शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पशुखाद्य विक्रेत्यांना दुष्काळाच्या झळा

By admin | Updated: April 26, 2015 00:21 IST

जनावरे सांभाळणाऱ्या मजुरांचा तुटवडा आणि सततची चाराटंचाई, यामुळे पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरे विक्रीला काढली आहेत.

जनावरांची संख्या घटतेय : शहरात केवळ १०-१५ खाद्यविक्रेतेमनीष कहाते अमरावतीजनावरे सांभाळणाऱ्या मजुरांचा तुटवडा आणि सततची चाराटंचाई, यामुळे पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरे विक्रीला काढली आहेत. त्याचा फटका शहरातील जनावरांच्या खाद्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बसला आहे. शेतकरी म्हटले की, त्यांच्याकडे गाय, बैलजोडी, म्हैस, बकऱ्या, घोडे इत्यादी जनावरे असावीत, अशी आपली संकल्पना असते. परंतु गोठ्यातील या जनावरांची देखभाल करणे सहज सोपे नाही. त्यांच्या शेणगोठ्यासाठी मनुष्यबळ लागते. ग्रामीण भागात मजूर मिळत नसल्याने या पशुंच्या देखभालीची समस्या उभी राहते. याच कारणामुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. काही शेतकरी बाजारात मिळेल त्या भावाने जनावरांची विक्री करीत आहेत. परिणामी शहरालगत आणि शहरातील पशुपालकांच्या भरवशावरच इतवारीतील पशुखाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हशी म्हटल्या की, दूध विकल्यावर महिन्याकाठी मिळणाऱ्या रकमेतून खाद्य विक्रेत्याची उधारी शेतकऱ्यांना चुकवावी लागते. ‘नगदी कमी उधार जास्त’ अशा अलिखित नियमानुसार इतवारीतील पशुखाद्य विक्रेते त्यांचा व्यवसाय करीत आहेत.ढेप, सरकी, तुरीची चुरी, मका चुरी, कडबा-कुट्टी हे जनावरांचे खाद्य आहेत. सद्यस्थितीत ढेप १४०० रुपये क्विंटल, तुरीची चुरी १३०० रुपये प्रति क्विंटल या दराने विकली जाते. शहरात विलासनगर, कॉटन मार्केट आणि इतवारा भागात पशुखाद्य विक्रेत्यांची दुकाने आहेत. म्हशीच्या दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी देतील त्या रकमेवर खाद्यविक्रेते अवलंबून असल्याचे चित्र आहे. पशू खाद्यविक्रेत्यांना रोखीने हे खाद्य खरेदी करून पशुधारकांना उधारित द्यावे लागते. एखादी म्हैस मरण पावली किंवा तिने दूध देणे बंद केले तर त्याचा फटका थेट पशुखाद्य विक्रेत्याला बसतो. त्याची उधारी वसूल होत नाही. त्यामुळे हा व्यवसाय बेभरवशाचा झाल्याची ओरड इतवारीतील पशू खाद्यविक्रेत्यांनी सुरू केली आहे. सद्यस्थितीत दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. शेतकऱ्यांच्या घरात कोणत्याच प्रकारचे धान्य नाही. त्यामुळे दैनंदिन खर्च कसा करावा, याच्या शोधात शेतकरी आहेत. अमरावती शहरात जरी शेतकरी नसला तरी परिसरातील शेतकऱ्यांवरच शहरातील पशू खाद्यविक्रेते अवलंबून आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस खाद्यविक्रेत्यांच्या दुकानांची संख्या कमी होताना दिसत आहे.जनावरांचे जास्तीत जास्त खाद्य शहरातील औद्योगिक वसाहतीत तयार होते. त्यामुळे दळवळणाचा खर्च कमी येतोे. म्हणून तुलनेत येथील बाजारपेठेत जनावरांचे खाद्य कमी दराने मिळत आहे. त्यामुळे खाद्यविक्रेत्यांना नफा कमी मिळतो, हे जरी खरे असले तरी पशुखाद्याची विक्री दुष्काळजन्य परिस्थितीमुळे होत नाही, हे वास्तव आहे. मी ५० वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करीत आहे. ढेप खाऊ घातल्याशिवाय म्हैस दूध देत नाही. त्यामुळे महिनाभर उधारीवर ढेप आणावी लागते. जनावरांच्या देखभालीकरिता गडी माणसेदेखील मिळत नाहीत. - प्रकाश शिरसाट, रामगाव, पशुपालक.संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी वातावरण आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धंदा अर्ध्यावर आला आहे. जिल्ह्यात जनावरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे धंद्यावर फरक जाणवतो. - अजय जैन,पशुखाद्य विक्रेते, विलासनगर, अमरावती.अमरावती शहराच्या आसपास असलेल्या पशुपालकांवर आमचा व्यवसाय अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी पाळीव पशुंची संख्या कमी केली. त्यामुळे धंद्यावर परिणाम झाला आहे.- सुनील देवाणी,ढेप विक्रेता, अमरावती.