शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

गणेशोत्सवात ‘ते’ दररोज गोळा करतात पाच क्विंटल निर्माल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे फोटो - पाच क्विंटल होते जमा, नदी-नाले, विहिरींना धोका टाळण्यासाठी खतनिर्मितीचा उपक्रम मोहन राऊत - ...

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे

फोटो -

पाच क्विंटल होते जमा, नदी-नाले, विहिरींना धोका टाळण्यासाठी खतनिर्मितीचा उपक्रम

मोहन राऊत - धामणगाव रेल्वे : गणेशोत्सवात विघ्नहर्त्याला वाहिलेले हार, बेल, फुले, दुर्वा हे निर्माल्य झाल्यानंतर विहिरीत, नाल्यात टाकून जलप्रदूषणाला हातभार लावला जातो. हा उपद्रव टाळण्यासाठी अमरावती येथील एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते दररोज घरोघरी जाऊन तब्बल पाच क्विंटल निर्माल्य गोळा करून त्यावर खतनिर्मितीची प्रक्रिया करतात.

गणेशोत्सवादरम्यान दररोज सार्वजनिक गणेश मंडळात हार, दुर्वा, हळद, गुलाल अर्पण करण्यात येतो. भाविकांची संख्या जेवढी अधिक, तेवढी हार फुलांची संख्याही वाढत जाते. ही फुले व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने गणेश भक्तांच्याच पायदळी तुडविली जाऊ शकतात. निर्माल्याविषयी जनजागृती अद्यापही झाली नसल्याने दररोज जिल्ह्यात तीनशे क्विंटल हार-फुले विहिरी, नदी-नाल्याच्या पात्रात विसर्जित होतात. अमरावती शहरातील विहिरी यामुळे बुजण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. हे हेरून अमरावती येथे श्री माई निर्माल्य सेवा योजनेंतर्गत निर्माल्य संकलन उपक्रम सुरू केला आहे.

चारचाकी वाहनातून निर्माल्य संकलन अमरावती येथील हरीश वाघ यांनी श्री माई आनंद सेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट (वातोंडा) स्थापन करून श्री माई निर्माल्य सेवा योजना सुरू केली आहे. शहरातील घरोघरी फिरून त्यांनी प्रथम पत्रक वाटली. नंतर कापडी पिशव्या घेऊन निर्माल्य गोळा करण्याची योजना सुरू केली. त्यासाठी स्वतः एक चारचाकी वाहन घेतले. यातून दररोज पाच क्विंटल निर्माल्य जमा करून त्याचा खतनिर्मितीचा प्रयोग सुरू केला आहे. एखाद्याकडून फोन आला की, सेवाभावी वाहन संबंधितांच्या घरी धडकून निर्माल्य जमा केले जाते. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव काळातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

----------

गणेशोत्सव अथवा नवरात्र उत्सवात अधिक निर्माल्य फुले हार दुर्वा घरी जमा होते. ते पायदळी तुडविले जाऊ नये, योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतला. कुणी काहीही देत नाही. दररोज पाच ते सहा क्विंटल निर्माल्य जमा करण्यात येते. खतनिर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो.

- हरीश वाघ, अध्यक्ष, श्री माई निर्माल्य सेवा योजना, अमरावती