शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे- शेखर भोयर

By admin | Updated: June 17, 2014 23:57 IST

आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाने शिक्षणाचा अधिकार दिला आहे. परंतु शिक्षकांच्या अधिकाराची लढाई अद्याप अपूूर्ण आहे. निवडून आल्यास ती लढाई पूर्ण करायची आहे. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त

अमरावती : आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाने शिक्षणाचा अधिकार दिला आहे. परंतु शिक्षकांच्या अधिकाराची लढाई अद्याप अपूूर्ण आहे. निवडून आल्यास ती लढाई पूर्ण करायची आहे. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे पर्ू्ण शिक्षण मोफत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही शेखर भोयर यांनी दिली. यवतमाळ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.शिक्षकांनी कौल दिल्यास निवडून आल्यानंतर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेश योजना लागू केली जाईल. इतकेच नव्हे तर शिक्षकांच्या संदर्भातील सर्व नियम, योजना सवलती, वेतन व वेतनेतर माहितीही उपलब्ध करून देणार, असा संकल्प यावेळी शेखर भोयर यांनी व्यक्त केला. विदर्भातील शेतकऱ्यांवर कर्जामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान पॅकेजच्या माध्यमातून शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विधानपरिषदेत नेतृत्व करण्याची संंधी मिळाल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे सर्व शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करून मोफत केले जाईल, असेही यावेळी भोयर यांनी सांगितले. याशिवाय शालेय गणवेशाच्या योजना सर्व घटकांतील विद्यार्थ्यांसाठी लागू करून कोणालाही या योजनेपासून वंचित न ठेवण्याचा संकल्प यावेळी भोयर यांनी केला. शिक्षक अद्ययावत झाल्यास त्याचे अध्यापन सुध्दा प्रभावी होईल. याकरिता प्रत्येक शिक्षकाला लॅपटॉप खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद करण्याचा मानस यावेळी भोयर यांनी व्यक्त केला. इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षक व शाळेसंदर्भातील प्रत्येक अद्ययावत माहिती शिक्षकांच्या हाती उपलब्ध करून दिली जाईल, असेही शेखर भोयर यांनी सांगितले. अद्याप शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. संधी मिळाल्यास शिक्षकांचे सक्षमपणे नेतृत्व करून या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास यावेळी शेखर भोेयर यांनी शिक्षकांना दिला.