शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

कुजलेल्या सोयाबीनमध्येही आशेचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानाची सद्यस्थिती पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट दहेंडा गाव गाठले आणि तेथील शेतकºयांकडून शेतीचे, पिकांचे नुकसान जाणून घेतले. दशकभराच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील सिपना, गडगा, तापी या मोठ्या नद्यांना महापूर गेलेत. फुगलेल्या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांसह शेती खरडून गेली.

पंकज लायदे/धारणी : मेळघाटातील आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर संकट कोसळले. सवंगणी झालेले सोयाबीन शेतात कुजले. शेंगांना कोंब फुटले असले तरी यामध्ये काहीतर मिळेल, या आशेपोटी शेतकरी कुजलेले सोयाबीनचे गंज जमा करीत असल्याचे तालुक्यातील जळजळीत वास्तव आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत असलेले आदिवासी बांधवावर यंदा परतीच्या पावसाने कुटाराघात घातला.शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानाची सद्यस्थिती पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट दहेंडा गाव गाठले आणि तेथील शेतकºयांकडून शेतीचे, पिकांचे नुकसान जाणून घेतले. दशकभराच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील सिपना, गडगा, तापी या मोठ्या नद्यांना महापूर गेलेत. फुगलेल्या नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांसह शेती खरडून गेली. त्या अस्मानी संकटात भर पडली ती परतीच्या पावसाने. १ ऑक्टोबरपासून सलग महिन्याभर धारणी तालुक्यात पाऊस मुसळधार कोसळला. त्यामुळे सोयाबीन काढण्यासाठी शेतकºयांना सवडच मिळाली नाही. तीन दिवसांपासून उघाड असल्याने सोयाबीन शेतातच सवंगून ठेवण्यात आले. मात्र, कालपरवाच्या पावसाने गंजीतील सोयाबीनला कोंब फुटले. ते कुजले. दुसरीकडे कापसाच्या वाता झाल्या आहेत. बोंडे सडली. फुटून कापूस बाहेर पडला; मात्र पावसाची संततधार लागल्याने कापूस वेचता आला नाही.अशी आहे परिस्थिती‘लोकमत’ने प्रातिनिधिक स्वरूपात दहेंडा येथील आकाश जावरकर याची भेट घेतली. त्याच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. आई, वडील, मोठा भाऊ, लहान भाऊ असे पाच जणांचे कुटुंब आहे. आकाशने मोठ्या भावाला पुण्याला एका कंपनीत कामाला पाठविले. त्याने मशागतीसाठी २५ हजार रुपये पाठविले. त्यातून तीन एकरांत सोयाबीन पेरले. १८ नोव्हेंबरपासून परतीच्या पावसाने सोंगलेले सोयाबीन जमिनीवरच पड़ून राहिले. त्यातच उन्ह पडल्याने मंगळवारी त्याची उलथापालथ करण्यात आली. सोयाबीन पूर्ण काळे पडले आहे. परतीच्या पावसाने आमच्या तोंडचा घास हिसकला. आता रबीची पेरणी कुठल्या भरवशावर करावी, असा त्यांचा सवाल आहे. मायबाप सरकारने शेतांचे पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, असे मत आकाशने व्यक्त केले.

टॅग्स :agricultureशेती