शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

साडेचार लाख हेक्टरला मदत !

By admin | Updated: June 17, 2016 00:15 IST

खरीप २०१५ हंगामात विदर्भातील कापूस, सोयाबीन व धान पिकांच्या नुकसानीसाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर भरपाईच्या ५० टक्के प्रमाणात

कपाशीला ठेंगा : सोयाबीन क्षेत्राला विम्याच्या ५० टक्के प्रमाणात लाभ गजानन मोहोड अमरावतीखरीप २०१५ हंगामात विदर्भातील कापूस, सोयाबीन व धान पिकांच्या नुकसानीसाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर भरपाईच्या ५० टक्के प्रमाणात विशेष मदत घेण्याचा निर्णय ४ मार्च २०१६ रोजी घेतला. त्या अनुषंगाने विमा न उतरविलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादकाच्या याद्या तयार करण्यात आल्या. यामध्ये ३ लाख ६० हजार खातेधारकांच्या ४ लाख ३५ हजार हेक्टरला लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सोयाबीनच्या सर्वच क्षेत्राला लाभ मिळणार असून कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे. सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात राज्यातील १५ हजार ७४७ गावांमध्ये दुष्काळ स्थिती घोषित करण्यात आली होती. या गावांत शासनाने २ जानेवारी २०१६ च्या निर्णयान्वये दोन हजार कोटी रुपयांची मदत एनडीआरएफचे निकषान्वये देण्यात आली. त्या निर्णयानुसार पात्र नसलेल्या मात्र पिकांचे नुकसान झालेल्या अमरावती व नागपूर विभागातील कापूस व सोयाबीन पिकांचा विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय भरपाई जाहीर झाल्यानंतर त्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात विशेष मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. शासानने २३ मार्च २०१६ रोजी विदर्भातील ११ ८३२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यातील १९६७ गावांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर मदत मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील १ लाख २ हजार ९०७ शेतकऱ्यांनी खरीप २०१५ हंगामाचा विमा काढला होता. परंतु ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी विमा काढला नाही. त्या शेतकऱ्यांना विशेष मदतीचा लाभ देण्यासाठी महसूल यंत्रणेद्वारा प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अमरावती तालुक्याचे २५ हजार ५९६ शेतकरी खातेदार आहेत. भातकुली २७ हजार ४५० , नांदगांव खंडेश्वर ३८ हजार १०८, धामणगांव २६ हजार ६९३, चांदूररेल्वे १८ हजार ६९, तिवसा १८ हजार ४५६, मोर्शी ३७ हजार ८७९, वरुड ३९ हजार ४२४, चांदूरबाजार ३५ हजार, अचलपूर २३ हजार ४३४, दर्यापुर २५ हजार २८२, अंजनगांव सुर्जी १८ हजार २५, धारणी ११ हजार ९०० व चिखळदरा तालुक्यातील १६ हजार ७२८ शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. दुुष्काळ जाहिर असतांना अद्यापपर्यंत दुष्काळाची कुठलीही मदत न मिळालेल्या व सततच्या नापीकीने प्रचंड आर्थिक कोंडीत असणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर शासनाकडून मदतीची प्रतीक्षा आहे. कापूस उत्पादक वाऱ्यावर जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. मात्र विमा कंपनीद्वारा सोयाबीनची भरपाई जाहीर करून कपाशीला ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे गतवर्षी सोयाबीनच्या ३ लाख २९ हजार ९२४ हेक्टर क्षेत्राला विम्याची ५० टक्के प्रमाणात मदत मिळणार आहे. कपाशीला केवळ चिखलदरा तालुक्यातील टेंभ्रुसोंडा मंडळात १९ शेतकऱ्यांना २१ हेक्टरमध्ये दर्यापूर तालुक्यातील ग्रामतीर्थ या मंडळात २४३ शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित १ लाख ८६ हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र डावलण्यात आले आहे. अशा आहेत मदतीच्या अटी व शर्ती मदतीची पात्रता ठरविण्यासाठी सातबारावरील पीक नोंद हाच आधार राहणार आहे. कापूस व सोयाबीन पिकांची नोंद असलेल्या क्षेत्रासाठी ही मदत देय राहणार आहे. परंतु मदतीची कमाल मर्यादा २ हेक्टर आहे. पीक नोंदीसाठी वाद उद्भवल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. विशेष मदत ही शेतकऱ्यांची फसवणूक शासनाने २३ मार्च २०१६ रोजी विदर्भातील ११,८३२ गावात दुष्काळ स्थिती जाहिर केली असल्याने शेतकऱ्यांना १३ मे २०१५ च्या नैसर्गिक आपत्ति निकषाप्रमाणे एनडीआरएफ कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टर ६८०० रुपये, फळपिकांसाठी १३,५०० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी १८,००० रुपये मदत द्यायला पाहिजे. परंतु पिक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत करणार आहे. ४० कोटींची मदत मिळण्याची शक्यता मागील वर्र्र्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांसाठी विमा कंपनीने ८७ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली. यामध्ये अन्य पिके वगळता शासनाचे ४ मार्च २०१६ च्या निर्णयान्वये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विम्याच्या ५० टक्के प्रमाणात म्हणजेच किमान ४० कोटी रुपयांची विशेष मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.