शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

महापालिकेच्या भिंतीवर कालबाह्य अग्निशमन यंत्रे

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

दोन वर्षांपूर्वी मंत्रालयात आग लागल्याच्या घटनेनंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘फायर आॅडिट’ करण्यात आले.

अमरावती : दोन वर्षांपूर्वी मंत्रालयात आग लागल्याच्या घटनेनंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘फायर आॅडिट’ करण्यात आले. त्यानुसार महापालिकेत एखाद्या प्रसंगी आग लागल्यास त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना म्हणून अग्निशमन यंत्रे लावण्यात आली; मात्र या अग्निशमन यंत्राची मर्यादा संपली असताना त्यांचे नूतनीकरण करण्यात आले नाही. परिणामी हा खर्च वाया जातो का? अशी भीती वर्तविली जात आहे.मंत्रालयात आग लागल्यानंतर झालेली हानी, कागदपत्रांचे नुकसान आणि खबरदारीच्या उपाययोजनांसाठी शासनाने महापालिका, नगरपरिषदांचे स्वतंत्र ‘फायर आॅडिट’ करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेत अग्निशमन यंत्रे, सुरक्षा खिडकी व दरवाजे, पायऱ्या आदींची व्यवस्था करण्यात आली. एखाद्या प्रसंगी आग लागल्यास अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे, त्याकरिता खिडकी, दरवाजे तयार करण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर मुख्य ठिकाणी भिंतीवर अग्निशमन यंत्रे लावण्यात आली आहेत. मात्र या यंत्राची मर्यादा संपल्याने ते कालबाह्य झाले आहेत. आग लागल्यास हे अग्निशमन यंत्रे निरूपयोगी ठरतील, हे वास्तव आहे. महापालिका मुख्य इमारत, अग्निशमन विभाग व पाच झोन कार्यालये असे लावण्यात आलेल्या एकूण १५० अग्निशमन यंत्राचा कालावधी २१ मार्च २०१३ पर्यंत निश्चित होता. त्यानंतर या यंत्राचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मात्र तिसरा महिना आला असतानासुध्दा या अग्निशमन यंत्राचे नूतनीकरण करण्यात आले नाही. ही यंत्रे भिंतीवर केवळ शोभेच्या वस्तू ठरू लागल्या आहेत. मोठा गाजावाजा करून ‘फायर आॅडिट’ करण्यात आले. अग्निशमन सुरक्षा निधीतून पाच लाख रूपये खर्चून ही यंत्रे खरेदी करण्यात आली. परंतु या यंत्राच्या नूतनीकरणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष चालविल्याने ती कुचकामी ठरेल, अशी स्थिती आहे.