शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

पर्यावरण समृद्धी योजनेसाठी पावणेदोन कोटींचा निधी

By admin | Updated: January 25, 2015 23:06 IST

ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्यावतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गावांचा विकास साधला जातो.

जितेंद्र दखणे - अमरावतीग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्यावतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गावांचा विकास साधला जातो. ज्या गावांनी विकासात सातत्य ठेवले आहे अशाच गावांना तीन टप्प्यात पात्र ठरविण्यात येते. जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात १३ गावे पात्र ठरली आहेत. या गावांना विकासासाठी १ कोटी ७० लाख २८ हजार रूपये लवकरच प्रदान केले जाणार आहेत.आधुनिकीकरणामुळे शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्यामुळे वातावरणाचा समतोल ढासळत आहे. ग्रामीण भागात पर्यावरणाचे संवर्धन, जतन, संरक्षण व्हावे. यातून समृद्ध गाव विकसित व्हावे, गावात पाणी, जमीन, हवा, वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन व्हावे, गावातील नागरिकांचे राहणीमान त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. या बाबींची पूर्तता करणाऱ्या गावांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रामुख्याने गावातील रोपवाटिका व संवर्धन, स्वच्छता, सांडपाण्याचे व्यवस्थापन, जलनिस्सारण, गटारे, रस्त्यावरील दिवाबत्ती, सौर पथदिवे, अपारंपारिक ऊर्जा, विकासाचा वापर आदी कामांना प्राधान्य देण्यात आले. ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात येते. पहिल्या टप्प्यातील निकष पूर्ण करणाऱ्या गावांची निवड दुसऱ्या टप्प्यात केली जाते. दुसऱ्या टप्प्यातील निकष पूर्ण करणाऱ्या गावांची निवड तिसऱ्या टप्प्यात केली जाते. निकषाचे पालन करणाऱ्या ग्रामपंचायतींना दरवर्षी निधी लोकसंख्येच्या आधारावर दिला जातो. (प्रतिनिधी)