शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

कापूस बोनसचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: April 19, 2015 00:21 IST

राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात सध्या चर्चा होत असली तरीही अमरावतीसह विदर्भातील ...

लक्षवेध : बोनसचा लाभ शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना, वस्तुनिष्ठ तोडगा काढण्याची मागणीअमरावती : राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात सध्या चर्चा होत असली तरीही अमरावतीसह विदर्भातील बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आपला कापूस व्यापाऱ्यांनाच विकला आहे. आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कापूस पणन महासंघाला विकला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादकांना बोनस देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा सर्व फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. त्यापेक्षा कापूस उत्पादकांना सरसकट मदत करण्याच्या दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ तोडगा यावर काढावा, अशी मागणी होत आहे. राज्यभरातील १ कोटी पेक्षा जास्त क्विंटल खरेदी केलेल्या कापसाला ३०० रुपये बोनस देण्याचा विचार झाला तरी ही रक्कम कोट्यवधीच्या घरात जाते. यापैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात किती रक्कम पडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. कापूस उत्पादनाच्या वेळी चांगले भाव दिले तर शेतकऱ्यांना त्वरित पैशांची मदत होते. शेतकऱ्यांना गावातून कापूस खरेदी केंद्रापर्यंत कापूस आणण्याचा खर्च सोसवत नाही. अशावेळी गावातील व्यापाऱ्याला कापूस विकला जातो. किंवा मोठा व्यापारी गावातच वाहन घेऊन जागेवर चुकारे देतात. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यालाच कापूस विकतात. आलेला कापूस साठवून ठेवावा आणि चांगले भाव आल्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी आणावा, अशी तयारी शेतकऱ्यांची नसते. तोपर्यंत त्यांना थांबताही येत नाही. त्यामुळे शेतातून घरी आणलेला कापूस थेट व्यापाऱ्यांच्या दारात नेऊन टाकावा लागतो. बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्यांनाच विकला. शासनाकडे अशा शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जो कापूस शेतकरी व्यापाऱ्यांना विकतात, अशा कापसाला शासनाने प्रतिक्विंटल काही बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना कदापिही होणार नाही. अशी शेतकऱ्यांची भावना आहे. राज्यातील १२६ कापूस खरेदी केंद्रावर १ कोटी ७ लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यातील पणन महासंघाने खरेदी केलेला कापूस २६ लक्ष ९४ हजार क्विंटल तर सीसीआयने खरेदी केलेला कापूस ८० लाख ७८ हजार क्विंटल आहे. शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस विकत होते तेव्हा हा कापूस ३८०० ते ३९०० रुपये भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. अनेक व्यापाऱ्यांनी हाच कापूस पणन किंवा सीसीआयला घातला काही शेतकऱ्यांनी थेट पणन महासंघाच्या अथवा सीसीआयला आपला कापूस विकला असेल. पण अशा शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. कुठल्या ना कुठल्या व्यापाऱ्यामार्फत शेतकऱ्यांनी हा कापूस विकला आहे. त्यामुळे बोनस संदर्भात शासनाने निर्णय घेतल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)शासनाने एकतर कापूस खरेदी कें द्र उशिरा सुरू केले अन् लवकरच बंदही केले. त्यामुळे या केंद्राचा शेतकऱ्यांना लाभ घेता आला नाही. अशातच दुष्काळ व गारपिटीने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देताना सरकट १० हजार रुपये शेतकऱ्यांच्याच खात्यावर जमा करावे.- विजय विल्हेकर, शेतकरी नेते.