शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

जिल्ह्यात चाराटंचाईचे सावट

By admin | Updated: May 6, 2015 00:26 IST

पावसाची अनियमितता आणि वैरण नियोजनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना चाराटंचाईचा ...

दुष्काळ : १५ जूननंतर संकट गडद होण्याची शक्यताअमरावती : पावसाची अनियमितता आणि वैरण नियोजनाच्या अभावामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना चाराटंचाईचा सामना आतापासूनच करावा लागत असून बाजारात ढेपेसह पशुखाद्यांचे भावही वाढल्याने दुग्ध व्यवसायामोरील संकटे वाढली आहेत. मागणीपेक्षा दुधाचा कमी पुरवठा अशी स्थिती असताना चाराटंचाईचे नवे संकट उभे ठाकले आहे. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पशुधनाच्या चाऱ्याची गरज दरमहा १ लाख ४ हजार मे.टन आहे. तर एकूण अपेक्षित चारा उत्पादन दरमहा ५ लाख ३० हजार मे टन आहे. मात्र नैसर्गिक संकटामुळे वैरणाचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. जिल्ह्यात मोठ वनक्षेत्र आहे. पण नैसर्गिक कुरणेही संकुचित होत चालली आहेत. या कुरणांचे व्यवस्थापन आणि विकास करणे आवश्यक असणाऱ्या त्याकडे दुर्लक्ष आहे. मुबलक चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंजनसारख्या वृक्षांची लागवड गवताच्या कुरणांचा विकास अशा उपाययोजना वनविभागाच्या सहकार्र्यान होती घेणे कृषी विभागाच्या सहकार्याने शेताच्या बांधावर चारा उत्पादक वृक्षांची लागवड करणे अशा उपाययोजना आता सूचविण्यात आल्या आहेत. यंदा पावसाच्या अनियमिततेचा फटका सोयाबीनला बसला. तूर व ज्वारीही अनेक भागात नष्ट झाली. रब्बी हंगामात अकाली पाऊ स आणि गारपीटीने पिके जमीदोस्त झाल्याने गुरांचा चारा दिसेनासा झाला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूग्ध व्यवसायाकडे वळलेल्या शेतकऱ्यांना पशुधन कुठेही करणे कठीण झाले आहे. चाराटंचाईमुळे शेतकरी कुठे गुरे खरेदी करण्यासाठी धनवान नसल्याचे चित्र विविध ठिकाणच्या बाजारपेठेत दिसून येते. सोयबाीन सारख्या पिकांच्या अवशेषाचा वापरही चारा म्हणून केला जावू शकतो. अशा चाऱ्यामधून जनावरांना पोषक खाद्यही उपलब्ध होते. सध्या जिल्ह्यात पुरेसा चारा आहे. मात्र १५ जूनपर्यंत पाऊस न आल्यास जिल्ह्यात पशुधनाच्या चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास चाऱ्याची मागणी आली नाही. - पी.व्ही. सोळंके, पशुधन विकास अधिकारी