शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

शुक्रवारी ९२२ संक्रमित, १८ रुग्णांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी ९२२ संक्रमित रुग्ण आढळून आले, तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य ...

अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी ९२२ संक्रमित रुग्ण आढळून आले, तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य जिल्ह्यांतील दोन रुग्ण उपचारादरम्यान दगावले असून, त्यांच्या मृत्यूची नोंद त्या जिल्ह्यातील अभिलेखात घेण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात शहरातील कठोरा रोड येथील ७४ वर्षीय पुरुष, गोपालनगर येथील ७० वर्षीय महिला, शोभानगर येथील ८१ वर्षीय पुरुष, भानखेड बु. येथील ४० वर्षीय पुरुष, शोभानगर येथील ३८ वर्षीय महिला, दर्यापूर येथील ७१ वर्षीय महिला, वरूड येथील ६५ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, ८० वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, नांदगाव (खंडेश्वर) येथील ६५ वर्षीय पुरुष, ८५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, मोर्शी येथील ७५ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय पुरुष, टाकरखेडा येथील ७० वर्षीय महिला, साईनगर येथील ७२ वर्षीय महिला, जलारामनगर येथील ४५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. वर्धा येथील ६८ वर्षीय पुरुष, बैतुल येथील ७० वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुक्रवारी ९२२ संक्रमित आढळून आले असून, आतापर्यंत ८० हजार ६५८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दाखल रुग्ण २३१२, तर कोरोनावर मात करून ११२३ रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. गृहविलगीकरणात ग्रामीणमध्ये ५९९ तर, १८४ रुग्ण आहेत. १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १२१३ रुग्ण दगावले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण १०८९२, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.९९ टक्के आहे. मृत्युदर १.५० टक्के, तर रुग्ण दुपटीचे प्रमाण ५४ एवढे आहेत.