शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

कुजलेल्या सोयाबीनमध्येही आशेचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानाची सद्यस्थिती पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट दहेंडा गाव गाठले आणि तेथील शेतकºयांकडून शेतीचे, पिकांचे नुकसान जाणून घेतले. दशकभराच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील सिपना, गडगा, तापी या मोठ्या नद्यांना महापूर गेलेत. फुगलेल्या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांसह शेती खरडून गेली.

पंकज लायदे/धारणी : मेळघाटातील आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर संकट कोसळले. सवंगणी झालेले सोयाबीन शेतात कुजले. शेंगांना कोंब फुटले असले तरी यामध्ये काहीतर मिळेल, या आशेपोटी शेतकरी कुजलेले सोयाबीनचे गंज जमा करीत असल्याचे तालुक्यातील जळजळीत वास्तव आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत असलेले आदिवासी बांधवावर यंदा परतीच्या पावसाने कुटाराघात घातला.शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानाची सद्यस्थिती पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट दहेंडा गाव गाठले आणि तेथील शेतकºयांकडून शेतीचे, पिकांचे नुकसान जाणून घेतले. दशकभराच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील सिपना, गडगा, तापी या मोठ्या नद्यांना महापूर गेलेत. फुगलेल्या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांसह शेती खरडून गेली. त्या अस्मानी संकटात भर पडली ती परतीच्या पावसाने. १ ऑक्टोबरपासून सलग महिन्याभर धारणी तालुक्यात पाऊस मुसळधार कोसळला. त्यामुळे सोयाबीन काढण्यासाठी शेतकºयांना सवडच मिळाली नाही. तीन दिवसांपासून उघाड असल्याने सोयाबीन शेतातच सवंगून ठेवण्यात आले. मात्र, कालपरवाच्या पावसाने गंजीतील सोयाबीनला कोंब फुटले. ते कुजले. दुसरीकडे कापसाच्या वाता झाल्या आहेत. बोंडे सडली. फुटून कापूस बाहेर पडला; मात्र पावसाची संततधार लागल्याने कापूस वेचता आला नाही.अशी आहे परिस्थिती‘लोकमत’ने प्रातिनिधिक स्वरूपात दहेंडा येथील आकाश जावरकर याची भेट घेतली. त्याच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. आई, वडील, मोठा भाऊ, लहान भाऊ असे पाच जणांचे कुटुंब आहे. आकाशने मोठ्या भावाला पुण्याला एका कंपनीत कामाला पाठविले. त्याने मशागतीसाठी २५ हजार रुपये पाठविले. त्यातून तीन एकरांत सोयाबीन पेरले. १८ नोव्हेंबरपासून परतीच्या पावसाने सोंगलेले सोयाबीन जमिनीवरच पड़ून राहिले. त्यातच उन्ह पडल्याने मंगळवारी त्याची उलथापालथ करण्यात आली. सोयाबीन पूर्ण काळे पडले आहे. परतीच्या पावसाने आमच्या तोंडचा घास हिसकला. आता रबीची पेरणी कुठल्या भरवशावर करावी, असा त्यांचा सवाल आहे. मायबाप सरकारने शेतांचे पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, असे मत आकाशने व्यक्त केले.

टॅग्स :agricultureशेती