शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सहा विभागांच्या निधीत घट, तीन विभागांना भरीव तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या यंदा सहा विभागांच्या बजेटमधील तरतुदींना कात्री लागली, तर तीन विभागांना भरीव निधीची तरतूद करण्यात ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या यंदा सहा विभागांच्या बजेटमधील तरतुदींना कात्री लागली, तर तीन विभागांना भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे जिल्हा परिषदेला कमी कर मिळाला व परिणामी उत्पन्न घटले. त्यामुळेच ही वेळ ओढवल्याचे ‘मिनी मंत्रालया’तील प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २६ मार्च रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पात कृषी, समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, पाणीपुरवठा, आरोग्य व सिंचन अशा सहा विभागांना कमी बजेटच्या फटका बसला आहे. पशुसंवर्धन, बांधकाम आणि शिक्षण या विभागांना बजेटमध्ये लॉटरी लागली आहे.

जिल्हा परिषदेचे यंदा १६ कोटी १८ लाख ६२ हजार रुपये जमा आणि १४ कोटी ९९ लाख ६६ हजार रुपये खर्च असे एकूण १ कोटी लाख ९५ हजार ९३६ रुपये शिलकीचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये कृषी विभाग केवळ ४९ लाख ५४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी हीच तरतूद १ कोटी १५ लाख ०२ हजार रुपये होती. त्यामुळे यंदाचे बजेट ६५ लाख रुपयांनी कमी आहे. आरोग्य विभागासाठी या बजेटमध्ये ३७ लाख ०२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी ५३ लाख ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याच्या तुलनेत यंदाचे बजेट १६ लाखांनी घटले आहे. पाणीपुरवठा हासुद्धा महत्त्वाचा विभाग आहे. परंतु, या विभागाचे बजेटमध्ये १८ लाख रुपयांनी तरतूद घटली आहे. गतवर्षीच्या बजेटमध्ये पाणीपुरवठा ३ कोटी ४० लाख ६६ हजार रुपयांची तरतूद केली होती. यंदा हीच रक्कम ३ कोटी २२ लाख १ हजार रुपये करण्यात आली आहे. याशिवाय सिंचन विभागाची तरतूद ४५ लाख ७१ हजार रुपयांवरून ......................४० लाख ०४ हजार रुपये करण्यात आली आहे. समाजकल्याण आणि महिला व बाल कल्याण या दोन्ही विभागांना अनुक्रमे १.७५ कोटी व १० लाख रुपयांची घट सहन करावी लागणार आहे.

बॉक्स

तीन विभागांचे बजेट वाढले

एकीकडे सहा विभागांचे बजेट कमी करण्यात आले, तर तीन विभागांचे बजेट मात्र वाढविण्यात आले. यात पशुसंवर्धन विभागासाठी यंदा ३० लाख २५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. गतवर्षी ती १७ लाख २६ हजार होती. बांधकाम विभागाचे बजेट ४५.७१ लाखांवरून ...................... ४०.०४ लाखांवर, तर शिक्षण विभागाची तरतूद ८७.८७ वरून २ कोटी १२ लाख ५६ हजार रुपये करण्यात आली आहे.

कोट

कोरोना संकटामुळे बाजार व यात्रा कर, शेतसारा, मुद्रांक शुल्क अशा रोख उत्पन्नस्रोतांना फटका बसला. परिणामी तिजोरी खाली आहे. परंतु, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून राज्य सरकारने यापूर्वी ही भरीव मदत केली असून, येत्या काळातही भरीव निधी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामविकासाचा झंझावात सुरू राहणार आहे. यात कुठलीही अडचणी येणार नाही.

- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद