शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

पर्यावरण समृद्धी योजनेसाठी पावणेदोन कोटींचा निधी

By admin | Updated: January 25, 2015 23:06 IST

ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्यावतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गावांचा विकास साधला जातो.

जितेंद्र दखणे - अमरावतीग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्यावतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गावांचा विकास साधला जातो. ज्या गावांनी विकासात सातत्य ठेवले आहे अशाच गावांना तीन टप्प्यात पात्र ठरविण्यात येते. जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात १३ गावे पात्र ठरली आहेत. या गावांना विकासासाठी १ कोटी ७० लाख २८ हजार रूपये लवकरच प्रदान केले जाणार आहेत.आधुनिकीकरणामुळे शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्यामुळे वातावरणाचा समतोल ढासळत आहे. ग्रामीण भागात पर्यावरणाचे संवर्धन, जतन, संरक्षण व्हावे. यातून समृद्ध गाव विकसित व्हावे, गावात पाणी, जमीन, हवा, वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन व्हावे, गावातील नागरिकांचे राहणीमान त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. या बाबींची पूर्तता करणाऱ्या गावांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रामुख्याने गावातील रोपवाटिका व संवर्धन, स्वच्छता, सांडपाण्याचे व्यवस्थापन, जलनिस्सारण, गटारे, रस्त्यावरील दिवाबत्ती, सौर पथदिवे, अपारंपारिक ऊर्जा, विकासाचा वापर आदी कामांना प्राधान्य देण्यात आले. ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात येते. पहिल्या टप्प्यातील निकष पूर्ण करणाऱ्या गावांची निवड दुसऱ्या टप्प्यात केली जाते. दुसऱ्या टप्प्यातील निकष पूर्ण करणाऱ्या गावांची निवड तिसऱ्या टप्प्यात केली जाते. निकषाचे पालन करणाऱ्या ग्रामपंचायतींना दरवर्षी निधी लोकसंख्येच्या आधारावर दिला जातो. (प्रतिनिधी)