शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पशुखाद्य विक्रेत्यांना दुष्काळाच्या झळा

By admin | Updated: April 26, 2015 00:21 IST

जनावरे सांभाळणाऱ्या मजुरांचा तुटवडा आणि सततची चाराटंचाई, यामुळे पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरे विक्रीला काढली आहेत.

जनावरांची संख्या घटतेय : शहरात केवळ १०-१५ खाद्यविक्रेतेमनीष कहाते अमरावतीजनावरे सांभाळणाऱ्या मजुरांचा तुटवडा आणि सततची चाराटंचाई, यामुळे पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरे विक्रीला काढली आहेत. त्याचा फटका शहरातील जनावरांच्या खाद्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बसला आहे. शेतकरी म्हटले की, त्यांच्याकडे गाय, बैलजोडी, म्हैस, बकऱ्या, घोडे इत्यादी जनावरे असावीत, अशी आपली संकल्पना असते. परंतु गोठ्यातील या जनावरांची देखभाल करणे सहज सोपे नाही. त्यांच्या शेणगोठ्यासाठी मनुष्यबळ लागते. ग्रामीण भागात मजूर मिळत नसल्याने या पशुंच्या देखभालीची समस्या उभी राहते. याच कारणामुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. काही शेतकरी बाजारात मिळेल त्या भावाने जनावरांची विक्री करीत आहेत. परिणामी शहरालगत आणि शहरातील पशुपालकांच्या भरवशावरच इतवारीतील पशुखाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हशी म्हटल्या की, दूध विकल्यावर महिन्याकाठी मिळणाऱ्या रकमेतून खाद्य विक्रेत्याची उधारी शेतकऱ्यांना चुकवावी लागते. ‘नगदी कमी उधार जास्त’ अशा अलिखित नियमानुसार इतवारीतील पशुखाद्य विक्रेते त्यांचा व्यवसाय करीत आहेत.ढेप, सरकी, तुरीची चुरी, मका चुरी, कडबा-कुट्टी हे जनावरांचे खाद्य आहेत. सद्यस्थितीत ढेप १४०० रुपये क्विंटल, तुरीची चुरी १३०० रुपये प्रति क्विंटल या दराने विकली जाते. शहरात विलासनगर, कॉटन मार्केट आणि इतवारा भागात पशुखाद्य विक्रेत्यांची दुकाने आहेत. म्हशीच्या दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी देतील त्या रकमेवर खाद्यविक्रेते अवलंबून असल्याचे चित्र आहे. पशू खाद्यविक्रेत्यांना रोखीने हे खाद्य खरेदी करून पशुधारकांना उधारित द्यावे लागते. एखादी म्हैस मरण पावली किंवा तिने दूध देणे बंद केले तर त्याचा फटका थेट पशुखाद्य विक्रेत्याला बसतो. त्याची उधारी वसूल होत नाही. त्यामुळे हा व्यवसाय बेभरवशाचा झाल्याची ओरड इतवारीतील पशू खाद्यविक्रेत्यांनी सुरू केली आहे. सद्यस्थितीत दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. शेतकऱ्यांच्या घरात कोणत्याच प्रकारचे धान्य नाही. त्यामुळे दैनंदिन खर्च कसा करावा, याच्या शोधात शेतकरी आहेत. अमरावती शहरात जरी शेतकरी नसला तरी परिसरातील शेतकऱ्यांवरच शहरातील पशू खाद्यविक्रेते अवलंबून आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस खाद्यविक्रेत्यांच्या दुकानांची संख्या कमी होताना दिसत आहे.जनावरांचे जास्तीत जास्त खाद्य शहरातील औद्योगिक वसाहतीत तयार होते. त्यामुळे दळवळणाचा खर्च कमी येतोे. म्हणून तुलनेत येथील बाजारपेठेत जनावरांचे खाद्य कमी दराने मिळत आहे. त्यामुळे खाद्यविक्रेत्यांना नफा कमी मिळतो, हे जरी खरे असले तरी पशुखाद्याची विक्री दुष्काळजन्य परिस्थितीमुळे होत नाही, हे वास्तव आहे. मी ५० वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करीत आहे. ढेप खाऊ घातल्याशिवाय म्हैस दूध देत नाही. त्यामुळे महिनाभर उधारीवर ढेप आणावी लागते. जनावरांच्या देखभालीकरिता गडी माणसेदेखील मिळत नाहीत. - प्रकाश शिरसाट, रामगाव, पशुपालक.संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी वातावरण आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धंदा अर्ध्यावर आला आहे. जिल्ह्यात जनावरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे धंद्यावर फरक जाणवतो. - अजय जैन,पशुखाद्य विक्रेते, विलासनगर, अमरावती.अमरावती शहराच्या आसपास असलेल्या पशुपालकांवर आमचा व्यवसाय अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी पाळीव पशुंची संख्या कमी केली. त्यामुळे धंद्यावर परिणाम झाला आहे.- सुनील देवाणी,ढेप विक्रेता, अमरावती.