शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पाचवी, आठवीचे वर्ग जोडण्यास स्थगिती ?

By admin | Updated: May 5, 2016 00:28 IST

स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) रोखून धरल्या आहेत.

शासन निर्णयाची प्रतीक्षा : शिक्षक आमदारांची मंत्र्यांशी चर्चा अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) रोखून धरल्या आहेत. या पार्श्वभूमिवर पाचवी व आठवीचे वर्ग नव्याने जोडण्यास स्थगिती मिळण्याचे संकेत आहेत. अमरावतीचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत मंत्र्यांकडे पाठपुरावा चालविला आहे. राज्यात पूर्वी पहिली ते चौथी प्राथमिक, पहिला ते सातवी पूर्व माध्यमिक, पाच ते दहावी माध्यमिक, आठवीं ते दहावी माध्यमिक, पाचवी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक, आठवी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक असे स्तर होते. परंतु बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम २००९ (आरटीआई अनुसार) शैक्षणिक स्तर बदलण्यात आला. आता नव्या प्रक्रियेत पहिली ते पाचवी प्राथमिक, दहावी ते आठवी उच्च प्राथमिक, नववी ते दहावी माध्यमिक व अकरावी -बारावीच्या शाळांना उच्च माध्यमिक व अकरावी-बारावींच्या शाळांना उच्च माध्यमिक संबोधल्या जाते. या अनुषंगाने पुणे शिक्षण संचालक यांच्या पत्रानुसार येथे पहिली ते चवथी पर्यंतचे वर्ग आहेत तेथे पाचवा, येथे वर्ग ७ ते ९ किंवा १ ते ७ किंवा ५ ते ७ वींचे वर्ग आहेत. तेथे ८ वा वर्ग जोडण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना टिसी रोखून धरल्या. आरटीई २००९ नुसार बालकांचे दाखले रोखता येत नाहीत. जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देवून दाखले देत नसल्याची बाब आ. श्रीकांत देशपांडे यांनी नोंदविली आहे. (प्रतिनिधी)म्हणून व्हावी प्रक्रिया रद्द पाचवी आणि आठवीचे नवे वर्ग जोडतांना पुरेशा वर्ग खोल्या व प्रशिक्षित विषय शिक्षक नियुक्त होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या पूर्व माध्यमिक शाळांमध्ये गणित व विज्ञान शिक्षक नाहीत. त्यामुळे वर्ग पाच व आठ जोडण्याची प्रक्रिया रद्द करावी असे निवेदन आ. देशपांडे यांनी दिले आहे. या संदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटिल यांच्याशी चर्चा केली आहे. या संबंधीच्या फाईलवर शालेय शिक्षण सचिवांनी अभिप्राय दिला आहे. ना.तावडे राज्यात परतल्यानंतर पाचवी ते आठवींचे वर्ग जोडण्याची प्रक्रिया रद्द करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित होण्याचा आशावाद आ. देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.