शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

खताच्या दरवाढीने शेतकरी हतबल

By admin | Updated: May 27, 2014 23:21 IST

सध्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून पावसाळ्याच्या मुहूर्तावर उन्हाळी व खरीप हंगामात पिकांना डोस देण्यासाठी रासायनिक खतांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे.

अमरावती : सध्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून पावसाळ्याच्या मुहूर्तावर उन्हाळी व खरीप हंगामात पिकांना डोस देण्यासाठी रासायनिक खतांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे. मागील चार वर्षात खतांच्या किमतीत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे व उत्पादीत मालास आधारभूत किंमत मिळत नसल्याचे समोर येत असल्याने शेतकरी हतबल असल्याचे चित्र आहे.

वारेमाप खते वापरून पीक चांगले घ्यावे तर त्या पिकाला आधारभूत किंमत मिळेल याची खात्री नाही आणि खतेच नाही वापरावीत तर उत्पादनात कमालीची घट यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. देशात हरितक्रांती करण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा वापर सुरू झाला परिणामी अतिरिक्त रासायनिक खताच्या वापराने जमिनीचा पोत घसरला. प्रत्येक वर्षी उत्पादनात वाढ होण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा अधिक डोस देण्याकडे शेतकर्‍यांचा कल राहिला. मात्र प्रत्येक वर्षी होणार्‍या अतिरिक्त खताच्या मापाने जमिनी खराब झाल्या. खते वाढवूनही पिकांचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत मिळेनासे झाले यामुळे खताचा वापर पुन्हा वाढला. खताचा वापर वाढू लागल्याने कंपन्यांनी किमतीही वाढविल्या. आता या वाढीव किमतीमुळे व उत्पादनात दिवसेंदिवस होणार्‍या घटीमुळे शेती व्यवसायच तोट्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. २0१0 च्या तुलनेत रासायनिक खतांच्या किमतीत अडीच पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे पण या खतांच्या दरवाढीचा विचार करता उत्पादीत पिकांच्या किमतीत वाढ झाली नाही. त्यातच खत विक्रेते या खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून वाढ रक्कम उचलतात. तो भाग वेगळाच त्यात काही न खरपणारी व अधिक कमीशन असणारी खते या रासायनिक खतांच्या बरोबर ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रमाणही वाढले आहे. (प्रतिनिधी)