शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘रघुवीर’वर एफडीएची धाड

By admin | Updated: September 16, 2016 00:57 IST

शहरातील प्रतिष्ठित रघुवीर प्रतिष्ठानातील कचोरीत बुधवारी अळ्या आढळल्यानंतर शहरात एकच

कचोरीत अळी : साहित्याचे नमुने जप्त, प्रयोगशाळेत रवाना अमरावती : शहरातील प्रतिष्ठित रघुवीर प्रतिष्ठानातील कचोरीत बुधवारी अळ्या आढळल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. विश्वासार्हतेची आणि चवीची हमी देणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानातच निष्काळजीपणाचा कळस असल्याची बाब यामुळे सिद्ध झाली. ज्या ग्राहकाने खरेदी केलेल्या कचोरीत अळी आढळली त्या बंडू उर्फ गजानन माधव बाबरेकर यांनी याप्रकाराची एफडीआयकडे रितसर तक्रार केल्यानंतर आज शाम चौकातील रघुवीर प्रतिष्ठानावर एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी धाड टाकून येथील खाद्यपदार्थांसह रॉ मटेरियल्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रघुवीरच्या किचन रूममधून अन्न पदार्थांचे तीन नमुने जप्त केले असून ते येथील आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. रघुवीर प्रतिष्ठानातील महागडा नाश्ता म्हणजे शुद्धता आणि चवदारपणासाठी जिल्ह्यातच नव्हे तर अन्य प्रांतातही प्रसिद्ध आहे. येथून कचोरी, समोसा आणि सांभारवडीच्या पार्सली बाहेरगावी जातात. अंबानगरीत आलेल्या पाहुण्यांना यजमान हमखास रघुवीरच्या पदार्थांची चव चाखवतात. मात्र, आतापर्यंत रघुवीर प्रतिष्ठानाने ग्राहकांच्या आरोग्याशी कसा खेळ चालविला होता, याचाच प्रत्यय या घटनेवरून आला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन शुद्ध व दर्जेदार साहित्य वापरणे, स्वच्छतेच्या उपाययोजना करणे गरजेचे असताना रघुवीर प्रतिष्ठानने मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून खाद्यपदार्थांची विक्री चालविल्याचा निष्कर्ष या घटनेवरून काढला जाऊ शकतो. शुद्धतेची हमी देणाऱ्या रघुवीरचा कारभार ‘उपर से टामटुम’ असाच सुरू असल्याचे दिसते. बुधवारा परिसरातील रहिवासी बंडू बाबरेकर यांनी खरेदी केलेल्या कचोरीत बोटाच्या कांड्याएवढ्या लांबीची अळी सापडल्यानंतर त्यांनी याची तक्रार एफडीएकडे केली. पश्चात एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे व रावसाहेब वाकोडे यांनी बुधवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान ‘रघुवीर’ प्रतिष्ठानावर धाड टाकली. सांगा विश्वास ठेवायाचा कसा? ४रघुवीर स्वीटमार्ट व मिठाई सेंटरच्या शहरभर शाखा आहेत. हे प्रतिष्ठान शहरातील विश्वसनीय प्रतिष्ठानांपैकी एक मानले जाते. परंतु बुधवारी कचोरीत अळ्या आढळल्यानंतर येथील खाद्यपदार्थांवर विश्वास ठेवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज लाखोंची उलाढाल असणाऱ्या रघुवीर सेंटरचे संचालक ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यात अपयशी ठरले आहेत. हलगर्जीपणा केल्यामुळे कचोरीत अळी आढळली. हा लोकांच्या जीविताशी खेळच असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.