शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

हरभरा धोक्यात, घाटेअळीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: January 29, 2015 22:59 IST

रबी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असणाऱ्या हरभऱ्यावर वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त

अमरावती : रबी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक असणाऱ्या हरभऱ्यावर वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबीच्या हरभऱ्यावर होती. मात्र घाटेअळींचा प्रादुर्भावामुळे सरासरी उत्पन्नात कमी येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रबीसाठी १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी एक लाख १० हजार ५६९ हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र आहे. रबीच्या एकूण क्षेत्राच्या ७१ टक्के क्षेत्रावर हरभरा आहे. खरिपाच्या हंगामात पावसाच्या १२० दिवसांपैकी केवळ ४३ दिवस पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ८५० ते ९०० मिली सरासरी पाऊस पडायला पाहिजे. परंतु यंदा ५५० मिली पाऊस पडला त्यामुळे रबी हरभराची उगवणशक्ती कमी झाली. मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील हरभराची जमिनीत आर्द्रतेअभावी वाढ खुंटली आहे. खरिपाचा हंगाम लांबणीवर पडल्याने रबीचा हंगाम देखील दीड महिन्यांनी माघारला. काही भागातील हरभरा हा सध्या फुलोऱ्यावर आहे. काही भागात हरभऱ्याला घाटे याययला सुरुवात झाली आहे. जानेवारीच्या प्रारंभापासून वातावरणात बदल, ढगाळ वातावरण, धुके, थंडी तर कधी सूर्यप्रकाश हा वातावरणाचा बदल घाटेअळीला पोषक आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने पहिल्या टप्यात पेरणी झालेल्या हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब न झाल्यास काही दिवसांतच हरभरा पिकात ३० ते ४० टक्क्क््यांनी कमी होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. जिल्ह्यात रबीच्या हरभऱ्याची सर्वाधिक २२ हजार ५८२ हेक्टर पेरणी मोर्शी तालुक्यात झाली. दर्यापूर तालुक्यात २० हजार ३२०, धामणगाव तालुक्यात ७६ हजार ८१५ धारणी तालुक्यात ७ हजार ५८० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या पानावर पांढरे ठिपके आढळत असल्यामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. या दिवसांत आठ दिवसांच्या फरकात कीटनाशकांची फवारणी करावी. रबीच्या हरभरा उत्पन्नात सरासरी घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)