शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

गाविलगड किल्ला १५ डिसेंबरला इंग्रजांनी केला होता काबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:30 IST

इतिहास : २१७ वर्षांपूर्वीची आठवण, १४ जणींनी घेतल्या होत्या अग्निकुंडात उड्या चिखलदरा ( अमरावती) : वर्‍हाडातील सर्वात मोठा गाविलगड ...

इतिहास : २१७ वर्षांपूर्वीची आठवण, १४ जणींनी घेतल्या होत्या अग्निकुंडात उड्या

चिखलदरा ( अमरावती) : वर्‍हाडातील सर्वात मोठा गाविलगड किल्ला १५ डिसेंबर १८०३ रोजी इंग्रजांनी जिंकला होता. त्याला २१७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

इंग्रज-मराठे युद्ध जगप्रसिद्ध आहे, इंग्रज अधिकारी ऑर्थर वेलस्ली आणि नागपूरकर भोसल्यांकडून किल्लेदार बेनिसिंग यांच्यात हे युद्ध झाले.१५ डिसेंम्बर रोजी या घटनेस तब्बल २१७ वर्षे झालीत. १८०३ ला १४ डिसेंबरच्या रात्री शिड्या लावून व तोफांचा मारा करून शार्दुल दरवाजा इंग्रजांनी ताब्यात घेतला होता. १५ डिसेंबर दिल्ली दरवाजात निकराची लढाई झाली अन राजा बेनिसिंगसह त्यांचे सर्व मातब्बर सहकारी आणि सैनिक मारले गेले. इंग्रज सैन्यातील १५ जणांचा मृत्यू व ११० जखमी झाले होते

बॉक्स

बेनीसिंगच्या पत्नीसह महिलांनी केला जोहार

इंग्रज सैन्य आत घुसताच देव तलावाच्या काठावर रचून ठेवलेल्या चितांवर बेनिसिंगच्या पत्नीसह एकूण १४ स्त्रियांनी उड्या घेऊन जोहार केला. त्यामध्ये तिघींचा मृत्यू झाला. उर्वरित स्त्रिया वाचविला गेल्या होत्या. बेनीसिंग आणि त्यांच्या तीन पत्नींची समाधी एकाच ठिकाणी या गाविलगड किल्ल्यात आहे. हा ऐतिहासिक किल्ला आज दुर्लक्षित आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील एक महत्त्वपूर्ण ठिकाण असूनही पर्यटकांना आवश्यक माहिती येथे मिळत नाही.

किल्ला ब्रिटिशांनी जिंकल्यानंतर किल्ल्यासह संपूर्ण वऱ्हाडावर ब्रिटिशांचे अंकित निझामाची सत्ता आली. किल्ल्याच्या प्रत्येक दारासह किल्ला परिसरात एक दिवस कमी पडू शकेल एवढा खजिना आहे. त्यासंबंधी संशोधन होऊन तो खजिना बाहेर काढणे गरजेचे असल्याचे मत इतिहासतज्ज्ञ अनिरुद्ध पाटील यांनी ‘लोकमत''ला सांगितले.