शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खताच्या दरवाढीने शेतकरी हतबल

By admin | Updated: May 27, 2014 23:21 IST

सध्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून पावसाळ्याच्या मुहूर्तावर उन्हाळी व खरीप हंगामात पिकांना डोस देण्यासाठी रासायनिक खतांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे.

अमरावती : सध्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांकडून पावसाळ्याच्या मुहूर्तावर उन्हाळी व खरीप हंगामात पिकांना डोस देण्यासाठी रासायनिक खतांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे. मागील चार वर्षात खतांच्या किमतीत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे व उत्पादीत मालास आधारभूत किंमत मिळत नसल्याचे समोर येत असल्याने शेतकरी हतबल असल्याचे चित्र आहे.

वारेमाप खते वापरून पीक चांगले घ्यावे तर त्या पिकाला आधारभूत किंमत मिळेल याची खात्री नाही आणि खतेच नाही वापरावीत तर उत्पादनात कमालीची घट यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. देशात हरितक्रांती करण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा वापर सुरू झाला परिणामी अतिरिक्त रासायनिक खताच्या वापराने जमिनीचा पोत घसरला. प्रत्येक वर्षी उत्पादनात वाढ होण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा अधिक डोस देण्याकडे शेतकर्‍यांचा कल राहिला. मात्र प्रत्येक वर्षी होणार्‍या अतिरिक्त खताच्या मापाने जमिनी खराब झाल्या. खते वाढवूनही पिकांचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत मिळेनासे झाले यामुळे खताचा वापर पुन्हा वाढला. खताचा वापर वाढू लागल्याने कंपन्यांनी किमतीही वाढविल्या. आता या वाढीव किमतीमुळे व उत्पादनात दिवसेंदिवस होणार्‍या घटीमुळे शेती व्यवसायच तोट्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. २0१0 च्या तुलनेत रासायनिक खतांच्या किमतीत अडीच पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे पण या खतांच्या दरवाढीचा विचार करता उत्पादीत पिकांच्या किमतीत वाढ झाली नाही. त्यातच खत विक्रेते या खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून वाढ रक्कम उचलतात. तो भाग वेगळाच त्यात काही न खरपणारी व अधिक कमीशन असणारी खते या रासायनिक खतांच्या बरोबर ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रमाणही वाढले आहे. (प्रतिनिधी)