शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

‘त्या’ चार विद्यार्थ्यांनी रचला अपहरणाचा बनाव

By admin | Updated: December 31, 2016 01:22 IST

सकाळच्या सुमारास शाळेला जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या सहा व्यक्तींनी आपले

भाजीबाजार परिसरातील घटना : पालकांनी केला खुलासा अमरावती : सकाळच्या सुमारास शाळेला जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या सहा व्यक्तींनी आपले अपहरण केले, मात्र, त्यांच्या हाताला चावा घेत आपण कशीबशी सुटका करून घेतल्याचे शाळकरी मुलांनी सांगताच एकच खळबळ माजली. या शाळकरी मुलांनी हा प्रकार मुख्याध्यापकांच्या कानावर घातला. पुढे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. मात्र, काही वेळात हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले. शाळेला दांडी मारता यावी, या उद्देशाने आपण अपहरणाचा बनाव रचल्याचे त्या मुलांनी सांगताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला. मात्र, त्याचवेळी इतक्या लहानवयात या मुलांनी स्वताच्याच अपहरणाचा बनाव रचल्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजीबाजार परिसरात महापालिकेची उच्च प्राथमिक हिन्दी व इंग्रजी शाळा क्रमांक ११ आहे. या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेचे दुपारचे सत्र १२ वाजताच्या सुमारास सुरु होते. याच शाळेत शिकणारे हाथीपुरा येथील चार मुले शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास भाजीबाजार स्थित मुरलीधर मंदिराजवळील मार्गाने शाळेकडे येत होते. दरम्यान पिवळ्या व लाल रंगाची व्हॅन मंदिराजवळ अचानक थांबली. त्यातून सहा बुरखाधारी अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी आपले तोंड दाबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हा चौघांनाही बंदीस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताला चावा घेत आपण कशीबशी सुटका करून घेतली व तेथून पळ काढला, अशी आपबिती या चार विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांच्याकडे विशद केली. या घटनेचे गांभीर्य बघता मुख्याध्यापक व पालकांनी तत्काळ खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तथा अपहरणाची माहिती पोलीस निरीक्षक कुरुळकर यांना दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. पोलीस, पालक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या परिसरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. तथा चौकशीला वेग दिला. दरम्यान त्या चारही विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठविण्यात आले. तेथे मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांनी या चौघांना विश्वासात घेऊन त्यांची उलटतपासणी घेतली. उलटतपासणीमध्ये या चारही शाळकरी विद्यार्थ्यांनी अपहरणाचा कुठलाही प्रयत्न झाला नसल्याचे सांगितले. टीव्ही सिरीयल पाहून आपल्याला अपहरणाची कल्पना सुचल्याचे एका विद्यार्थ्याने कांबळे यांना सांगितले. त्यानंतर हा सर्व बनाव उघड झाला. (प्रतिनिधी)