शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावच्या यात्रेत बळीराजाच्या खेळाला तिलांजली

By admin | Updated: January 18, 2016 00:04 IST

वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे बैलांना सांभाळत त्यांना चांगले खाऊ पिऊ घालून काहीही काम न करता बसवून ठेवले जाणे ....

विदर्भातील १० हजार बैल बांधलेलेच : २० कोटी रूपयांच्या अर्थव्यवस्थेला तडामोहन राऊत/वसंत कुलकर्णी धामणगाव रेल्वेवर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे बैलांना सांभाळत त्यांना चांगले खाऊ पिऊ घालून काहीही काम न करता बसवून ठेवले जाणे व केवळ एका यात्रेत त्याला बाहेर काढून कोणताही छळ न करता पळविणे हा शासनाच्या आदेशाप्रमाणे आता गुन्हा ठरू लागल्याने तळेगाव दशासरच्या यात्रेतील शंकरपट हा बळीराजाच्या उपेक्षित खेळाला तिरांजली मिळाली आहे़ विदर्भातील तब्बल शंकरपटात पळणाऱ्या दोन हजार बैलजोड्या घरात वर्षांपासून बांधून आहेत. तळेगावचा शंकरपट येथील नागरिकांच्या जिद्द व परिश्रमामुळे मागील दोन वर्षांपर्यंत टिकू न होता़ दादाजी देशमुख, भाऊजी गोसावी, गणपतराव बगाडे, बापुजी बारी, रामकृष्ण लोहार, आबासाहेब पांडे, तुकाराम शेंद्रे, मसुदा डेहनकर, पंजाबराव गुल्हाने, भुरूभाई अब्दुल्ला खान यांनी या पटाची मुहूर्तमेढ रोवली होती़ कै़नानासाहेब देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसांची स्पर्धा केली. शंकरपटात तिसऱ्या दिवशी महिला जुळाव्यात म्हणून महिलांचा पट सुरू केला़ यात विदर्भच नव्हे तर मध्यप्रदेश, मराठवाडा, खानदेश, येथून जोड्या सहभागी होत असे. तत्कालीन जिल्हाधिकारी ले़अ‍ॅलर्ट यांच्या अध्यक्षतेखाली १९४२ मध्ये शंकरपटाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला़ १९५४ मध्ये कृषक सुधार मंडळाचे स्थापना करून शंकर पटाची सूत्रे या मंडळाकडे आली़ या शंकरपटात त्याकाळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक श्रध्देय जवाहरलाल दर्डा, खा़ रामदास तडस यांच्यासह अनेक राजकारणी सहभागी होत असे़तळेगावच्या या पटाला दीडशे वर्षांची परंपरा कायम असताना दोन वर्षापासून या पटाकडे आता शर्यतीतील बैल जोड्या फिरकत नाही़ यंदा अच्छेदिन शेतकऱ्यांना येण्याची चिन्हे असताना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा बंदी घातली आहे़ वर्षभर बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे बैलमालक सांभाळतात़ लाखो रूपये या बैलजोडीवर खर्च करतात़ तळेगाव येथील यात्रेत भेटून खुशाली विचारणे, शेतीविषयक चर्चा करणे तसेच या यात्रेतून रोजगार मिळणे व कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणे हे केवळ शंकरपटातून घडते़ परंतु या शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक बाबीला तिलांजली मिळाली आहे़