शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

मरणाच्या भीतीने गिरगुटीत एकानेच घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

लोकमत विशेष फोटो ०५एएमपीएच२५, कॅप्शन - शिबिरात लस टोचण्यासाठी पोहचलेली एकमेव लाभार्थी ०५एएमपीएच२५ - आदिवासींचे प्रबोधन करताना वासंती मंगरोळे ...

लोकमत विशेष

फोटो ०५एएमपीएच२५, कॅप्शन - शिबिरात लस टोचण्यासाठी पोहचलेली एकमेव लाभार्थी

०५एएमपीएच२५ - आदिवासींचे प्रबोधन करताना वासंती मंगरोळे व दयाराम काळे

नरेंद्र जावरे - चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरण शिबिरात नव्वद जणांचे लसीकरण झाले. त्यापैकी गावातील एकमेव व्यक्तीने महत्प्रयासाने लस घेतली. उर्वरित ८९ नागरिक वरूड, अंजनगाव सुर्जी, परतवाडा, अचलपूर आदी भागातून येऊन लस घेऊन निघून गेले. देशभर कोरोना लसीसाठी मारामार सुरू असताना, मेळघाटात मात्र लस घेतल्याने माणसाचा मृत्यू होतो, ही अफवा चार दिवसांपासून दोनशेपेक्षा अधिक गावांत पसरली. यामुळे आदिवासींनी लस टोचून घेणे बंद केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

आंबापाटी गावातील काही नागरिकांनी पसरविलेली मृत्यूची अफवा मेळघाटच्या दोनशेपेक्षा अधिक गावांत पोहोचली. यामुळे आदिवासी कोरोनाची लस घेण्यास तयार नाहीत. हा गैरसमज निघून जावा, यासाठी या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे व जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरण शिबिर आयोजित केले. आरोग्य विभागाने त्याची तयारीही केली. मंडप टाकण्यात आला. परंतु, दोन तास झाले तरीही एकही आदिवासी लस घ्यायला तयारच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे उपस्थित अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी संवाद साधून कारण शोधले तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. लस घेतल्याने माणूस मरतो. त्यामुळे आम्ही लस घेत नसल्याचे आदिवासींनी त्यांनी सांगितले.

बॉक्स

अथक प्रयत्नानंतर एकानेच घेतली लस, ८९ आले तालुक्याबाहेरील

गिरगुटी गावात मंगळवारी एकूण ९० जणांनी लस घेतल्याची नोंद झाली. प्रत्यक्षात त्या गावातील एकच आदिवासीने ही लस घेतली, तर उर्वरित अचलपूर, परतवाडा, वरूड, अंजनगाव अशा तालुक्याबाहेरील लोकांनी ऑनलाईन नोंदणी करून आदिवासी पाड्यात जाऊन लस घेतली.

बॉक्स

जनजागृती मोहीम आवश्यक

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात १६ हून अधिक गावे ‘हॉट स्पॉट’ ठरली आहेत. दुसरीकडे आदिवासी लस घ्यायला तयार नसल्याने आरोग्य यंत्रणेपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेमार्फत गावागावांत कोरोना लसीसंदर्भात जनजागरण मोहीम करणे गरजेचे ठरले आहे.

कोट

लस घेतल्याने माणूस मरतो, अशी अफवा मेळघाटात पसरली आहे. गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरणात गावातील एकमेव लाभार्थी होता.

- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा

कोट

गिरगुटीत गावातील नागरिकांना कोरोना लसीसंदर्भात संपूर्ण माहिती दिली. परंतु, अथक प्रयत्नानंतर केवळ एकानेच लस घेतली. प्रत्येक गावात आता जिल्हा परिषद मार्फत जनजागृती मोहीम सुरु करीत आहोत. अफवांना थारा देऊ नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.

- दयाराम काळे, समाजकल्याण सभापती

जि. प. अमरावती