शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

विजेने घेतले पाच वर्षांत ११७ बळी

By admin | Updated: June 14, 2015 00:25 IST

दरवर्षी पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजेने अनेक बळी जात असून मागील पाच वर्षांत अमरावती विभागात ११७ जणांना आपले

अमरावती विभागाची आकडेवारी : पावसाळ्यात शेतमजुरांचा अधिक मृत्यूमोहन राऊ त अमरावतीदरवर्षी पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजेने अनेक बळी जात असून मागील पाच वर्षांत अमरावती विभागात ११७ जणांना आपले प्राण गमवावे लागले़ यात सर्वाधिक मृत्यू शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांचे झाले आहेत़ दिवसेंदिवस बदलत्या निसर्ग चक्राची हानी सर्वच प्राणीमात्रांना बसत आहे़ उन्हाळ्यात ऊन्ह अधिक हिवाळ्यात थंडीचे प्रमाण सर्वाधिक असले तरी पावसाची सरासरी मात्र पावसाळ्यात कमी आहे़ ढगाळ वातावरण व विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होतो़ मागील पाच वर्षांत विजेने बळी घेतले आहे़ पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात गेलेल्या शेतमजुराला आपले प्राण या विजेमुळे गमवावे लागले़ विशेषत: यात पुरूष शेतमजुराचा मृत्यूत आकडा मोठा आहे़ पाच वर्षांत वाढली आकडेवारी शेतमजूर शेतात गेल्यानंतर येणाऱ्या पावसामुळे थेट मोठ्या झाडांचा आधार घेतोय व नेमक्या याच ठिकाणी वीज पडल्यामुळे जीव गमवावा लागतो. सर्वाधिक विजेचे बळी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात गेले आहेत़ तिसऱ्या क्रमांकावर अकोला, वाशीम हे जिल्हे आहेत़ येथील मृत शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असली तरी त्या कुटुंबीयांना मिळाणाऱ्या तोकड्या मदतीमुळे संसाराची मोठी हानी झाली आहे़ मागील दोन दशकात वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे मृग व आर्द्रा नक्षत्रात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत आहे़यावर्षीदेखील विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.२० हजार अ‍ॅम्पियरचा प्रवाहआभाळातल्या विजेपासून धोका पोहचू नये, सुरक्षितता मिळावी यासाठी, कॉक्स नावाच्या अभियांत्याने सूचना दिल्या आहेत़ आपल्या घरात आपण वापरत असलेली वीज आणि आभाळातील वीज यात तत्वत: काहीही फरक नसतो़ परंतु घरातील विजेचा प्रवाह हा एक ते पाच अ‍ॅम्पियर इतक्या तीव्रतेची तर आभाळातील विजेची तीव्रता २० ते २०० किलो अ‍ॅम्पियर इतकी असते़ जमिनीवर वीज पडते तेव्हा जमिनीतून किमान २० हजार अ‍ॅम्पियर इतका वीज प्रवाह वाहू लागतो़ अशा वेळी तिथे उभ्या असलेल्या माणसाच्या दोन्ही पायातील अंतरातील दोन बिंदूत व्होल्टेजमध्ये वाढ होते़ वीज नेहमी जवळच्या आणि वीज प्रवाहास कि मान विरोध करणाऱ्या मार्गानेच भूमिगत होण्याचा प्रयत्न करते़ उघड्यावर चालणाऱ्या, खेळणाऱ्या किंवा शेतात असलेल्या माणसाच्या डोक्यावर किंवा खांद्यावर वीज पडल्यास ती शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते़ तसेच जर मनुष्य झाडाजवळून जात असेल तेव्हा वीज पडली तर अगोदर झाडावर पडून नंतर माणसावर पडते़ तसेच त्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते़ त्यामुळे शरीरावर अशा गंभीर भाजण्याच्या जखमा होतात़ मनुष्य चालत असेल तर त्याचा हात अगोदर विजेच्या मार्गात आला तर दुसरी काहीही इजा न होता़ कोपऱ्यापासून हात कापल्याप्रमाणे तुटून पडल्याचे काही अपघात प्रकरणात दिसून येते़अशी घ्यावी काळजीविजेचा कडकडाट होत असताना उघड्या मैदानातील माणसाने दोन्ही पाय जवळ घेऊन उकिडवे बसावे, गुडघ्यात डोके घालून एखाद्या चेंडू सारखा आकार होईल असे पहावे. एखांद्या उंच इमारतीजवळ असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब त्या उंच इमारतीचा आश्रय घ्यावा़ आपण घरात असल्यास घरातील नळ, टेलीफोन, खिडक्या आणी विद्युत उपकरणापासून दूर रहावे़ जर विजांचा चमचमाट होऊन अर्ध्या मिनिटाच्या आत कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब मोठ्या इमारतीचा, शाळेच्या परिसरात असेल तर शाळेचा आश्रय घ्यावा. मोटार साइकलने प्रवास करत असाल तर किंवा इतर कुठल्याही ट्रॅक्टरसारख्या उघड्या वाहनात असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर अशा वाहनांपासून ताबडतोब दूर जाऊन चेंडूसारखे शरीराचा आकार करून उकिडवे बसावे़ बस सारख्या वाहनात असाल तर आतच बसून रहावे अशा खबरदाऱ्या घेतल्या तर कडकडणाऱ्या विजेपासून सरंक्षण मिळण्यास मदत होईल़निसर्गाच्या बदलत्या चक्रक्रमाने विजेमुळे प्राणहानी होते शेतात काम करणाऱ्या प्रत्येक शेतमजूर व शेतकऱ्यांनी या विजेपासून आपले सरंक्षण करण्याची काळजी घेणे गरजेचे आहे़पावसाळ्यात अधीक पावसाचा जोर तसेच विजेचा कडकडाट होत असल्याचे दिसताच एखांद्या शेतातील पक्या झोपडीचा आश्रय घ्यावा अथवा घराकडे यावेत मोठ्या वृक्षाखाली थांबू नयेत़- नितीन व्यवहारे,एस़डी ओ़चांदूर रेल्वे.