शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

जिल्ह्यात चाराटंचाईचे सावट

By admin | Updated: May 6, 2015 00:26 IST

पावसाची अनियमितता आणि वैरण नियोजनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना चाराटंचाईचा ...

दुष्काळ : १५ जूननंतर संकट गडद होण्याची शक्यताअमरावती : पावसाची अनियमितता आणि वैरण नियोजनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना चाराटंचाईचा सामना आतापासूनच करावा लागत असून बाजारात ढेपेसह पशुखाद्यांचे भावही वाढल्याने दुग्ध व्यवसायामोरील संकटे वाढली आहेत. मागणीपेक्षा दुधाचा कमी पुरवठा अशी स्थिती असताना चाराटंचाईचे नवे संकट उभे ठाकले आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पशुधनाच्या चाऱ्याची गरज दरमहा १ लाख ४ हजार मे.टन आहे. तर एकूण अपेक्षित चारा उत्पादन दरमहा ५ लाख ३० हजार मे टन आहे. मात्र नैसर्गिक संकटामुळे वैरणाचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. जिल्ह्यात मोठ वनक्षेत्र आहे. पण नैसर्गिक कुरणेही संकुचित होत चालली आहेत. या कुरणांचे व्यवस्थापन आणि विकास करणे आवश्यक असणाऱ्या त्याकडे दुर्लक्ष आहे. मुबलक चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंजनसारख्या वृक्षांची लागवड गवताच्या कुरणांचा विकास अशा उपाययोजना वनविभागाच्या सहकार्र्यान होती घेणे कृषी विभागाच्या सहकार्याने शेताच्या बांधावर चारा उत्पादक वृक्षांची लागवड करणे अशा उपाययोजना आता सूचविण्यात आल्या आहेत. यंदा पावसाच्या अनियमिततेचा फटका सोयाबीनला बसला. तूर व ज्वारीही अनेक भागात नष्ट झाली. रब्बी हंगामात अकाली पाऊ स आणि गारपीटीने पिके जमीदोस्त झाल्याने गुरांचा चारा दिसेनासा झाला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूग्ध व्यवसायाकडे वळलेल्या शेतकऱ्यांना पशुधन कुठेही करणे कठीण झाले आहे. चाराटंचाईमुळे शेतकरी कुठे गुरे खरेदी करण्यासाठी धनवान नसल्याचे चित्र विविध ठिकाणच्या बाजारपेठेत दिसून येते. सोयबाीन सारख्या पिकांच्या अवशेषाचा वापरही चारा म्हणून केला जावू शकतो. अशा चाऱ्यामधून जनावरांना पोषक खाद्यही उपलब्ध होते. सध्या जिल्ह्यात पुरेसा चारा आहे. मात्र १५ जूनपर्यंत पाऊस न आल्यास जिल्ह्यात पशुधनाच्या चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास चाऱ्याची मागणी आली नाही. - पी.व्ही. सोळंके, पशुधन विकास अधिकारी