शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथे व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

अमरावती येथील साहित्यिकांची मागणी, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे साकडे अमरावती : राज्याचे पहिले नियोजित मराठी विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील ...

अमरावती येथील साहित्यिकांची मागणी, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे साकडे

अमरावती : राज्याचे पहिले नियोजित मराठी विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे व्हावे, अशी मागणी साहित्यिक नरेशचंद्र काठाेळे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मराठी विद्यापीठाच्या स्थापनेला अनुकूल कौल दिला आहे. हे नियोजित मराठी विद्यापीठ महानुभावपंथीयांची काशी असलेल्या व मराठीतील आद्यग्रंथ लिहिल्या गेलेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजारजवळील रिद्धपूर येथे व्हावे, अशी मागणी अमरावतीकर साहित्यिक, साहित्य संगम बहुजन साहित्य परिषदेचे संस्थापक नरेशचंद्र काठोळे यांनी केली आहे.

रिद्धपूर येथील वेगवेगळ्या मठात हजारो ग्रंथ आज उपलब्ध आहेत. या हस्तलिखितांचे जतन व्हावे, ही खरोखर काळाची गरज असून त्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पाठपुरावा केला. मराठीमधील सुरुवातीचे सर्व ग्रंथ हे महानुभाव पंथ यांच्या लेखकांनी लिहिले आहे, याबद्दल शंका नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी मराठीतील पहिले ग्रंथ लिहिले गेलेत आणि तत्कालीन व त्यानंतरच्या काळातील हस्तलिखिते जिथे आजही उपलब्ध आहेत, त्याच ठिकाणी हे नियोजित विद्यापीठ व्हावे, अशी मागणी नरेशचंद्र काठोळे यांनी केली आहे.

------------------

तंजावर संस्थान ग्रंथालयाच्या देखभालीसाठी आयएएस अधिकारी

तमिळनाडूतील तंजावर येथील जगप्रसिद्ध सरस्वती वाचनालयाला भेट देऊन तेथील दुर्मीळ हस्तलिखितांची व ग्रंथांची काठोळे यांनी नुकतीच पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांचे तंजावर हे संस्थान असून, त्या ठिकाणी या ग्रंथालयाच्या देखभालीसाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तेथील ग्रंथालयाच्या दालनात असलेल्या हस्तलिखितांची जपवणूक करण्यासाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

---------------

झाडीबोली नाट्य चळवळीकडे दुर्लक्ष

अमरावतीसह विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मराठी भाषेतील अनमोल खजिना दडलेला आहे. परंतु, शासन किंवा प्रस्थापित संस्थांतर्फे त्याची दखल घेण्यात आली नाही. चंद्रपूर-गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत चालणारी झाडीबोली नाट्यचळवळ आहे. रात्रभर चालणाऱ्या झाडीबोली नाटकांकडे मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.