शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
4
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
5
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
6
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
7
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
8
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
9
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
10
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
11
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
12
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
13
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
14
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
15
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
16
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
17
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
18
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
19
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
20
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

अन्नातून विषबाधा; लागोपाठ तीन भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: May 11, 2016 00:31 IST

धारणी तालुक्यातील धारणमहू गावात शिळ्या भातातून विषबाधेच्या प्रकरणातील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.

बालिकेवर उपचार सुरु : धारणीतील धारणमहू गावातील घटना अमरावती : धारणी तालुक्यातील धारणमहू गावात शिळ्या भातातून विषबाधेच्या प्रकरणातील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. ७ मे रोजी ही घटना घडली होती. याच दिवशी उपचारादरम्यान योगेश नामक बालकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तीन गंभीर बालकांवर उपचार सुरू होते. सोमवारी मनीषा नामक मुलीचा तर मंगळवारी सुशीलनेही जगाचा निरोप घेतला. एका बालिकेवर अद्यापही नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश रामविलास भिलावेकर (८), सुशील भिलावेकर (७), मनीषा भिलावेकर (१२) अशी मृतांची नावे आहेत तर सावित्री भिलावेकर (१०) हिच्यावर उपचार सुरू आहेत. धारणमहू येथील रहिवासी भिलावेकर कुटुंबीयांनी ६ मे रोजी रात्री जेवणात भात बनविला होता. आई-वडिलांसह योगेश भिलावेकर, सुशील भिलावेकर, मनीषा भिलावेकर व सावित्री भिलावेकर या चार भावंडांनी तो भात खाल्ला. आरोग्य अधिकाऱ्याची धारणमहूला भेटअमरावती : थोडा भात शिल्लक राहिल्यानंतर तो भात दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेवला होता. दरम्यान ७ मे रोजी भिलावेकर कुटुंबातील आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले असता तो भात चार भावंडांनी खाल्ला. त्यानंतर त्या चारही भावंडांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलट्या, संडास व भोवळ येण्याचा त्रास जाणवला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता नेले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे चौघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. मात्र, इर्विनला आणतानाच योगेशचा मृत्यू झाला. रविवारी सुशील, मनीषा व सावित्री या तिघांनाही इर्विनमध्ये दाखल करून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिघांनाही नागपूरला हलविण्यात आले. सोमवारी उपचारादरम्यान मनीषा हिचा मृत्यू झाला असून मंगळवारी सुशीलचा देखील मृत्यू झाला. आता भिलावेकर कुटुंबातील एक सदस्य सावित्री हिच्यावर उपचार सुरु आहे. तिघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांनी धारणमहू गावाला भेट देऊन सर्व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन चौकशी केली आहे. शिळा भात खाल्ल्याने चारही जणांची प्रकृती बिघडली होती. त्यातील बॉटिलिझन जंतूमुळे चारही मुलाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. - नितीन भालेराव,जिल्हा आरोग्य अधिकारीशिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. मात्र, अन्नाचे नमुने मिळाले नसून वरिष्ठांना माहिती दिली. - मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)