शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

‘त्या’ चार विद्यार्थ्यांनी रचला अपहरणाचा बनाव

By admin | Updated: December 31, 2016 01:22 IST

सकाळच्या सुमारास शाळेला जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या सहा व्यक्तींनी आपले

भाजीबाजार परिसरातील घटना : पालकांनी केला खुलासा अमरावती : सकाळच्या सुमारास शाळेला जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या सहा व्यक्तींनी आपले अपहरण केले, मात्र, त्यांच्या हाताला चावा घेत आपण कशीबशी सुटका करून घेतल्याचे शाळकरी मुलांनी सांगताच एकच खळबळ माजली. या शाळकरी मुलांनी हा प्रकार मुख्याध्यापकांच्या कानावर घातला. पुढे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. मात्र, काही वेळात हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले. शाळेला दांडी मारता यावी, या उद्देशाने आपण अपहरणाचा बनाव रचल्याचे त्या मुलांनी सांगताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला. मात्र, त्याचवेळी इतक्या लहानवयात या मुलांनी स्वताच्याच अपहरणाचा बनाव रचल्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजीबाजार परिसरात महापालिकेची उच्च प्राथमिक हिन्दी व इंग्रजी शाळा क्रमांक ११ आहे. या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेचे दुपारचे सत्र १२ वाजताच्या सुमारास सुरु होते. याच शाळेत शिकणारे हाथीपुरा येथील चार मुले शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास भाजीबाजार स्थित मुरलीधर मंदिराजवळील मार्गाने शाळेकडे येत होते. दरम्यान पिवळ्या व लाल रंगाची व्हॅन मंदिराजवळ अचानक थांबली. त्यातून सहा बुरखाधारी अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी आपले तोंड दाबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हा चौघांनाही बंदीस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताला चावा घेत आपण कशीबशी सुटका करून घेतली व तेथून पळ काढला, अशी आपबिती या चार विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांच्याकडे विशद केली. या घटनेचे गांभीर्य बघता मुख्याध्यापक व पालकांनी तत्काळ खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तथा अपहरणाची माहिती पोलीस निरीक्षक कुरुळकर यांना दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. पोलीस, पालक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या परिसरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. तथा चौकशीला वेग दिला. दरम्यान त्या चारही विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठविण्यात आले. तेथे मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांनी या चौघांना विश्वासात घेऊन त्यांची उलटतपासणी घेतली. उलटतपासणीमध्ये या चारही शाळकरी विद्यार्थ्यांनी अपहरणाचा कुठलाही प्रयत्न झाला नसल्याचे सांगितले. टीव्ही सिरीयल पाहून आपल्याला अपहरणाची कल्पना सुचल्याचे एका विद्यार्थ्याने कांबळे यांना सांगितले. त्यानंतर हा सर्व बनाव उघड झाला. (प्रतिनिधी)