शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

अन्नातून विषबाधा; लागोपाठ तीन भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: May 11, 2016 00:31 IST

धारणी तालुक्यातील धारणमहू गावात शिळ्या भातातून विषबाधेच्या प्रकरणातील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.

बालिकेवर उपचार सुरु : धारणीतील धारणमहू गावातील घटना अमरावती : धारणी तालुक्यातील धारणमहू गावात शिळ्या भातातून विषबाधेच्या प्रकरणातील मृतांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. ७ मे रोजी ही घटना घडली होती. याच दिवशी उपचारादरम्यान योगेश नामक बालकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तीन गंभीर बालकांवर उपचार सुरू होते. सोमवारी मनीषा नामक मुलीचा तर मंगळवारी सुशीलनेही जगाचा निरोप घेतला. एका बालिकेवर अद्यापही नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश रामविलास भिलावेकर (८), सुशील भिलावेकर (७), मनीषा भिलावेकर (१२) अशी मृतांची नावे आहेत तर सावित्री भिलावेकर (१०) हिच्यावर उपचार सुरू आहेत. धारणमहू येथील रहिवासी भिलावेकर कुटुंबीयांनी ६ मे रोजी रात्री जेवणात भात बनविला होता. आई-वडिलांसह योगेश भिलावेकर, सुशील भिलावेकर, मनीषा भिलावेकर व सावित्री भिलावेकर या चार भावंडांनी तो भात खाल्ला. आरोग्य अधिकाऱ्याची धारणमहूला भेटअमरावती : थोडा भात शिल्लक राहिल्यानंतर तो भात दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेवला होता. दरम्यान ७ मे रोजी भिलावेकर कुटुंबातील आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले असता तो भात चार भावंडांनी खाल्ला. त्यानंतर त्या चारही भावंडांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलट्या, संडास व भोवळ येण्याचा त्रास जाणवला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता नेले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे चौघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. मात्र, इर्विनला आणतानाच योगेशचा मृत्यू झाला. रविवारी सुशील, मनीषा व सावित्री या तिघांनाही इर्विनमध्ये दाखल करून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिघांनाही नागपूरला हलविण्यात आले. सोमवारी उपचारादरम्यान मनीषा हिचा मृत्यू झाला असून मंगळवारी सुशीलचा देखील मृत्यू झाला. आता भिलावेकर कुटुंबातील एक सदस्य सावित्री हिच्यावर उपचार सुरु आहे. तिघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांनी धारणमहू गावाला भेट देऊन सर्व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन चौकशी केली आहे. शिळा भात खाल्ल्याने चारही जणांची प्रकृती बिघडली होती. त्यातील बॉटिलिझन जंतूमुळे चारही मुलाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. - नितीन भालेराव,जिल्हा आरोग्य अधिकारीशिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. मात्र, अन्नाचे नमुने मिळाले नसून वरिष्ठांना माहिती दिली. - मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)