शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जिल्ह्यात कापूस खरेदी करण्यास मुहूर्त मिळेना

By admin | Updated: October 24, 2016 00:27 IST

दिवाळीचा सण अवघा आठवडाभरावर आला आहे. तरीही अद्याप जिल्हाभरात सीसीआय किंवा पणनची कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत.

उदासीनता : खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूटअमरावती : दिवाळीचा सण अवघा आठवडाभरावर आला आहे. तरीही अद्याप जिल्हाभरात सीसीआय किंवा पणनची कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे ही खरेदी केंद्रे केव्हा सुरू होतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खासगी व्यापारी कमी भावात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत आहेत. यावर्षी खरीप पिकासाठी पोषक पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवार चांगलेच बहरले आहे. परंतु परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे सोयाबीन व उडीद पिकाचे नुकसान झाले. या पावसाचा कपाशीला फायदा झाला. जिल्ह्यात दरवर्षी सात ते साडेसात हेक्टरवर खरीप पेरणी करण्यात येते. त्यामध्ये कापूस, सोयाबीनचे क्षेत्र अधिक असते. यंदा १ लाख लाख १३ हजार ९२ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. त्यातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे कापूस उत्पादनात वाढ होणार असल्याची आशा शेतकऱ्यांना आहे. वास्तविक पाहता दरवर्षी दसऱ्याला शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. या खरेदी केंद्रावर शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी नऊन दिवाळी साजरी करतात. परंतु यंदा दसरा होऊन दोन आठवड्याचा कालावधी उलटून गेला असताना देखील शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. याचाच फायदा खासगी व्यापारी घेऊन ते शेतकऱ्यांकडील कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत. सणासुदीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात कापसाची विक्री करीत आहेत. राज्यात फेडरेशन व सीसीआयच्यावतीने कापसाची खरेदी करण्यात येते. सीसीआयने कापूस खरेदीची शासनाकडे परवानगी मागितली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत परवानगी मिळून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु तोपर्यंत हजारो क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकरी विरोधी भाजप सरकारचे धोरण आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. सोयाबीनला २७०० रूपये हमीभाव देणे गरजेचे आहे. शासन सोयाबीनला हमीभाव व कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. - वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव रेल्वेअच्छे दिनची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्यासाठी कापसाला चांगला हमीभाव जाहीर करावा, विविध संकटाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव द्यावा, ज्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबू शकेल. - उमेश कावरे, शेतकरीतीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहे. यंदा कापसाचे पीक समाधानकारक आहे. शासनाकडून कापसाला योग्य भाव दिल्यास खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, त्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा व कापूस खरेदी केंद्र सुरू करावे.- विलास रेहपांडे,शेतकरी