शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहा विभागांच्या निधीत घट, तीन विभागांना भरीव तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या यंदा सहा विभागांच्या बजेटमधील तरतुदींना कात्री लागली, तर तीन विभागांना भरीव निधीची तरतूद करण्यात ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या यंदा सहा विभागांच्या बजेटमधील तरतुदींना कात्री लागली, तर तीन विभागांना भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे जिल्हा परिषदेला कमी कर मिळाला व परिणामी उत्पन्न घटले. त्यामुळेच ही वेळ ओढवल्याचे ‘मिनी मंत्रालया’तील प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २६ मार्च रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पात कृषी, समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, पाणीपुरवठा, आरोग्य व सिंचन अशा सहा विभागांना कमी बजेटच्या फटका बसला आहे. पशुसंवर्धन, बांधकाम आणि शिक्षण या विभागांना बजेटमध्ये लॉटरी लागली आहे.

जिल्हा परिषदेचे यंदा १६ कोटी १८ लाख ६२ हजार रुपये जमा आणि १४ कोटी ९९ लाख ६६ हजार रुपये खर्च असे एकूण १ कोटी लाख ९५ हजार ९३६ रुपये शिलकीचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये कृषी विभाग केवळ ४९ लाख ५४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी हीच तरतूद १ कोटी १५ लाख ०२ हजार रुपये होती. त्यामुळे यंदाचे बजेट ६५ लाख रुपयांनी कमी आहे. आरोग्य विभागासाठी या बजेटमध्ये ३७ लाख ०२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी ५३ लाख ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याच्या तुलनेत यंदाचे बजेट १६ लाखांनी घटले आहे. पाणीपुरवठा हासुद्धा महत्त्वाचा विभाग आहे. परंतु, या विभागाचे बजेटमध्ये १८ लाख रुपयांनी तरतूद घटली आहे. गतवर्षीच्या बजेटमध्ये पाणीपुरवठा ३ कोटी ४० लाख ६६ हजार रुपयांची तरतूद केली होती. यंदा हीच रक्कम ३ कोटी २२ लाख १ हजार रुपये करण्यात आली आहे. याशिवाय सिंचन विभागाची तरतूद ४५ लाख ७१ हजार रुपयांवरून ......................४० लाख ०४ हजार रुपये करण्यात आली आहे. समाजकल्याण आणि महिला व बाल कल्याण या दोन्ही विभागांना अनुक्रमे १.७५ कोटी व १० लाख रुपयांची घट सहन करावी लागणार आहे.

बॉक्स

तीन विभागांचे बजेट वाढले

एकीकडे सहा विभागांचे बजेट कमी करण्यात आले, तर तीन विभागांचे बजेट मात्र वाढविण्यात आले. यात पशुसंवर्धन विभागासाठी यंदा ३० लाख २५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. गतवर्षी ती १७ लाख २६ हजार होती. बांधकाम विभागाचे बजेट ४५.७१ लाखांवरून ...................... ४०.०४ लाखांवर, तर शिक्षण विभागाची तरतूद ८७.८७ वरून २ कोटी १२ लाख ५६ हजार रुपये करण्यात आली आहे.

कोट

कोरोना संकटामुळे बाजार व यात्रा कर, शेतसारा, मुद्रांक शुल्क अशा रोख उत्पन्नस्रोतांना फटका बसला. परिणामी तिजोरी खाली आहे. परंतु, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून राज्य सरकारने यापूर्वी ही भरीव मदत केली असून, येत्या काळातही भरीव निधी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामविकासाचा झंझावात सुरू राहणार आहे. यात कुठलीही अडचणी येणार नाही.

- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद