शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

जिल्ह्यात कापूस खरेदी करण्यास मुहूर्त मिळेना

By admin | Updated: October 24, 2016 00:27 IST

दिवाळीचा सण अवघा आठवडाभरावर आला आहे. तरीही अद्याप जिल्हाभरात सीसीआय किंवा पणनची कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत.

उदासीनता : खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूटअमरावती : दिवाळीचा सण अवघा आठवडाभरावर आला आहे. तरीही अद्याप जिल्हाभरात सीसीआय किंवा पणनची कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे ही खरेदी केंद्रे केव्हा सुरू होतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खासगी व्यापारी कमी भावात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत आहेत. यावर्षी खरीप पिकासाठी पोषक पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवार चांगलेच बहरले आहे. परंतु परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे सोयाबीन व उडीद पिकाचे नुकसान झाले. या पावसाचा कपाशीला फायदा झाला. जिल्ह्यात दरवर्षी सात ते साडेसात हेक्टरवर खरीप पेरणी करण्यात येते. त्यामध्ये कापूस, सोयाबीनचे क्षेत्र अधिक असते. यंदा १ लाख लाख १३ हजार ९२ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. त्यातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे कापूस उत्पादनात वाढ होणार असल्याची आशा शेतकऱ्यांना आहे. वास्तविक पाहता दरवर्षी दसऱ्याला शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. या खरेदी केंद्रावर शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी नऊन दिवाळी साजरी करतात. परंतु यंदा दसरा होऊन दोन आठवड्याचा कालावधी उलटून गेला असताना देखील शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. याचाच फायदा खासगी व्यापारी घेऊन ते शेतकऱ्यांकडील कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत. सणासुदीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात कापसाची विक्री करीत आहेत. राज्यात फेडरेशन व सीसीआयच्यावतीने कापसाची खरेदी करण्यात येते. सीसीआयने कापूस खरेदीची शासनाकडे परवानगी मागितली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत परवानगी मिळून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु तोपर्यंत हजारो क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकरी विरोधी भाजप सरकारचे धोरण आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. सोयाबीनला २७०० रूपये हमीभाव देणे गरजेचे आहे. शासन सोयाबीनला हमीभाव व कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. - वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव रेल्वेअच्छे दिनची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्यासाठी कापसाला चांगला हमीभाव जाहीर करावा, विविध संकटाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव द्यावा, ज्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबू शकेल. - उमेश कावरे, शेतकरीतीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहे. यंदा कापसाचे पीक समाधानकारक आहे. शासनाकडून कापसाला योग्य भाव दिल्यास खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, त्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा व कापूस खरेदी केंद्र सुरू करावे.- विलास रेहपांडे,शेतकरी