शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

राज्याचे पहिले मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथे व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST

अमरावती येथील साहित्यिकांची मागणी, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे साकडे अमरावती : राज्याचे पहिले नियोजित मराठी विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील ...

अमरावती येथील साहित्यिकांची मागणी, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे साकडे

अमरावती : राज्याचे पहिले नियोजित मराठी विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे व्हावे, अशी मागणी साहित्यिक नरेशचंद्र काठाेळे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मराठी विद्यापीठाच्या स्थापनेला अनुकूल कौल दिला आहे. हे नियोजित मराठी विद्यापीठ महानुभावपंथीयांची काशी असलेल्या व मराठीतील आद्यग्रंथ लिहिल्या गेलेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजारजवळील रिद्धपूर येथे व्हावे, अशी मागणी अमरावतीकर साहित्यिक, साहित्य संगम बहुजन साहित्य परिषदेचे संस्थापक नरेशचंद्र काठोळे यांनी केली आहे.

रिद्धपूर येथील वेगवेगळ्या मठात हजारो ग्रंथ आज उपलब्ध आहेत. या हस्तलिखितांचे जतन व्हावे, ही खरोखर काळाची गरज असून त्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पाठपुरावा केला. मराठीमधील सुरुवातीचे सर्व ग्रंथ हे महानुभाव पंथ यांच्या लेखकांनी लिहिले आहे, याबद्दल शंका नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी मराठीतील पहिले ग्रंथ लिहिले गेलेत आणि तत्कालीन व त्यानंतरच्या काळातील हस्तलिखिते जिथे आजही उपलब्ध आहेत, त्याच ठिकाणी हे नियोजित विद्यापीठ व्हावे, अशी मागणी नरेशचंद्र काठोळे यांनी केली आहे.

------------------

तंजावर संस्थान ग्रंथालयाच्या देखभालीसाठी आयएएस अधिकारी

तमिळनाडूतील तंजावर येथील जगप्रसिद्ध सरस्वती वाचनालयाला भेट देऊन तेथील दुर्मीळ हस्तलिखितांची व ग्रंथांची काठोळे यांनी नुकतीच पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांचे तंजावर हे संस्थान असून, त्या ठिकाणी या ग्रंथालयाच्या देखभालीसाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तेथील ग्रंथालयाच्या दालनात असलेल्या हस्तलिखितांची जपवणूक करण्यासाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

---------------

झाडीबोली नाट्य चळवळीकडे दुर्लक्ष

अमरावतीसह विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मराठी भाषेतील अनमोल खजिना दडलेला आहे. परंतु, शासन किंवा प्रस्थापित संस्थांतर्फे त्याची दखल घेण्यात आली नाही. चंद्रपूर-गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत चालणारी झाडीबोली नाट्यचळवळ आहे. रात्रभर चालणाऱ्या झाडीबोली नाटकांकडे मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.