शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

गाविलगड किल्ला १५ डिसेंबरला इंग्रजांनी केला होता काबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:30 IST

इतिहास : २१७ वर्षांपूर्वीची आठवण, १४ जणींनी घेतल्या होत्या अग्निकुंडात उड्या चिखलदरा ( अमरावती) : वर्‍हाडातील सर्वात मोठा गाविलगड ...

इतिहास : २१७ वर्षांपूर्वीची आठवण, १४ जणींनी घेतल्या होत्या अग्निकुंडात उड्या

चिखलदरा ( अमरावती) : वर्‍हाडातील सर्वात मोठा गाविलगड किल्ला १५ डिसेंबर १८०३ रोजी इंग्रजांनी जिंकला होता. त्याला २१७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

इंग्रज-मराठे युद्ध जगप्रसिद्ध आहे, इंग्रज अधिकारी ऑर्थर वेलस्ली आणि नागपूरकर भोसल्यांकडून किल्लेदार बेनिसिंग यांच्यात हे युद्ध झाले.१५ डिसेंम्बर रोजी या घटनेस तब्बल २१७ वर्षे झालीत. १८०३ ला १४ डिसेंबरच्या रात्री शिड्या लावून व तोफांचा मारा करून शार्दुल दरवाजा इंग्रजांनी ताब्यात घेतला होता. १५ डिसेंबर दिल्ली दरवाजात निकराची लढाई झाली अन राजा बेनिसिंगसह त्यांचे सर्व मातब्बर सहकारी आणि सैनिक मारले गेले. इंग्रज सैन्यातील १५ जणांचा मृत्यू व ११० जखमी झाले होते

बॉक्स

बेनीसिंगच्या पत्नीसह महिलांनी केला जोहार

इंग्रज सैन्य आत घुसताच देव तलावाच्या काठावर रचून ठेवलेल्या चितांवर बेनिसिंगच्या पत्नीसह एकूण १४ स्त्रियांनी उड्या घेऊन जोहार केला. त्यामध्ये तिघींचा मृत्यू झाला. उर्वरित स्त्रिया वाचविला गेल्या होत्या. बेनीसिंग आणि त्यांच्या तीन पत्नींची समाधी एकाच ठिकाणी या गाविलगड किल्ल्यात आहे. हा ऐतिहासिक किल्ला आज दुर्लक्षित आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील एक महत्त्वपूर्ण ठिकाण असूनही पर्यटकांना आवश्यक माहिती येथे मिळत नाही.

किल्ला ब्रिटिशांनी जिंकल्यानंतर किल्ल्यासह संपूर्ण वऱ्हाडावर ब्रिटिशांचे अंकित निझामाची सत्ता आली. किल्ल्याच्या प्रत्येक दारासह किल्ला परिसरात एक दिवस कमी पडू शकेल एवढा खजिना आहे. त्यासंबंधी संशोधन होऊन तो खजिना बाहेर काढणे गरजेचे असल्याचे मत इतिहासतज्ज्ञ अनिरुद्ध पाटील यांनी ‘लोकमत''ला सांगितले.