शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

‘रघुवीर’वर एफडीएची धाड

By admin | Updated: September 16, 2016 00:57 IST

शहरातील प्रतिष्ठित रघुवीर प्रतिष्ठानातील कचोरीत बुधवारी अळ्या आढळल्यानंतर शहरात एकच

कचोरीत अळी : साहित्याचे नमुने जप्त, प्रयोगशाळेत रवाना अमरावती : शहरातील प्रतिष्ठित रघुवीर प्रतिष्ठानातील कचोरीत बुधवारी अळ्या आढळल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. विश्वासार्हतेची आणि चवीची हमी देणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानातच निष्काळजीपणाचा कळस असल्याची बाब यामुळे सिद्ध झाली. ज्या ग्राहकाने खरेदी केलेल्या कचोरीत अळी आढळली त्या बंडू उर्फ गजानन माधव बाबरेकर यांनी याप्रकाराची एफडीआयकडे रितसर तक्रार केल्यानंतर आज शाम चौकातील रघुवीर प्रतिष्ठानावर एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी धाड टाकून येथील खाद्यपदार्थांसह रॉ मटेरियल्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रघुवीरच्या किचन रूममधून अन्न पदार्थांचे तीन नमुने जप्त केले असून ते येथील आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. रघुवीर प्रतिष्ठानातील महागडा नाश्ता म्हणजे शुद्धता आणि चवदारपणासाठी जिल्ह्यातच नव्हे तर अन्य प्रांतातही प्रसिद्ध आहे. येथून कचोरी, समोसा आणि सांभारवडीच्या पार्सली बाहेरगावी जातात. अंबानगरीत आलेल्या पाहुण्यांना यजमान हमखास रघुवीरच्या पदार्थांची चव चाखवतात. मात्र, आतापर्यंत रघुवीर प्रतिष्ठानाने ग्राहकांच्या आरोग्याशी कसा खेळ चालविला होता, याचाच प्रत्यय या घटनेवरून आला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन शुद्ध व दर्जेदार साहित्य वापरणे, स्वच्छतेच्या उपाययोजना करणे गरजेचे असताना रघुवीर प्रतिष्ठानने मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून खाद्यपदार्थांची विक्री चालविल्याचा निष्कर्ष या घटनेवरून काढला जाऊ शकतो. शुद्धतेची हमी देणाऱ्या रघुवीरचा कारभार ‘उपर से टामटुम’ असाच सुरू असल्याचे दिसते. बुधवारा परिसरातील रहिवासी बंडू बाबरेकर यांनी खरेदी केलेल्या कचोरीत बोटाच्या कांड्याएवढ्या लांबीची अळी सापडल्यानंतर त्यांनी याची तक्रार एफडीएकडे केली. पश्चात एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे व रावसाहेब वाकोडे यांनी बुधवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान ‘रघुवीर’ प्रतिष्ठानावर धाड टाकली. सांगा विश्वास ठेवायाचा कसा? ४रघुवीर स्वीटमार्ट व मिठाई सेंटरच्या शहरभर शाखा आहेत. हे प्रतिष्ठान शहरातील विश्वसनीय प्रतिष्ठानांपैकी एक मानले जाते. परंतु बुधवारी कचोरीत अळ्या आढळल्यानंतर येथील खाद्यपदार्थांवर विश्वास ठेवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज लाखोंची उलाढाल असणाऱ्या रघुवीर सेंटरचे संचालक ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यात अपयशी ठरले आहेत. हलगर्जीपणा केल्यामुळे कचोरीत अळी आढळली. हा लोकांच्या जीविताशी खेळच असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.