शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कापूस बोनसचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: April 19, 2015 00:21 IST

राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात सध्या चर्चा होत असली तरीही अमरावतीसह विदर्भातील ...

लक्षवेध : बोनसचा लाभ शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना, वस्तुनिष्ठ तोडगा काढण्याची मागणीअमरावती : राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात सध्या चर्चा होत असली तरीही अमरावतीसह विदर्भातील बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आपला कापूस व्यापाऱ्यांनाच विकला आहे. आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कापूस पणन महासंघाला विकला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादकांना बोनस देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा सर्व फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. त्यापेक्षा कापूस उत्पादकांना सरसकट मदत करण्याच्या दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ तोडगा यावर काढावा, अशी मागणी होत आहे. राज्यभरातील १ कोटी पेक्षा जास्त क्विंटल खरेदी केलेल्या कापसाला ३०० रुपये बोनस देण्याचा विचार झाला तरी ही रक्कम कोट्यवधीच्या घरात जाते. यापैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात किती रक्कम पडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. कापूस उत्पादनाच्या वेळी चांगले भाव दिले तर शेतकऱ्यांना त्वरित पैशांची मदत होते. शेतकऱ्यांना गावातून कापूस खरेदी केंद्रापर्यंत कापूस आणण्याचा खर्च सोसवत नाही. अशावेळी गावातील व्यापाऱ्याला कापूस विकला जातो. किंवा मोठा व्यापारी गावातच वाहन घेऊन जागेवर चुकारे देतात. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यालाच कापूस विकतात. आलेला कापूस साठवून ठेवावा आणि चांगले भाव आल्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी आणावा, अशी तयारी शेतकऱ्यांची नसते. तोपर्यंत त्यांना थांबताही येत नाही. त्यामुळे शेतातून घरी आणलेला कापूस थेट व्यापाऱ्यांच्या दारात नेऊन टाकावा लागतो. बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्यांनाच विकला. शासनाकडे अशा शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जो कापूस शेतकरी व्यापाऱ्यांना विकतात, अशा कापसाला शासनाने प्रतिक्विंटल काही बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना कदापिही होणार नाही. अशी शेतकऱ्यांची भावना आहे. राज्यातील १२६ कापूस खरेदी केंद्रावर १ कोटी ७ लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यातील पणन महासंघाने खरेदी केलेला कापूस २६ लक्ष ९४ हजार क्विंटल तर सीसीआयने खरेदी केलेला कापूस ८० लाख ७८ हजार क्विंटल आहे. शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस विकत होते तेव्हा हा कापूस ३८०० ते ३९०० रुपये भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. अनेक व्यापाऱ्यांनी हाच कापूस पणन किंवा सीसीआयला घातला काही शेतकऱ्यांनी थेट पणन महासंघाच्या अथवा सीसीआयला आपला कापूस विकला असेल. पण अशा शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. कुठल्या ना कुठल्या व्यापाऱ्यामार्फत शेतकऱ्यांनी हा कापूस विकला आहे. त्यामुळे बोनस संदर्भात शासनाने निर्णय घेतल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)शासनाने एकतर कापूस खरेदी कें द्र उशिरा सुरू केले अन् लवकरच बंदही केले. त्यामुळे या केंद्राचा शेतकऱ्यांना लाभ घेता आला नाही. अशातच दुष्काळ व गारपिटीने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देताना सरकट १० हजार रुपये शेतकऱ्यांच्याच खात्यावर जमा करावे.- विजय विल्हेकर, शेतकरी नेते.