळालेले, निवडणुकीत विजयी होणाºया उमेदवारांनाही आनंदवन म्हणून रोप दिले जातील. गावात निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी सांत्वन भेटीदरम्यान स्मृतीरोपटे देऊन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.१ जुलैपासून वाटप१ जुलै ते ३० जून या कालावधीतील सर्वच घटना, प्रसंगाची माहिती घेऊन गरजेनुसार रोपे मागवावी, त्या रोपांचे वाटप १ जुलै रोजी एकाच दिवशी केले जाईल. रोप वाटपापूर्वी गावात वृक्षदिंडी काढली जाणार असून, वाटपप्रसंगी रोपांची नोंद ग्रामपंचायत नोंदवहीत घेणार आहे.