शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी, आठवीचे वर्ग जोडण्यास स्थगिती ?

By admin | Updated: May 5, 2016 00:28 IST

स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) रोखून धरल्या आहेत.

शासन निर्णयाची प्रतीक्षा : शिक्षक आमदारांची मंत्र्यांशी चर्चा अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) रोखून धरल्या आहेत. या पार्श्वभूमिवर पाचवी व आठवीचे वर्ग नव्याने जोडण्यास स्थगिती मिळण्याचे संकेत आहेत. अमरावतीचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत मंत्र्यांकडे पाठपुरावा चालविला आहे. राज्यात पूर्वी पहिली ते चौथी प्राथमिक, पहिला ते सातवी पूर्व माध्यमिक, पाच ते दहावी माध्यमिक, आठवीं ते दहावी माध्यमिक, पाचवी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक, आठवी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक असे स्तर होते. परंतु बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम २००९ (आरटीआई अनुसार) शैक्षणिक स्तर बदलण्यात आला. आता नव्या प्रक्रियेत पहिली ते पाचवी प्राथमिक, दहावी ते आठवी उच्च प्राथमिक, नववी ते दहावी माध्यमिक व अकरावी -बारावीच्या शाळांना उच्च माध्यमिक व अकरावी-बारावींच्या शाळांना उच्च माध्यमिक संबोधल्या जाते. या अनुषंगाने पुणे शिक्षण संचालक यांच्या पत्रानुसार येथे पहिली ते चवथी पर्यंतचे वर्ग आहेत तेथे पाचवा, येथे वर्ग ७ ते ९ किंवा १ ते ७ किंवा ५ ते ७ वींचे वर्ग आहेत. तेथे ८ वा वर्ग जोडण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना टिसी रोखून धरल्या. आरटीई २००९ नुसार बालकांचे दाखले रोखता येत नाहीत. जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देवून दाखले देत नसल्याची बाब आ. श्रीकांत देशपांडे यांनी नोंदविली आहे. (प्रतिनिधी)म्हणून व्हावी प्रक्रिया रद्द पाचवी आणि आठवीचे नवे वर्ग जोडतांना पुरेशा वर्ग खोल्या व प्रशिक्षित विषय शिक्षक नियुक्त होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या पूर्व माध्यमिक शाळांमध्ये गणित व विज्ञान शिक्षक नाहीत. त्यामुळे वर्ग पाच व आठ जोडण्याची प्रक्रिया रद्द करावी असे निवेदन आ. देशपांडे यांनी दिले आहे. या संदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटिल यांच्याशी चर्चा केली आहे. या संबंधीच्या फाईलवर शालेय शिक्षण सचिवांनी अभिप्राय दिला आहे. ना.तावडे राज्यात परतल्यानंतर पाचवी ते आठवींचे वर्ग जोडण्याची प्रक्रिया रद्द करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित होण्याचा आशावाद आ. देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.