शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

खताच्या दरवाढीने शेतकरी हतबल

By admin | Updated: May 27, 2014 23:21 IST

सध्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून पावसाळ्याच्या मुहूर्तावर उन्हाळी व खरीप हंगामात पिकांना डोस देण्यासाठी रासायनिक खतांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे.

अमरावती : सध्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून पावसाळ्याच्या मुहूर्तावर उन्हाळी व खरीप हंगामात पिकांना डोस देण्यासाठी रासायनिक खतांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे. मागील चार वर्षात खतांच्या किमतीत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे व उत्पादीत मालास आधारभूत किंमत मिळत नसल्याचे समोर येत असल्याने शेतकरी हतबल असल्याचे चित्र आहे.

वारेमाप खते वापरून पीक चांगले घ्यावे तर त्या पिकाला आधारभूत किंमत मिळेल याची खात्री नाही आणि खतेच नाही वापरावीत तर उत्पादनात कमालीची घट यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. देशात हरितक्रांती करण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा वापर सुरू झाला परिणामी अतिरिक्त रासायनिक खताच्या वापराने जमिनीचा पोत घसरला. प्रत्येक वर्षी उत्पादनात वाढ होण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा अधिक डोस देण्याकडे शेतकर्‍यांचा कल राहिला. मात्र प्रत्येक वर्षी होणार्‍या अतिरिक्त खताच्या मापाने जमिनी खराब झाल्या. खते वाढवूनही पिकांचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत मिळेनासे झाले यामुळे खताचा वापर पुन्हा वाढला. खताचा वापर वाढू लागल्याने कंपन्यांनी किमतीही वाढविल्या. आता या वाढीव किमतीमुळे व उत्पादनात दिवसेंदिवस होणार्‍या घटीमुळे शेती व्यवसायच तोट्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. २0१0 च्या तुलनेत रासायनिक खतांच्या किमतीत अडीच पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे पण या खतांच्या दरवाढीचा विचार करता उत्पादीत पिकांच्या किमतीत वाढ झाली नाही. त्यातच खत विक्रेते या खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून वाढ रक्कम उचलतात. तो भाग वेगळाच त्यात काही न खरपणारी व अधिक कमीशन असणारी खते या रासायनिक खतांच्या बरोबर ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रमाणही वाढले आहे. (प्रतिनिधी)