शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

विद्यापीठाला गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा विसर

By admin | Updated: June 20, 2016 00:02 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली करण्यात आली. संत गाडगेबाबांनी समाजाला दशसूत्रीचा संदेश दिला आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली करण्यात आली. संत गाडगेबाबांनी समाजाला दशसूत्रीचा संदेश दिला आहे. ते स्वत: निरक्षर असताना समाजशिक्षणाचे धडे त्यांनी प्रत्येक गावात जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून गिरवले. त्यामुळे अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाने ३३ वर्षांनंतर यंदा पाणपोई लावण्याचे सौजन्य दाखविले आहे. परंतु अन्य नऊ संदेशाची अंमलबजावणी केंव्हा करणार, असा सवाल सामान्यांचा आहे.वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ चालते. गाडगेबाबा उभ्या आयुष्यात कोणत्याही शाळेत गेले नाही. मात्र त्यांनी समाजाला दिलेला दशसूत्रीचा संदेश हा प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तनीय ठरणारा आहे. संत गाडगेबाबा दिवसा गाव -खेड्यात रस्ते, स्वच्छता करणे तर रात्रीला कीर्तन करून मनुष्याच्या मनातील घाण साफ करण्याचे कार्य आयुष्यभर केले आहे. एवढेच नव्हे तर समाजात जीवन जगताना त्यांनी कोणते कर्तव्य करावे, हे दशसूत्रीच्या माध्यमातून ठरवून दिले आहे. संत गाडगेबाबांनी केलेले महान कार्य हे अवस्मरणीय ठरणारे असताना विद्यापीठ प्रशासनाने गत ३३ वर्षांत केवळ पाणपाई लावून गाडगेबाबांच्या दशसूत्रीची जणू बोळवण चालविली, असे दिसून येते. ज्या महामानवाच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्यात आले त्यांच्याक डून दशसूत्री संदेशाची अंमलबजावणी होऊ नये, ही बाब खेदजनक मानली जात आहे. यावर्षी विद्यापीठ प्रशासनाने ‘तहानलेल्यांना: पाणी’ या संदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारासमोरील दर्शनी भागात पाणपोई सुरू केली आहे. परंतु उर्वरित नऊ संदेशाचे पालन केंव्हा होणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ही आहे गाडगेबाबांची दशसूत्रीभुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना : पाणी, उघड्यानागड्यांना :वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशू, पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दु:खी निराशांना हिम्मत ही गाडगेबांची दशसूत्री आहेत.