शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

मोफत धान्य योजना शनिवारपर्यंतच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST

अमरावती : लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. रोजगार ...

अमरावती : लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. रोजगार हिरावल्याने गरिबांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, याकरिता एप्रिलमध्ये सुरू केलेल्या या योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतही आता संपल्याने व मुदतवाढीबाबत कुठलेही आदेश नसल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे धान्य वाटपाच्या योजनेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

लॉकडाऊन काळात कष्टकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. हाताला कामे नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना प्रती सदस्य पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. कोरोना संकट कायम राहिल्याने जुलैत पंतप्रधानांनी ही योजना आणखी पाच महिन्यांसाठी वाढविली. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचे मोफत धान्य १२ डिसेंबरपर्यंत वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त झाले नाहीत.

कोट

शासनाने कोरोना संकटकाळात नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्यपुरवठ्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मोफत धान्य वाटपाची कार्यवाही १२ डिसेंबरपर्यंत होईल. यानंतर पुढे मोफत धान्य देण्याबाबत शासनाचे निर्देश नाहीत. शासनाच्या सूचनेनुसार पुढे कारवाई केली जाईल.

- अनिल टाकसाळे,

जिल्हा पुरवठा अधिकारी