शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विजेने घेतले पाच वर्षांत ११७ बळी

By admin | Updated: June 14, 2015 00:25 IST

दरवर्षी पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजेने अनेक बळी जात असून मागील पाच वर्षांत अमरावती विभागात ११७ जणांना आपले

अमरावती विभागाची आकडेवारी : पावसाळ्यात शेतमजुरांचा अधिक मृत्यूमोहन राऊ त अमरावतीदरवर्षी पावसाळ्यात कडाडणाऱ्या विजेने अनेक बळी जात असून मागील पाच वर्षांत अमरावती विभागात ११७ जणांना आपले प्राण गमवावे लागले़ यात सर्वाधिक मृत्यू शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांचे झाले आहेत़ दिवसेंदिवस बदलत्या निसर्ग चक्राची हानी सर्वच प्राणीमात्रांना बसत आहे़ उन्हाळ्यात ऊन्ह अधिक हिवाळ्यात थंडीचे प्रमाण सर्वाधिक असले तरी पावसाची सरासरी मात्र पावसाळ्यात कमी आहे़ ढगाळ वातावरण व विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होतो़ मागील पाच वर्षांत विजेने बळी घेतले आहे़ पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात गेलेल्या शेतमजुराला आपले प्राण या विजेमुळे गमवावे लागले़ विशेषत: यात पुरूष शेतमजुराचा मृत्यूत आकडा मोठा आहे़ पाच वर्षांत वाढली आकडेवारी शेतमजूर शेतात गेल्यानंतर येणाऱ्या पावसामुळे थेट मोठ्या झाडांचा आधार घेतोय व नेमक्या याच ठिकाणी वीज पडल्यामुळे जीव गमवावा लागतो. सर्वाधिक विजेचे बळी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात गेले आहेत़ तिसऱ्या क्रमांकावर अकोला, वाशीम हे जिल्हे आहेत़ येथील मृत शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असली तरी त्या कुटुंबीयांना मिळाणाऱ्या तोकड्या मदतीमुळे संसाराची मोठी हानी झाली आहे़ मागील दोन दशकात वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे मृग व आर्द्रा नक्षत्रात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत आहे़यावर्षीदेखील विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.२० हजार अ‍ॅम्पियरचा प्रवाहआभाळातल्या विजेपासून धोका पोहचू नये, सुरक्षितता मिळावी यासाठी, कॉक्स नावाच्या अभियांत्याने सूचना दिल्या आहेत़ आपल्या घरात आपण वापरत असलेली वीज आणि आभाळातील वीज यात तत्वत: काहीही फरक नसतो़ परंतु घरातील विजेचा प्रवाह हा एक ते पाच अ‍ॅम्पियर इतक्या तीव्रतेची तर आभाळातील विजेची तीव्रता २० ते २०० किलो अ‍ॅम्पियर इतकी असते़ जमिनीवर वीज पडते तेव्हा जमिनीतून किमान २० हजार अ‍ॅम्पियर इतका वीज प्रवाह वाहू लागतो़ अशा वेळी तिथे उभ्या असलेल्या माणसाच्या दोन्ही पायातील अंतरातील दोन बिंदूत व्होल्टेजमध्ये वाढ होते़ वीज नेहमी जवळच्या आणि वीज प्रवाहास कि मान विरोध करणाऱ्या मार्गानेच भूमिगत होण्याचा प्रयत्न करते़ उघड्यावर चालणाऱ्या, खेळणाऱ्या किंवा शेतात असलेल्या माणसाच्या डोक्यावर किंवा खांद्यावर वीज पडल्यास ती शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते़ तसेच जर मनुष्य झाडाजवळून जात असेल तेव्हा वीज पडली तर अगोदर झाडावर पडून नंतर माणसावर पडते़ तसेच त्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने भूमिगत होते़ त्यामुळे शरीरावर अशा गंभीर भाजण्याच्या जखमा होतात़ मनुष्य चालत असेल तर त्याचा हात अगोदर विजेच्या मार्गात आला तर दुसरी काहीही इजा न होता़ कोपऱ्यापासून हात कापल्याप्रमाणे तुटून पडल्याचे काही अपघात प्रकरणात दिसून येते़अशी घ्यावी काळजीविजेचा कडकडाट होत असताना उघड्या मैदानातील माणसाने दोन्ही पाय जवळ घेऊन उकिडवे बसावे, गुडघ्यात डोके घालून एखाद्या चेंडू सारखा आकार होईल असे पहावे. एखांद्या उंच इमारतीजवळ असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब त्या उंच इमारतीचा आश्रय घ्यावा़ आपण घरात असल्यास घरातील नळ, टेलीफोन, खिडक्या आणी विद्युत उपकरणापासून दूर रहावे़ जर विजांचा चमचमाट होऊन अर्ध्या मिनिटाच्या आत कडकडाट ऐकू आला तर ताबडतोब मोठ्या इमारतीचा, शाळेच्या परिसरात असेल तर शाळेचा आश्रय घ्यावा. मोटार साइकलने प्रवास करत असाल तर किंवा इतर कुठल्याही ट्रॅक्टरसारख्या उघड्या वाहनात असताना विजांचा कडकडाट ऐकू आला तर अशा वाहनांपासून ताबडतोब दूर जाऊन चेंडूसारखे शरीराचा आकार करून उकिडवे बसावे़ बस सारख्या वाहनात असाल तर आतच बसून रहावे अशा खबरदाऱ्या घेतल्या तर कडकडणाऱ्या विजेपासून सरंक्षण मिळण्यास मदत होईल़निसर्गाच्या बदलत्या चक्रक्रमाने विजेमुळे प्राणहानी होते शेतात काम करणाऱ्या प्रत्येक शेतमजूर व शेतकऱ्यांनी या विजेपासून आपले सरंक्षण करण्याची काळजी घेणे गरजेचे आहे़पावसाळ्यात अधीक पावसाचा जोर तसेच विजेचा कडकडाट होत असल्याचे दिसताच एखांद्या शेतातील पक्या झोपडीचा आश्रय घ्यावा अथवा घराकडे यावेत मोठ्या वृक्षाखाली थांबू नयेत़- नितीन व्यवहारे,एस़डी ओ़चांदूर रेल्वे.