शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सैनिकाच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST

फोटो - पी/२७/शहीद फोल्डर परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकरच्या पार्थिवावर देवगाव शिवारात सातपुडा पर्वताच्या साक्षीने ...

फोटो - पी/२७/शहीद फोल्डर

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकरच्या पार्थिवावर देवगाव शिवारात सातपुडा पर्वताच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला. या दरम्यान सशस्त्र सैन्य दलासह राज्य पोलीस दलाकडून त्याला मानवंदना देण्यात आली. मेळघाटच्या पंचक्रोशीतून याप्रसंगी जनसागर उसळला होता. अमर रहे, अमर रहे, भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

रविवार २७ डिसेंबरला नागपूरहून दुपारी २ वाजताच्या दरम्यान कैलासचे पार्थिव पिंपळखुटा येथे दाखल झाले. ते परतवाडा शहरासह मार्गातील धोतरखेडा, एकलासपूर, धामणगाव गढीतील युवकांसह पुरुष व महिलांनी एकत्र येत हातात तिरंगा घेत मार्गावर उभे राहून त्यास श्रद्धांजली अर्पण केली.

पिंपळखुटा गावासह देवगाव परिसरात प्रत्येक घरांपुढे सडासारवण करीत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम कैलासचे पार्थिव पिंपळखुटा येथील त्याच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टररुपी रथावर ते पार्थिव ठेवून अंतिमसंस्कार स्थळी आणल्या गेले.

दत्तप्रभू आश्रमशाळेमागील गजानन येवले यांच्या शेतात त्या पार्थिवावर शासकीत इतमात त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. यात ज्या तिरंग्यात त्याचे पार्थिव आणल्या गेले तो तिरंगा सैन्यदलाकडून सन्मानपूर्वक त्याची पत्नी बबलीच्या स्वाधीन करण्यात आला. आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगीसह नातेवाईकांनी त्याचे मुखदर्शन घेतले. धार्मिक रुढीपरंपरेनुसार विधी आटोपून त्याचा लहान भाऊ केवल दहिकर याने कैलासच्या पार्थिवाला अग्नी दिला.

अग्नीदाहपूर्वी राज्य शासनाच्यावतीने पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी, तर प्रशासनाच्यावतीने अचलपूर एसडीओ संदीपकुमार अपार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राज्यमंत्री बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार केवलराम काळे, खासदार नवनीत राणा, जि. प. सदस्य प्रताप अभ्यंकर, बहादुर आजी-माजी सैनिक संघ, देवगावचे सरपंच गजानन येवले, सुरेखा ठाकरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सैनिक कैलासच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. मान्यवरांनी आपली जाहीर श्रद्धांजली याप्रसंगी अर्पण केली. अखेर राष्ट्रगीतासह भारत माता आणि अमर रहे। अमर रहे, वंदे मातरमच्या जयघोषाने सैनिकाला अखेरचा निरोप देण्यात आला. याप्रसंगी महिलांसह शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक राहिली.